शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

गावोगावच्या मतदानात दाटून आला उत्साह!

By admin | Updated: August 4, 2015 23:20 IST

ग्रामपंचायत निवडणूक : जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत; गुरुवारी मतमोजणी; आता निकालाकडे लक्ष

सातारा : सातारा जिल्ह्यातील ५४७ ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. जिल्हा प्रशासनाकडे रात्री उशीरापर्यंत मतदानाची एकूण आकडेवारी प्राप्त झाली नाही तरीही सरासरी ८४ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. या निवडणुकीत मतदारांचा उदंड उत्साह दिसून आला. मतदाराजाला मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी गावोगावी पॅनेलतर्फे वाहनांची व्यवस्था केली होती. बुधवारी ढगाळ वातावरण होते. पण पावसाने हजेरी लावली नसल्याने मतदारांनी रांगा लावून मतदान केले. अनेक गावांमध्ये आमदार, स्थानिक जिल्हा परिषद सदस्य, सहकाराच्या राजकारणातील मातब्बर मंडळींनी ठिय्या मारला होता. संवेदनशील गावांमध्ये राजकीय मंडळी विशेष दक्षता घेत होते.खंडाळ्यात ७४८ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंदखंडाळा : खंडाळा तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींसाठी आज चुरशीने मतदान झाले. तालुक्यातील ६६५६३ मतदारांपैकी ५७, ८५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. खंडाळा तालुक्यात सरासरी ८७ टक्के मतदान झाले असून ७४८ उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद झाले आहे. सर्व प्रक्रिया शांततेत पार पडली.खंडाळा तालुक्यात एकूण ५५ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. यापैकी ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ४९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झाले. सकाळपासूनच प्रत्येक गावातून मतदारांमध्ये मोठा उत्साह होता. तालुक्यातील ३१, ८७० स्त्रीयांपैकी २७, ६८३ स्त्रीयांनी मतदान केले. तर ३४,६९३ पुरूष मतदारांपैकी ३०, १६९ पुरूषांनी मतदानाचा हक्क बजावला.तालुक्यातील खंडाळा, बावडा, अंदोरी, नायगाव, अहिरे, शिंदेवाडी, विंग, पिंपरे बुद्रुक, कोपर्डे, भादे, पारगाव, सांगवी या गावांमध्ये मोठ्या चुरशीने मतदान झाले. यामध्ये राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांपैकी राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मनोज पवार, शिवसेना महिला आघाडी प्रमुख शारदा जाधव, तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सुनिती धायगुडे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश शिंदे, महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र नेवसे यांसह अनेक दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.४९ ग्रामपंचायतींसाठी सर्वत्र चुरशीने मतदान झाले असले तरी कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. शेवटपर्यंत सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. विशेषत: महिला व ज्येष्ठ नागरीकांचाही मोठा प्रतिसाद होता.सर्व मतदान केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. तर संवेदनशील गावांमध्ये अधिकचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दुपारपर्यंत सर्वच गावांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले त्यामुळे केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी लगबग होती. वयोवृद्ध मतदारांना गाडीवरून आणले जात होते.