शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

विवेकानंदाचे स्मारक संस्कारक्षम पिढी घडवेल

By admin | Updated: April 17, 2016 23:31 IST

संजय केळकर : आडे गावी विवेकानंदांच्या स्मृती...

गुहागर : विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे स्वामी विवेकानंदाचे आणि संस्कृत पंडित सीताराम देसाई यांच्यासारख्या विद्वान व्यक्तीचे स्मारक आडे येथे संस्कारक्षम पिढी घडविण्यास उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले.ते दापोली तालुक्यातील आडे गावातील स्वामी विवेकानंद स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. आडे येथे समुद्रकिनारी डॉ. मेधा मेहंदळे आणि कुटुंबियांनी बांधलेल्या स्वामी विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन दि. १४ मार्च रोजी आमदार संजय केळकर आणि प्रा. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कन्याकुमारी देवी, स्वामी विवेकानंदाच्या पुर्णाकृती पुतळा आणि संस्कृत पंडित सीताराम देसाई यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले.यावेळी बोलताना केळकर म्हणाले की, आडे येथे उभे राहिलेले विवेकानंदांचे स्मारक पर्यटन उद्योगाला चालना देईल. त्याशिवाय येथील विद्यार्थी, अभ्यासू व्यक्ती यांना येथील वाचनालयाच्या माध्यमातून अभ्यास करता येईल. दुर्गम भागात अशा प्रकारचे ज्ञानकेंद्र उभारण्याचा संकल्प कौतुकास्पद असल्याचेही संजय केळकर यांनी यावेळी सांगितले. हे स्मारक उभे करण्यासाठी तनमनधनपूर्वक कार्य करणाऱ्या डॉ. मेधा मेहंदळे म्हणाल्या की, ज्या आईने मला घडविले तिच्या स्वप्नांची पूर्ती करण्याचे भाग्य मला लाभले. आज तिच्याच उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत असल्याने आजचा दिवस माझ्यासाठी गौरवशाली आहे.या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात ‘विवेकानंद गीतांजली’ या गीतगायनाच्या कार्यक्रमाने झाली. डॉ. सुलभा रानडे यांनी निवेदनातून विवेकानंदाच्या जीवनातील प्रसंगांचे वर्णन केले आणि त्या प्रसंगाला अनुरूप गीते डॉ. विष्णू रानडे यांनी सादर केली. त्यानंतर मुख्य उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी कोकण कला अकादमी प्रस्तुत विवेकानंदाच्या जीवनावरील ‘सन्यस्त ज्वालामुखी’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये डॉ. मेधा मेहंदळे यांच्या मातोश्री कुसुम देसाई, माजी उपसभापती रवींद्र सातनाक, स्मारकाचे विकासक विक्रांत सप्रे (इंदापूर), ब्राँझचे पुतळे बनविणारे शिल्पकार जयेंद्र शिरगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. मानसी धामणकर आणि डॉ. रुचा पै यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)आडे झाले विवेकानंदमयआजचा समारंभ बिगर राजकीय असल्याने स्वामी विवेकानंदमय झाला होता. विवेकानंदांच्या जीवनावरील गीते, त्यांचे निवेदन, त्यांच्याच जीवनावरील नाटक यामुळे संपूर्ण कार्यक्रमातून विवेकानंदाचा जीवनपट उलगडला गेला आणि त्याचा आस्वाद ग्रामस्थांना घेता आला.