शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

विवेक वाहिनीचे आता ‘युवा मानस मैत्री’ अभियान : हमीद दाभोलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 21:00 IST

सातारा : ‘महाराष्ट्र विवेक वाहिनी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात संपूर्ण राज्यात ‘युवा मानस मैत्री’ अभियान राबविणार आहे. हे अभियान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबविले जाणार आहे,’ अशी माहिती विवेक वाहिनीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी दिली.येथील तारांगणमधील डॉ. नरेंद्र दाभोलकर कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्रात विवेक वाहिनीच्या प्रतिनिधींची दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली. त्यावेळी ...

सातारा : ‘महाराष्ट्र विवेक वाहिनी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात संपूर्ण राज्यात ‘युवा मानस मैत्री’ अभियान राबविणार आहे. हे अभियान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबविले जाणार आहे,’ अशी माहिती विवेक वाहिनीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी दिली.

येथील तारांगणमधील डॉ. नरेंद्र दाभोलकर कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्रात विवेक वाहिनीच्या प्रतिनिधींची दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली. त्यावेळी डॉ. हमीद दाभोलकर यांनी ही माहिती दिली. या कार्यशाळेला महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. दाभोलकर म्हणाले, ‘बदलती जीवनशैली आणि वाढत्या अपेक्षांमुळे तरुणांमध्ये ताणतणाव आणि इतर मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. आत्महत्या करणाऱ्या लोकांमध्ये १५ ते ३५ वयोगटांतील लोकांचे प्रमाण जास्त आहे. दरवर्षी भारतात ५० हजारांपेक्षा अधिक तरुण आत्महत्या करतात. ही गोष्ट देशासाठी खूप गंभीर आहे. त्यामुळे असे विचार मनात येणाºया तरुणाईला योग्य भावनिक आधार देणे ही तातडीची गरज आहे. परंतु असे असताना देशात मानसिक उपचार खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. मानसिक आजारांबाबत लोकांमध्ये जागरुकताही नाही. यासाठीच महाराष्ट्र विवेक वाहिनीने पुढाकार घेण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र विवेक वाहिनीचे विद्यार्थी युवा मानस मित्र, मैत्रीण म्हणून काम करतील. मानसिक तणावग्रस्त विद्यार्थी ओळखणे त्यांना भावनिक आधार देणे आणि त्यांना योग्य उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाण्यास प्रवृत्त करणे, ही कामे करतील. त्यासाठी युवा मानसमित्रांना योग्य ते प्रशिक्षणही विवेक वाहिनीकडून देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाची सुरुवात या कार्यशाळेत करण्यात आली. राज्यभारत पुढील वर्षात एक हजार मानस मित्र, मैत्रिणी तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. सोशल मीडियाचाही यासाठी प्रभावी उपयोग केला जाणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.विवेक वाहिनीच्या या कार्यशाळेत डॉ. शैला दाभोलकर, डॉ. चित्रा दाभोलकर, कुमार मंडपे, देगावचे सरपंच गणेश राठोड, कृष्णात कोरे, उदय चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. हे प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी वाघेश साळुंखे, योगेश जगताप, अजय ढाणे यांनी परिश्रम घेतले...........................................................................................