शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाना पाटील चौकातील अतिक्रमणं घेताहेत वाहनचालकांचा बळी

By admin | Updated: July 8, 2017 13:27 IST

फलटणकरांतून नाराजी : पोलिस अन पालिका प्रशासनाची केवळ बघ्याची भूमिका

आॅनलाईन लोकमत फलटण (सातारा), दि. ८ : शहरातील सतत वर्दळीचा आणि मोठा चौक असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील चौकात वाहतुकीचा ताण पडत आहे. या चौकात बुधवारी रात्री एका सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याने हा चौक आणखी किती जणांचा बळी घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पालिकेने ठोस भूमीका घेऊन योग्य ती उपाययोजना करण्याची गरज आहे. फलटण शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून चार रस्ते फुटतात. एक पुणे-बारामतीकडे जाणारा. दुसरा पंढरपूरकडे जाणारा. तिसरा दहिवडी-साताराकडे जाणारा तर चौथा शहरात येणारा आहे. चौकात मिळणारे चार रस्ते अन् जवळच असलेले बसस्थानक यामुळे या चौकात चोवीस तास वर्दळ असते. हा परिसर सतत गजबजलेला असतो. या चौकाच्या क्षमतेपेक्षा जास्त वाहने ये-जा करत असून परिसरातच मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. या चौकाजवळ बँका, शाळा असल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. या चौकात सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते. काही वेळेस तासभर चौकाच्या चारी बाजूने वाहतुकीच्या रांगा लागल्या असतात. चौकात वाहतूक पोलिस असले तरी त्यांचा जास्त वेळ परजिल्ह्यातील वाहने अडवून त्यांच्याकडून पैसे घेण्यातच जात असल्याचा आरोप वाहनचालकांमधून होत आहे.या सर्व गोष्टींचा विचार करता या चौकात सातत्याने अपघातांची मालिका वाढलेली आहे. या चौकात गेल्या दोन वर्षांत शेकडो अपघात झालेले आहे. चौकाला अतिक्रमणाचा विळखा आहे तसाच विळखा खड्ड्यांचाही बसलेला आहे. चौकात मोठ्या प्रमाणात खड्डे तसेच रस्त्याची लेवल नसल्याने अपघात वाढत आहेत. चौकातच मोठ्या प्रमाणात खासगी वाहतूक करणाऱ्या वडापच्या गाड्या उभ्या असतात. या गाड्यांमुळे काहीवेळेस वाहतुकीस अडथळा येत असूनही वाहतूक पोलिस त्यांना बाजूला सरकविण्याचे धाडस दाखवत नाहीत.चौक परिसरातून नीरा उजवा कालवा वाहत जात असतो. या कालव्याच्या पुलाची रुंदी वाढविणे गरजेचे आहे. या पुलावरही बराचवेळ वाहतूक अडकून पडलेली असते. त्यामुळे पुलाच्या रुंदीकरणाबाबत तसेच रस्त्याच्या मजबुतीकरणाकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.या चौकातील वाहतुकीकडे व सोयीसुविधाबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने कित्येकजणांनी येथे जीव गमवला आहे. पालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याच्या देखरेखीवरून एकमेकाकडे बोट दाखवित असले तरी दोघांनी मिळून ज्याच्या त्याच्या हद्दीतील प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. सायकलवरून जाणाऱ्या सायकलस्वारास डंपरखाली पडल्याने नाहक जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. या चौकातच शाळा असून, शाळेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. कित्येक बळी जाऊनही नगरपालिकेचे प्रशासन आंधळेपणाचे सोंग घेऊन गप्प बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहे.क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. अनेक अपघात या चौकात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या चौकातील चारही बाजूंने गतिरोधक तयार केले तर वाहनांचा वेग कमी होऊन अपघात कमी होतील. तसेच चौकातील रस्त्यांचे मजबुतीकरण करून साईडपट्ट्या भरल्या तरी अपघात कमी होतील.- राजेंद्र भागवतगोखळी

अपघातांना कारणीभूत घटक

- अतिक्रमणांचा विळखा- चौकात उभे असलेल्या वडाप गाड्या- खड्डे अन् असमतल रस्ते