शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
3
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
4
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
7
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
8
जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
9
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
10
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
11
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
12
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
13
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
14
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
15
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
16
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
18
अलर्ट! पैसे दुप्पट करण्याची हाव; एक मेसेज अन् गमावली आयुष्यभराची कमाई, करू नका 'ही' चूक
19
लग्नानंतर नवऱ्याने काम करु दिलं नाही तर...? रिंकू राजगुरु म्हणाली, "तो हिसकावून घेत असेल..."
Daily Top 2Weekly Top 5

विजय दिवस हा अभिमानास्पद समारोह

By admin | Updated: December 16, 2015 00:06 IST

शिवाजीराव देशमुख : कऱ्हाडला ‘जीवन गौरव यशवंत पुरस्कार’ प्रदान सोहळा उत्साहात

कऱ्हाड : ‘भारतीय सैन्यदलाच्या बांगला मुक्ती संग्रामातील देदीप्यमान विजयाप्रीत्यर्थ कऱ्हाडला प्रत्येक वर्षी विजय दिवस साजरा केला जातो. संपूर्ण देशाला अभिमान वाटावा असा हा ‘विजय दिवस’ म्हणून ओळखला जातो. यादिवशी भारतीय सैन्यदलातील तिन्ही दलातील सैनिकांनी देदीप्यमान कामगिरी केली होती, त्याच्याच प्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. कऱ्हाडला साजरा केला जाणार विजय दिवस हा देशातल्या प्रत्येक नागरिकाने साजरा केला पाहिजे,’ असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केले.कऱ्हाड येथे विजय दिवस समारोह समितीच्या वतीने आयोजित ‘जीवन गौरव यशवंत पुरस्कार’ प्रदान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मर्चंट समूहाचे अध्यक्ष सत्यनारायण मिणीयार, शिवाजी विद्यापीठ कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, पद्मश्री चंद्रकांत बोर्डे, मेजर जनरल मुखर्जी, कर्नल संभाजीराव पाटील, पुष्पलता पाटील, नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे, गुलाबराव पोळ, मुख्याधिकारी प्रशांत रोडे आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माजी सभापती शिवाजीराव देशमुख व मर्चंट समूहाचे अध्यक्ष सत्यनारायण मिणीयार यांना ‘जीवन गौरव यशवंत पुरस्कारा’चे वितरण करण्यात आले. तसेच सातारा तालुक्यातील पोगरवाडी येथील शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या आई कालिंदी घोरपडे यांना वीरमाता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.माजी सभापती देशमुख म्हणाले, ‘देशाच्या त्यागासाठी आपले सर्वस्व प्रदान करणे ही साधी गोष्ट नाही. या देशातील तरुणांना पोलीस हा एकच शब्द माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यात सैन्यदलाच्या कार्याबाबत उर्जा निर्माण करणे गरजेचे आहे. आज देशासाठी प्राण देणारे अनेक वीर आहेत. आज माजी सैनिकांसाठी सरकारने कायदे केले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. सैनिकांना सोयी सुविधा देण्यामध्ये महाराष्ट्राचा खूप खाली क्रमांक लागतो.’चंद्रकांत बोर्डे म्हणाले, ‘कऱ्हाडकरांचे मैदान हे शौर्यवीरांचे मैदान आहे. अशा शौर्यवीरांना मी अभिवादन करतो. हा पुरस्कार माझ्या जीवनातील एक महत्वाचा असा पुरस्कार आहे.’यावेळी कर्नल संभाजीराव पाटील व कु लगुरु डॉ. देवानंद शिंदे, गुलाबराव पोळ यांनी मनोगत व्यक्त केले.विजय दिवस समारोह समितीचे सचिव अ‍ॅड. संभाजीराव मोहिते यांनी प्रास्ताविक केले.(प्रतिनिधी)