शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

गावोगावच्या मतदानात दाटून आला उत्साह!

By admin | Updated: August 4, 2015 23:20 IST

ग्रामपंचायत निवडणूक : जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत; गुरुवारी मतमोजणी; आता निकालाकडे लक्ष

सातारा : सातारा जिल्ह्यातील ५४७ ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. जिल्हा प्रशासनाकडे रात्री उशीरापर्यंत मतदानाची एकूण आकडेवारी प्राप्त झाली नाही तरीही सरासरी ८४ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. या निवडणुकीत मतदारांचा उदंड उत्साह दिसून आला. मतदाराजाला मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी गावोगावी पॅनेलतर्फे वाहनांची व्यवस्था केली होती. बुधवारी ढगाळ वातावरण होते. पण पावसाने हजेरी लावली नसल्याने मतदारांनी रांगा लावून मतदान केले. अनेक गावांमध्ये आमदार, स्थानिक जिल्हा परिषद सदस्य, सहकाराच्या राजकारणातील मातब्बर मंडळींनी ठिय्या मारला होता. संवेदनशील गावांमध्ये राजकीय मंडळी विशेष दक्षता घेत होते.खंडाळ्यात ७४८ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंदखंडाळा : खंडाळा तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींसाठी आज चुरशीने मतदान झाले. तालुक्यातील ६६५६३ मतदारांपैकी ५७, ८५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. खंडाळा तालुक्यात सरासरी ८७ टक्के मतदान झाले असून ७४८ उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद झाले आहे. सर्व प्रक्रिया शांततेत पार पडली.खंडाळा तालुक्यात एकूण ५५ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. यापैकी ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ४९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झाले. सकाळपासूनच प्रत्येक गावातून मतदारांमध्ये मोठा उत्साह होता. तालुक्यातील ३१, ८७० स्त्रीयांपैकी २७, ६८३ स्त्रीयांनी मतदान केले. तर ३४,६९३ पुरूष मतदारांपैकी ३०, १६९ पुरूषांनी मतदानाचा हक्क बजावला.तालुक्यातील खंडाळा, बावडा, अंदोरी, नायगाव, अहिरे, शिंदेवाडी, विंग, पिंपरे बुद्रुक, कोपर्डे, भादे, पारगाव, सांगवी या गावांमध्ये मोठ्या चुरशीने मतदान झाले. यामध्ये राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांपैकी राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मनोज पवार, शिवसेना महिला आघाडी प्रमुख शारदा जाधव, तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सुनिती धायगुडे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश शिंदे, महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र नेवसे यांसह अनेक दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.४९ ग्रामपंचायतींसाठी सर्वत्र चुरशीने मतदान झाले असले तरी कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. शेवटपर्यंत सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. विशेषत: महिला व ज्येष्ठ नागरीकांचाही मोठा प्रतिसाद होता.सर्व मतदान केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. तर संवेदनशील गावांमध्ये अधिकचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दुपारपर्यंत सर्वच गावांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले त्यामुळे केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी लगबग होती. वयोवृद्ध मतदारांना गाडीवरून आणले जात होते.