शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

महाबळेश्वरमधील मोर्चात ११० गावांच्या ग्रामस्थांचा सहभाग

By admin | Updated: April 1, 2017 11:59 IST

पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी रास्ता रोको रद्द

आॅनलाईन लोकमत

महाबळेश्वर, दि. १ : बंदी असतानाही तालुक्यात गोहत्या सुरू असल्याच्या निषेधार्थ तसेच धोंडिबा आखाडे यांच्या हल्लेखोरांना अटक करावी, या मागण्यांसाठी शुक्रवारी महाबळेश्वरच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील ११० गावांमधील ग्रामस्थ तालुका बंद यशस्वी करून मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी रास्ता रोका रद्द करण्यात आला.

राज्यात गोहत्या बंदी असून, जनावरांचे कत्तलखाने बंद करण्यात आले आहेत. तरीही येथे जंगलात गोहत्या केली जात आहे. याबाबतचे सर्व पुरावे पोलिसांना देण्यात आले आहेत. या संदर्भात योग्य तपास करून आरोपींना अटक करण्यात येईल, अशी अपेक्षा ग्रामीण भागातील लोकांना होती. परंतु पोलिसांनी हे प्रकरण गांभीयार्ने घेतले नाही, तसेच देवळी येथील शेतकरी धोंडिबा आखाडे यांचा संशयास्पद मृत्यू झाला. धोंडिबा आखाडे यांचा नैसर्गिक मृत्यू नसून त्यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या दोन्ही प्रकरणीही पोलिसांनी पंचनामे करणे व्यतिरिक्त कोणतीच कारवाई केली नाही, त्यामुळे संपुर्ण तालुक्यात पोलिसांच्या कारभाराविषयी असंतोष पसरला आहे.

ग्रामस्थांनी शुक्रवारी रास्ता रोको व तालुका बंदचा इशारा दिला होता. त्यानुसार सकाळी अकरा वाजता शिवाजी चौक ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये हजारो आंदोलनकर्ते सहभागी झाले होते. तहसील कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. यावेळी अनेकांनी संतप्त भावना व्यक्त करत दोन्ही घटनांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली