शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

वेण्णा बोट क्लबमधील आर्थिक गळतीबाबत उचलले कडक पाऊल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 13:32 IST

परतीच्या पावसाने वेण्णा तलाव पून्हा पूर्ण क्षमतेने भरल्याने गळतीबाबत पालिका प्रशासन गंभीर नसलेतरी वेण्णा बोट क्लबमधील आर्थिक गळतीबाबत उशीरा का होईना प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. आर्थिक गळतीचा ठपका ठेऊन बोट क्लब अधीक्षकांसह कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईचे शहरातून स्वागत होत आहे.

ठळक मुद्देवेण्णा तलाव बोट क्लबमधील सर्व कर्मचाऱ्यांची बदलीमहाबळेश्वर नागरिकांकडून कारवाईचे स्वागत

महाबळेश्वर, दि. २१ : परतीच्या पावसाने वेण्णा तलाव पून्हा पूर्ण क्षमतेने भरल्याने गळतीबाबत पालिका प्रशासन गंभीर नसलेतरी वेण्णा बोट क्लबमधील आर्थिक गळतीबाबत उशीरा का होईना प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. आर्थिक गळतीचा ठपका ठेऊन बोट क्लब अधीक्षकांसह कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईचे शहरातून स्वागत होत आहे.

महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिध्द असलेले महाबळेश्वर येथील वेण्णा तलाव व परिसर हे येथे सहलीसाठी आलेल्या अबालवृध्द पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. येथे चटपटीत खाद्य पदार्थांची रेलचेल असून घोडदौडीचा आनंदही येथे पर्यटकांना लुटता येतो. याबरोबर पालिकेने येथे नौकाविहाराची सोयही उपलब्ध केली आहे.

हा बोट क्लब पालिकेच्या उपन्नाच्या प्रमुख साधनांपैकी एक आहे. दरवर्षी या बोटक्लबमधून साधारणत: तीन कोटी रूपयांचे उपन्न पालिकेला मिळते. या ठिकाणी नेमणूक मिळावी यासाठी कर्मचारी वर्गात लॉबिंग सुरू असते. सत्ताधारी गटाशी एकनिष्ठ असलेल्या कर्मचाऱ्यालाच याजागी नियुक्ती मिळते असे सांगितले जाते. या ठिकाणी अफरातफर करताना अनेकवेळा कर्मचाऱ्याना रंगेहात पकडण्यात आले आहे. परंतु, दरवेळी कर्मचारी आपली सुटका करून घेण्यात यशस्वी होतात.

आजपर्यंत अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न घटल्याचे वारंवार निर्दशनास आले आहे. तरीही केवळ समज देण्यापलीकडे पालिका प्रशासनाने काहीही केले नाही. मागील महिन्यातही असेच उत्पन्न घटल्याचे उघड झाले होते. मुख्याधिकाऱ्यानी संबंधित कर्मचाऱ्याना कार्यालयात बोलवून जाब विचारला. यावेळी केवळ समज देवून कर्मचाऱ्याना सोडण्यात आले. परंतु कोणावरही कारवाई करण्यात आली नव्हती.

कारवाई न करता सोडून देणे याचाच अर्थ भ्रष्ट कर्मचाऱ्याना पालिका प्रशासन पाठीशी घालत आहे, अशी टीका प्रशासनावर करण्यात येत होती. पालिका प्रशासन का बोटचेपे धोरण घेत आहे, असा प्रश्न नागरिक विचारीत होते. भ्रष्ट कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करता येत नसली तरी बोट क्लब विभागातून उचलबांगडी करून त्यांना दुसऱ्या विभागात का बदली केले जात नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जात होता.

उत्पन्न घटल्याचे उघडकीस येऊन दीड महिना उलटला तरी कोणावरही कारवाई न केल्याने सत्ताधारी गटातील नगरसेवकांमध्येही नाराजी पसरली होती. सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी नुकत्याच पार पडलेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्याना जाब विचारला.

सभेत नगराध्यक्षांच्या वतीने नगरसेवक कुमार शिंदे यांनी या विषयावर विशेष सभा व धोरणात्म निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. सत्ताधारी गटाबरोबरच विरोधी गटातील नगरसेवकांचा वाढता दबाव पाहता विशेष सभा घेण्यापूर्वीच पालिका प्रशासनाने या विभागातील उत्पन्न घटण्यास कारणीभूत असलेल्या कर्मचाऱ्याची बदली करण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :WaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका