शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
4
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
5
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
6
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
7
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
8
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
9
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
10
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
11
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
12
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
13
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
14
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
15
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
16
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
17
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
18
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
19
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
20
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!

वेण्णा बोट क्लबमधील आर्थिक गळतीबाबत उचलले कडक पाऊल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 13:32 IST

परतीच्या पावसाने वेण्णा तलाव पून्हा पूर्ण क्षमतेने भरल्याने गळतीबाबत पालिका प्रशासन गंभीर नसलेतरी वेण्णा बोट क्लबमधील आर्थिक गळतीबाबत उशीरा का होईना प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. आर्थिक गळतीचा ठपका ठेऊन बोट क्लब अधीक्षकांसह कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईचे शहरातून स्वागत होत आहे.

ठळक मुद्देवेण्णा तलाव बोट क्लबमधील सर्व कर्मचाऱ्यांची बदलीमहाबळेश्वर नागरिकांकडून कारवाईचे स्वागत

महाबळेश्वर, दि. २१ : परतीच्या पावसाने वेण्णा तलाव पून्हा पूर्ण क्षमतेने भरल्याने गळतीबाबत पालिका प्रशासन गंभीर नसलेतरी वेण्णा बोट क्लबमधील आर्थिक गळतीबाबत उशीरा का होईना प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. आर्थिक गळतीचा ठपका ठेऊन बोट क्लब अधीक्षकांसह कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईचे शहरातून स्वागत होत आहे.

महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिध्द असलेले महाबळेश्वर येथील वेण्णा तलाव व परिसर हे येथे सहलीसाठी आलेल्या अबालवृध्द पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. येथे चटपटीत खाद्य पदार्थांची रेलचेल असून घोडदौडीचा आनंदही येथे पर्यटकांना लुटता येतो. याबरोबर पालिकेने येथे नौकाविहाराची सोयही उपलब्ध केली आहे.

हा बोट क्लब पालिकेच्या उपन्नाच्या प्रमुख साधनांपैकी एक आहे. दरवर्षी या बोटक्लबमधून साधारणत: तीन कोटी रूपयांचे उपन्न पालिकेला मिळते. या ठिकाणी नेमणूक मिळावी यासाठी कर्मचारी वर्गात लॉबिंग सुरू असते. सत्ताधारी गटाशी एकनिष्ठ असलेल्या कर्मचाऱ्यालाच याजागी नियुक्ती मिळते असे सांगितले जाते. या ठिकाणी अफरातफर करताना अनेकवेळा कर्मचाऱ्याना रंगेहात पकडण्यात आले आहे. परंतु, दरवेळी कर्मचारी आपली सुटका करून घेण्यात यशस्वी होतात.

आजपर्यंत अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न घटल्याचे वारंवार निर्दशनास आले आहे. तरीही केवळ समज देण्यापलीकडे पालिका प्रशासनाने काहीही केले नाही. मागील महिन्यातही असेच उत्पन्न घटल्याचे उघड झाले होते. मुख्याधिकाऱ्यानी संबंधित कर्मचाऱ्याना कार्यालयात बोलवून जाब विचारला. यावेळी केवळ समज देवून कर्मचाऱ्याना सोडण्यात आले. परंतु कोणावरही कारवाई करण्यात आली नव्हती.

कारवाई न करता सोडून देणे याचाच अर्थ भ्रष्ट कर्मचाऱ्याना पालिका प्रशासन पाठीशी घालत आहे, अशी टीका प्रशासनावर करण्यात येत होती. पालिका प्रशासन का बोटचेपे धोरण घेत आहे, असा प्रश्न नागरिक विचारीत होते. भ्रष्ट कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करता येत नसली तरी बोट क्लब विभागातून उचलबांगडी करून त्यांना दुसऱ्या विभागात का बदली केले जात नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जात होता.

उत्पन्न घटल्याचे उघडकीस येऊन दीड महिना उलटला तरी कोणावरही कारवाई न केल्याने सत्ताधारी गटातील नगरसेवकांमध्येही नाराजी पसरली होती. सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी नुकत्याच पार पडलेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्याना जाब विचारला.

सभेत नगराध्यक्षांच्या वतीने नगरसेवक कुमार शिंदे यांनी या विषयावर विशेष सभा व धोरणात्म निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. सत्ताधारी गटाबरोबरच विरोधी गटातील नगरसेवकांचा वाढता दबाव पाहता विशेष सभा घेण्यापूर्वीच पालिका प्रशासनाने या विभागातील उत्पन्न घटण्यास कारणीभूत असलेल्या कर्मचाऱ्याची बदली करण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :WaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका