शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

किसन वीर यांच्या पुरस्काराने भरून पावलो- विनायकराव पाटील : पुरस्कार प्रदान कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 22:29 IST

वाई : ‘आबासाहेब वीर हे सृष्टीचा उद्रेक होते. म्हणूनच त्यांच्यासारखी माणसं ना कोणत्या एका गावाची ना कोणत्या एका प्रांताची असतात. जागतिक पातळीवर ज्या-ज्या क्रांत्या झाल्या. त्या क्रांतिकारकांच्या ओळीतील आबासाहेब वीर होते. शेवटचा दिस गोड व्हावा, या भावनेतून जात असताना आबांच्या नावाच्या पुरस्काराचा हात पाठीवर पडल्याने भरून पावलो,’ असे भावोद्गार माजी ...

ठळक मुद्देविविध मान्यवरांची उपस्थिती

वाई : ‘आबासाहेब वीर हे सृष्टीचा उद्रेक होते. म्हणूनच त्यांच्यासारखी माणसं ना कोणत्या एका गावाची ना कोणत्या एका प्रांताची असतात. जागतिक पातळीवर ज्या-ज्या क्रांत्या झाल्या. त्या क्रांतिकारकांच्या ओळीतील आबासाहेब वीर होते. शेवटचा दिस गोड व्हावा, या भावनेतून जात असताना आबांच्या नावाच्या पुरस्काराचा हात पाठीवर पडल्याने भरून पावलो,’ असे भावोद्गार माजी मंत्री, वनाधिपती विनायकराव पाटील यांनी काढले.

किसन वीरनगर, ता. वाई येथे देशभक्त आबासाहेब वीर यांच्या जयंतीनिमित्त किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विनायकराव पाटील यांना ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांच्या हस्ते आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर उर्वरित महाराष्टÑ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार यांच्या हस्ते सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलासराव शिंदे यांना आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, उपाध्यक्ष व्ही. जी. पवार, डॉ. नीलिमा भोसले, केतन भोसले, डॉ. सुरुभी भोसले, प्रल्हादराव चव्हाण, अ‍ॅड. जयवंतराव केंजळे, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव यांची प्रमुख उपस्थित होती.

माजी मंत्री पाटील म्हणाले, ‘काही लोकं काळाच्या पुढचं पाहतात. त्यामुळे त्याचं महत्त्व त्यावेळी वाटत नसतं. जेट्राफा लागवडीबाबत असो किंवा अगदी विजय तेंडुलकरांच्या नाटकांच्या बाबतीत असो हेच घडलं आहे. तसेच शेती आणि सहकारातील प्रयोगाबाबत आहे. सर्वच प्रयोग काही यशस्वी होत नाहीत म्हणून प्रयोग करणं सोडता कामा नये. किंबहुना अनेक प्रयत्नातून एखादा प्रयत्न यशस्वी होतो म्हणूनच त्याला प्रयोग म्हणतात.

उल्हास पवार म्हणाले, अनेकांनी आपल्या आयुष्याचा होम केला तेव्हा हे स्वातंत्र मिळालंं. स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी झटताना अनेकांनी एकोपा जपला; पण सध्याच्या काळात राजकीय मतभेदांना द्वेषाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. अशा परिस्थितीत मांगल्याचं रुप म्हणजे विनायकराव पाटील आहेत. तर विलासराव शिंदे हे आजच्या काळातील आश्वासक आणि प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेती उद्योगात घेतलेली भरारी थक्क करणारी आहे.संचालक नंदकुमार निकम यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. स्नेहल दामले व दत्तात्रय शेवते यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. प्रताप देशमुख यांनी आभार मानले.सातारा जिल्हा चळवळींची प्रयोगशाळासामाजिक, राजकीय चळवळींची प्रयोगशाळा सातारा आहे. संपूर्ण महाराष्टÑात कोणत्याही चळवळीवर साताºयाच्या तपासणीचा शिक्का असावाच लागतो. अशा सातारा जिल्ह्यात खूप मोठी माणसं निर्माण झाली. याच भूमितील यशवंतराव चव्हाण हे माझं आराध्य दैवत तर आबासाहेब वीर यांच्यात अखेरपर्यंत दडलेलं एक खेळकर मूल माझा दोस्त होता. त्यांच्या स्वभावाच्या अनेक वैशिष्ट्यांचा जवळून अनुभव घेता आला. म्हणूनच आबांच्या नावाचा पुरस्कार ‘आनंदाचे डोही’ ही भावना निर्माण करणारं आहे.’,असे गौरवोद्घार माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी काढले.किसन वीरनगर, ता. वाई येथे आबासाहेब वीर यांच्या जयंतीनिमित्ताने विनायकराव पाटील व विलासराव शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उल्हास पवार, प्रतापराव भोसले, मदन भोसले, गजानन बाबर उपस्थित होते.