शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
4
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
5
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
6
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
7
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
8
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
9
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
10
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
11
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
12
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
13
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
14
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
15
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
16
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
17
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
18
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
19
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
20
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश

नाना पाटील चौकातील अतिक्रमणं घेताहेत वाहनचालकांचा बळी

By admin | Updated: July 8, 2017 13:27 IST

फलटणकरांतून नाराजी : पोलिस अन पालिका प्रशासनाची केवळ बघ्याची भूमिका

आॅनलाईन लोकमत फलटण (सातारा), दि. ८ : शहरातील सतत वर्दळीचा आणि मोठा चौक असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील चौकात वाहतुकीचा ताण पडत आहे. या चौकात बुधवारी रात्री एका सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याने हा चौक आणखी किती जणांचा बळी घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पालिकेने ठोस भूमीका घेऊन योग्य ती उपाययोजना करण्याची गरज आहे. फलटण शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून चार रस्ते फुटतात. एक पुणे-बारामतीकडे जाणारा. दुसरा पंढरपूरकडे जाणारा. तिसरा दहिवडी-साताराकडे जाणारा तर चौथा शहरात येणारा आहे. चौकात मिळणारे चार रस्ते अन् जवळच असलेले बसस्थानक यामुळे या चौकात चोवीस तास वर्दळ असते. हा परिसर सतत गजबजलेला असतो. या चौकाच्या क्षमतेपेक्षा जास्त वाहने ये-जा करत असून परिसरातच मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. या चौकाजवळ बँका, शाळा असल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. या चौकात सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते. काही वेळेस तासभर चौकाच्या चारी बाजूने वाहतुकीच्या रांगा लागल्या असतात. चौकात वाहतूक पोलिस असले तरी त्यांचा जास्त वेळ परजिल्ह्यातील वाहने अडवून त्यांच्याकडून पैसे घेण्यातच जात असल्याचा आरोप वाहनचालकांमधून होत आहे.या सर्व गोष्टींचा विचार करता या चौकात सातत्याने अपघातांची मालिका वाढलेली आहे. या चौकात गेल्या दोन वर्षांत शेकडो अपघात झालेले आहे. चौकाला अतिक्रमणाचा विळखा आहे तसाच विळखा खड्ड्यांचाही बसलेला आहे. चौकात मोठ्या प्रमाणात खड्डे तसेच रस्त्याची लेवल नसल्याने अपघात वाढत आहेत. चौकातच मोठ्या प्रमाणात खासगी वाहतूक करणाऱ्या वडापच्या गाड्या उभ्या असतात. या गाड्यांमुळे काहीवेळेस वाहतुकीस अडथळा येत असूनही वाहतूक पोलिस त्यांना बाजूला सरकविण्याचे धाडस दाखवत नाहीत.चौक परिसरातून नीरा उजवा कालवा वाहत जात असतो. या कालव्याच्या पुलाची रुंदी वाढविणे गरजेचे आहे. या पुलावरही बराचवेळ वाहतूक अडकून पडलेली असते. त्यामुळे पुलाच्या रुंदीकरणाबाबत तसेच रस्त्याच्या मजबुतीकरणाकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.या चौकातील वाहतुकीकडे व सोयीसुविधाबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने कित्येकजणांनी येथे जीव गमवला आहे. पालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याच्या देखरेखीवरून एकमेकाकडे बोट दाखवित असले तरी दोघांनी मिळून ज्याच्या त्याच्या हद्दीतील प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. सायकलवरून जाणाऱ्या सायकलस्वारास डंपरखाली पडल्याने नाहक जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. या चौकातच शाळा असून, शाळेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. कित्येक बळी जाऊनही नगरपालिकेचे प्रशासन आंधळेपणाचे सोंग घेऊन गप्प बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहे.क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. अनेक अपघात या चौकात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या चौकातील चारही बाजूंने गतिरोधक तयार केले तर वाहनांचा वेग कमी होऊन अपघात कमी होतील. तसेच चौकातील रस्त्यांचे मजबुतीकरण करून साईडपट्ट्या भरल्या तरी अपघात कमी होतील.- राजेंद्र भागवतगोखळी

अपघातांना कारणीभूत घटक

- अतिक्रमणांचा विळखा- चौकात उभे असलेल्या वडाप गाड्या- खड्डे अन् असमतल रस्ते