शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
2
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
3
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
4
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
5
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
6
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
7
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
8
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
9
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
10
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
11
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
12
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
13
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
14
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
15
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
16
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
17
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
18
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
19
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
20
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
Daily Top 2Weekly Top 5

विवेकानंदाचे स्मारक संस्कारक्षम पिढी घडवेल

By admin | Updated: April 17, 2016 23:31 IST

संजय केळकर : आडे गावी विवेकानंदांच्या स्मृती...

गुहागर : विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे स्वामी विवेकानंदाचे आणि संस्कृत पंडित सीताराम देसाई यांच्यासारख्या विद्वान व्यक्तीचे स्मारक आडे येथे संस्कारक्षम पिढी घडविण्यास उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले.ते दापोली तालुक्यातील आडे गावातील स्वामी विवेकानंद स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. आडे येथे समुद्रकिनारी डॉ. मेधा मेहंदळे आणि कुटुंबियांनी बांधलेल्या स्वामी विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन दि. १४ मार्च रोजी आमदार संजय केळकर आणि प्रा. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कन्याकुमारी देवी, स्वामी विवेकानंदाच्या पुर्णाकृती पुतळा आणि संस्कृत पंडित सीताराम देसाई यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले.यावेळी बोलताना केळकर म्हणाले की, आडे येथे उभे राहिलेले विवेकानंदांचे स्मारक पर्यटन उद्योगाला चालना देईल. त्याशिवाय येथील विद्यार्थी, अभ्यासू व्यक्ती यांना येथील वाचनालयाच्या माध्यमातून अभ्यास करता येईल. दुर्गम भागात अशा प्रकारचे ज्ञानकेंद्र उभारण्याचा संकल्प कौतुकास्पद असल्याचेही संजय केळकर यांनी यावेळी सांगितले. हे स्मारक उभे करण्यासाठी तनमनधनपूर्वक कार्य करणाऱ्या डॉ. मेधा मेहंदळे म्हणाल्या की, ज्या आईने मला घडविले तिच्या स्वप्नांची पूर्ती करण्याचे भाग्य मला लाभले. आज तिच्याच उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत असल्याने आजचा दिवस माझ्यासाठी गौरवशाली आहे.या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात ‘विवेकानंद गीतांजली’ या गीतगायनाच्या कार्यक्रमाने झाली. डॉ. सुलभा रानडे यांनी निवेदनातून विवेकानंदाच्या जीवनातील प्रसंगांचे वर्णन केले आणि त्या प्रसंगाला अनुरूप गीते डॉ. विष्णू रानडे यांनी सादर केली. त्यानंतर मुख्य उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी कोकण कला अकादमी प्रस्तुत विवेकानंदाच्या जीवनावरील ‘सन्यस्त ज्वालामुखी’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये डॉ. मेधा मेहंदळे यांच्या मातोश्री कुसुम देसाई, माजी उपसभापती रवींद्र सातनाक, स्मारकाचे विकासक विक्रांत सप्रे (इंदापूर), ब्राँझचे पुतळे बनविणारे शिल्पकार जयेंद्र शिरगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. मानसी धामणकर आणि डॉ. रुचा पै यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)आडे झाले विवेकानंदमयआजचा समारंभ बिगर राजकीय असल्याने स्वामी विवेकानंदमय झाला होता. विवेकानंदांच्या जीवनावरील गीते, त्यांचे निवेदन, त्यांच्याच जीवनावरील नाटक यामुळे संपूर्ण कार्यक्रमातून विवेकानंदाचा जीवनपट उलगडला गेला आणि त्याचा आस्वाद ग्रामस्थांना घेता आला.