शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

‘गांडूळखत’ प्रकल्पात सापांचा सुळसुळाट!

By admin | Updated: August 19, 2015 21:16 IST

कऱ्हाडातील खत प्रकल्पाचे तीनतेरा : पालिकेच्या प्रकल्पातील ‘गांडुळां’सह ‘खत’ही गायब़; घनकचरा नियोजनाचा प्रश्न अधांतरीच, सभागृहात केवळ चर्चा

संतोष गुरव - कऱ्हाड शहराच्या विस्ताराबरोबरच घनकचऱ्याचे प्रमाणही वाढत आहे. याचाच विचार करून पालिकेच्या वतीने सुमारे बारा वर्षांपूर्वी येथील बाराडबरी परिसरात घनकचऱ्यापासून गांडूळखत तयार करण्याचा प्रकल्प उभारला होता. मात्र, पालिकेतील लोकप्रतिनिधींच्या अंतर्गत राजकारणामुळे केवळ अडीच वर्षांत या प्रकल्पाचे तीनतेरा वाजले. एकेकाळी चांगल्या चालणाऱ्या गांडूळखत प्रकल्पातील सध्या गांडुळे व खतही आता गायब झाले आहेत. घनकचरा व्यवस्थापनासाठी उभारण्यात आलेल्या इमारतींमध्ये सध्या कामगार वास्तव्य करत आहेत. विशेष म्हणजे, या प्रकल्पाबाबत नगरसेवकांकडून मासिक सभेत नुसते विषय मांडून त्यावर वायफळ चर्चा केली जाते; मात्र प्रत्यक्ष कार्यवाही काहीच केली जात नाही. त्यामुळे कोट्यवधी खर्च करून उभारलेला गांडूळखत प्रकल्प सुरू होण्याऐवजी बंद अवस्थेतच आहे. येथे उंदीर, सापांचा वावर आहे. शहरात स्वच्छतेसाठी राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा बोजवारा उडाला आहे. २४ बाय ७ योजना कधी पूर्ण होणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. एकीकडे नव्या योजना पूर्ण करण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे जुन्या योजनांना तिलांजली वाहण्याचे काम पालिकेने केले आहे. शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कुंड्या कचऱ्याने भरून वाहत आहेत. कचऱ्यापासून गांडूळखत तयार करण्यासाठी पालिकेने २००३ मध्ये कोट्यवधींचा खर्च करून प्रकल्प उभारला होता. दररोज दोन टन असे वर्षाला एकूण सातशे टन खत तयार करण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट होते. यामुळे अनेकांना या खताचा फायदा झाला असता आणि त्यातून पालिकेलाही उत्पन्न मिळाले असते; परंतु लोकप्रतिनिधींच्या अंतर्गत राजकारणामुळे अडीच वर्षांत हा प्रकल्प बंद पडला. प्रकल्पाच्या ठिकाणी कामगारांचे वास्तव्य आणि उंदीर, सापांचा वावर आहे. प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या जाळीत गांडूळ व खत ठेवले जात होते. मात्र तीही जाळी आता तुटून गेली आहे. तर प्रकल्पाच्या इमारतीचा रंग नाहीसा झाला असून, भिंतीही जीर्ण झाल्या आहेत. पालिकेने बांधलेला गांडूळखत प्रकल्प हा अनेक दिवसांपासून बंद पडलेला आहे. मात्र बंद पडलेल्या या प्रकल्पाबाबत कोणतीच कार्यवाही अद्यापही पालिकेकडून करण्यात आलेली नाही. पालिकेकडून वर्षभरात शहरातील विविध विकासकामांवर ठराविक निधी खर्च करण्यात आला आहे. परंतु लोकप्रतिनिधींमधील अंतर्गत संघर्षामुळे एकही विकासकाम शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले नाही. शहरात अजूनही काही विकासकामे अपूर्ण अवस्थेतच आहेत. टाऊन हॉल गार्डन, शिवाजी क्रीडा संकुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण, कोल्हापूर नाका येथील स्वागत कमान, जलतरण तलाव, २४ बाय ७ योजना अशी अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत. जी विकासकामे झाली आहेत. त्याचा दर्जा चांगला नाही. त्यामुळे केलेल्या विकासकामांचे तीनतेरा वाजले आहेत. हीच परिस्थिती गांडूळखत प्रकल्पाची झाली आहे. अंतर्गत राजकारणामुळे प्रकल्पाचे तीनतेरा... पालिकेने उभारलेला गांडूळखत प्रकल्प सुरुवातील चांगल्या पद्धतीने सुरू होता. त्यातून पालिकेला चांगले उत्पन्न मिळत होते. मात्र, पालिकेतील राजकारणामुळे हा प्रकल्प बंद पडला आहे. त्याचा पालिकेला जास्त तोटा होत आहे. दोन्ही आघाड्यांकडून केल्या जाणाऱ्या राजकारणामुळे प्रकल्पाचे तीनतेरा वाजले असल्याचे स्थानिक नागरिकांतून सांगितले जात आहे.प्रकल्प पुन्हा सुरू होणे शक्य नाही !घनकचरा व्यवस्थापनासाठी सुमारे बारा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला गांडूळखत प्रकल्पअंतर्गत राजकारणामुळे बंद पडला. त्यानंतर प्रकल्प सुरू करण्याबाबत केवळ सभागृहात चर्चा होत गेली; मात्र प्रत्यक्ष कोणीही पुढाकार घेतला नाही. या प्रकल्प सुरू करण्यात अनेक अडचणी आहेत. त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा सुरू होणे शक्य नाही. इमारतीमध्ये साप अन् उंदरांचा खेळपालिकेच्या गांडूळ खत प्रकल्पातील प्रवेशद्वारालगत असलेल्या प्रकल्पाधिकाऱ्यांच्या इमातीचीही दुरवस्था झाली आहे. इमारतीचे दरवाजे मोडले असून, इमातीत साप, उंदराचा वावर होताना दिसून येत आहे.गांडूळखताच्या जाळीची दुरवस्था...गांडूळखत प्रकल्पातील खतनिर्मितीसाठी तयार करण्यात आलेली जाळीची किंमत जास्त असते. या जाळीमध्ये गांडूळखत तयार केले जाते. मात्र, बाराडबरी परिसरात बंद पडलेल्या गांडूळखत प्रकल्पातील जाळीची दुरवस्था झाली आहे.