शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

भुईंजमध्ये मटका, दारू धंदे बंद करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

By admin | Updated: June 30, 2017 13:21 IST

हप्ते वसुलीखोरांचे धाबे दणाणले

आॅनलाईन लोकमतभुईंज (जि. सातारा) , दि. ३0 : भुईंज तालुका वाई याठिकाणी गावामध्ये अथवा परिसरामध्ये मटका आणि दारूधंदे कायम स्वरूपी बंद करण्याचा निर्धार भुईंज मधील अनेक युवा संघटनांनी आणि ग्रामस्थांनी घेतला आहे.अनेकांच्या संसाराची राखरांगोळी करणाऱ्या या धंद्यांना कायमचे बंद करण्याच्या या निधारार्ने या धंदेवाल्यांचे आणि त्यांच्याकडून हप्ते वसुलीखोरांचे धाबे दणाणले आहेत.भुईंज हे गाव वाई तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून पुणे बंगलोर महामार्गावर वसलेल्या या गावातील बहुतांश दारूची दुकाने शासनाच्या निर्णयामुळे बंद झाली आहेत. महामार्गशेजारील २५० मीटरच्या आतील सर्व दारू दुकाने बंद करण्याच्या निर्णयामुळे भुईंज मधील ६ बिअर बार आणि एक देशी विदेशी दारूचे दुकान बंद झाले. परंतु एक बिअर बार हे एकमेव बिअर बार चालू राहिले.आता बंद झालेल्या दारूच्या दुकान मालकांनी पुन्हा गावापासून लांब अशा वेगवेगळ्या ठिकाणी दारू दुकाने आणि बिअर बार उभारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.भुईंजमध्ये मटका सुद्धा राजरोसपणे सुरू असून आर्थिक लागेबांधे असल्याचे बोलले जात आहे. भुईंज मधील युवा प्रतिष्ठानने भुईंज परिसरातील मटका बंद करण्यासाठी अनेक वेळा पोलिसांना निवेदन देऊनही काहीच फरक पडत नाही, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. मटका बंद करण्यासाठी पाऊल उचलणाराला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळेच भुईंज युवा प्रतिष्ठान, सर्व युवा संघटना आणि ग्रामस्थांनी भुईंजमधील युवकांच्या जीवावर उठलेल्या आणि हजारो संसाराची होळी करणारा हा मटका धंदा बंद करण्याचा निर्धार केला आहे. भुईंज पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार आहे.भुईंज मध्ये बंद झालेली दुकाने पुन्हा चालू करू न देता सध्या चालू असलेले दुकानही पूर्णपणे बंद करून भुईंज हे गाव सातारा जिल्ह्यातील आदर्श गाव बनवण्याचा निर्धार भुईंज मधील युवा पिढीने केला आहे. बंद झालेल्या दुकानांच्या पुनर्वसनासाठी भुईंज ग्रामपंचायतीने कसलीही परवानगी देऊ नये असे आवाहनही भुईंज मधील युवकांनी भुईंज ग्रामपंचायतीला केले आहे. या दारू आणि मटका बंदीच्या अभियानात सर्व पक्ष्याच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी,वरिष्ठ नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन भुईंज मधील युवकांनी आणि विविध संघटना आणि ग्रामस्थानी केले आहे. 

तर किंमत चुकवावी लागणार !

भुईंजमध्ये पुढील दोन महिन्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. जर आत्ता या मटका आणि दारू बंद अभियानात एखाद्या पक्षाने विरोध केला तर त्याची मोठी किंमत त्या पक्षाला आगामी ग्रामपंचयायीच्या निवडणुकीत चुकवावी लागणार असून दारात मते मागायला येणाऱ्या पुढाऱ्यांना त्यावेळी जाब विचारण्याचा निर्धारही भुईंज ग्रामस्थानी केला आहे.