शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नाना पाटील चौकातील अतिक्रमणं घेताहेत वाहनचालकांचा बळी

By admin | Updated: July 8, 2017 13:27 IST

फलटणकरांतून नाराजी : पोलिस अन पालिका प्रशासनाची केवळ बघ्याची भूमिका

आॅनलाईन लोकमत फलटण (सातारा), दि. ८ : शहरातील सतत वर्दळीचा आणि मोठा चौक असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील चौकात वाहतुकीचा ताण पडत आहे. या चौकात बुधवारी रात्री एका सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याने हा चौक आणखी किती जणांचा बळी घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पालिकेने ठोस भूमीका घेऊन योग्य ती उपाययोजना करण्याची गरज आहे. फलटण शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून चार रस्ते फुटतात. एक पुणे-बारामतीकडे जाणारा. दुसरा पंढरपूरकडे जाणारा. तिसरा दहिवडी-साताराकडे जाणारा तर चौथा शहरात येणारा आहे. चौकात मिळणारे चार रस्ते अन् जवळच असलेले बसस्थानक यामुळे या चौकात चोवीस तास वर्दळ असते. हा परिसर सतत गजबजलेला असतो. या चौकाच्या क्षमतेपेक्षा जास्त वाहने ये-जा करत असून परिसरातच मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. या चौकाजवळ बँका, शाळा असल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. या चौकात सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते. काही वेळेस तासभर चौकाच्या चारी बाजूने वाहतुकीच्या रांगा लागल्या असतात. चौकात वाहतूक पोलिस असले तरी त्यांचा जास्त वेळ परजिल्ह्यातील वाहने अडवून त्यांच्याकडून पैसे घेण्यातच जात असल्याचा आरोप वाहनचालकांमधून होत आहे.या सर्व गोष्टींचा विचार करता या चौकात सातत्याने अपघातांची मालिका वाढलेली आहे. या चौकात गेल्या दोन वर्षांत शेकडो अपघात झालेले आहे. चौकाला अतिक्रमणाचा विळखा आहे तसाच विळखा खड्ड्यांचाही बसलेला आहे. चौकात मोठ्या प्रमाणात खड्डे तसेच रस्त्याची लेवल नसल्याने अपघात वाढत आहेत. चौकातच मोठ्या प्रमाणात खासगी वाहतूक करणाऱ्या वडापच्या गाड्या उभ्या असतात. या गाड्यांमुळे काहीवेळेस वाहतुकीस अडथळा येत असूनही वाहतूक पोलिस त्यांना बाजूला सरकविण्याचे धाडस दाखवत नाहीत.चौक परिसरातून नीरा उजवा कालवा वाहत जात असतो. या कालव्याच्या पुलाची रुंदी वाढविणे गरजेचे आहे. या पुलावरही बराचवेळ वाहतूक अडकून पडलेली असते. त्यामुळे पुलाच्या रुंदीकरणाबाबत तसेच रस्त्याच्या मजबुतीकरणाकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.या चौकातील वाहतुकीकडे व सोयीसुविधाबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने कित्येकजणांनी येथे जीव गमवला आहे. पालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याच्या देखरेखीवरून एकमेकाकडे बोट दाखवित असले तरी दोघांनी मिळून ज्याच्या त्याच्या हद्दीतील प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. सायकलवरून जाणाऱ्या सायकलस्वारास डंपरखाली पडल्याने नाहक जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. या चौकातच शाळा असून, शाळेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. कित्येक बळी जाऊनही नगरपालिकेचे प्रशासन आंधळेपणाचे सोंग घेऊन गप्प बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहे.क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. अनेक अपघात या चौकात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या चौकातील चारही बाजूंने गतिरोधक तयार केले तर वाहनांचा वेग कमी होऊन अपघात कमी होतील. तसेच चौकातील रस्त्यांचे मजबुतीकरण करून साईडपट्ट्या भरल्या तरी अपघात कमी होतील.- राजेंद्र भागवतगोखळी

अपघातांना कारणीभूत घटक

- अतिक्रमणांचा विळखा- चौकात उभे असलेल्या वडाप गाड्या- खड्डे अन् असमतल रस्ते