शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

विवेक वाहिनीचे आता ‘युवा मानस मैत्री’ अभियान : हमीद दाभोलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 21:00 IST

सातारा : ‘महाराष्ट्र विवेक वाहिनी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात संपूर्ण राज्यात ‘युवा मानस मैत्री’ अभियान राबविणार आहे. हे अभियान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबविले जाणार आहे,’ अशी माहिती विवेक वाहिनीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी दिली.येथील तारांगणमधील डॉ. नरेंद्र दाभोलकर कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्रात विवेक वाहिनीच्या प्रतिनिधींची दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली. त्यावेळी ...

सातारा : ‘महाराष्ट्र विवेक वाहिनी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात संपूर्ण राज्यात ‘युवा मानस मैत्री’ अभियान राबविणार आहे. हे अभियान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबविले जाणार आहे,’ अशी माहिती विवेक वाहिनीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी दिली.

येथील तारांगणमधील डॉ. नरेंद्र दाभोलकर कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्रात विवेक वाहिनीच्या प्रतिनिधींची दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली. त्यावेळी डॉ. हमीद दाभोलकर यांनी ही माहिती दिली. या कार्यशाळेला महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. दाभोलकर म्हणाले, ‘बदलती जीवनशैली आणि वाढत्या अपेक्षांमुळे तरुणांमध्ये ताणतणाव आणि इतर मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. आत्महत्या करणाऱ्या लोकांमध्ये १५ ते ३५ वयोगटांतील लोकांचे प्रमाण जास्त आहे. दरवर्षी भारतात ५० हजारांपेक्षा अधिक तरुण आत्महत्या करतात. ही गोष्ट देशासाठी खूप गंभीर आहे. त्यामुळे असे विचार मनात येणाºया तरुणाईला योग्य भावनिक आधार देणे ही तातडीची गरज आहे. परंतु असे असताना देशात मानसिक उपचार खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. मानसिक आजारांबाबत लोकांमध्ये जागरुकताही नाही. यासाठीच महाराष्ट्र विवेक वाहिनीने पुढाकार घेण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र विवेक वाहिनीचे विद्यार्थी युवा मानस मित्र, मैत्रीण म्हणून काम करतील. मानसिक तणावग्रस्त विद्यार्थी ओळखणे त्यांना भावनिक आधार देणे आणि त्यांना योग्य उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाण्यास प्रवृत्त करणे, ही कामे करतील. त्यासाठी युवा मानसमित्रांना योग्य ते प्रशिक्षणही विवेक वाहिनीकडून देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाची सुरुवात या कार्यशाळेत करण्यात आली. राज्यभारत पुढील वर्षात एक हजार मानस मित्र, मैत्रिणी तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. सोशल मीडियाचाही यासाठी प्रभावी उपयोग केला जाणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.विवेक वाहिनीच्या या कार्यशाळेत डॉ. शैला दाभोलकर, डॉ. चित्रा दाभोलकर, कुमार मंडपे, देगावचे सरपंच गणेश राठोड, कृष्णात कोरे, उदय चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. हे प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी वाघेश साळुंखे, योगेश जगताप, अजय ढाणे यांनी परिश्रम घेतले...........................................................................................