शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

विक्रेत्यांचे भाजी खरेदी-विक्री बंद आंदोलन

By admin | Updated: March 22, 2017 23:00 IST

म्हणे... सहा टक्के अडत विरोधात परवडत नाही : बाजार समिती प्रशासनास निवेदन; कऱ्हाडात भाज्यांचे दरही कडाडले

कऱ्हाड : गेल्या सहा महिन्यांपासून शेतीमाल खरेदी-विक्री नियमन मुक्त झाल्यापासून खरेदीदारांवर सरकारने नाशवंत मालावर सहा टक्के अडतीचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाने विके्रत्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे कारण पुढे करीत कऱ्हाड शहरातील फळे, भाजीपाला किरकोळ विक्रेता संघटनेच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून खरेदी व विक्री बंद आंदोलन सुरू केल्याने ग्राहकांची कोंडी झाली आहे. कऱ्हाड हे व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे शहर मानले जाते. विद्यानगरी असणाऱ्या कऱ्हाड शहर व परिसरात नागरिकरण झपाट्याने वाढत आहे. त्यांची भूक भागविण्याचे काम शेतकऱ्यांबरोबर किरकोळ भाजीपाला विक्रेतेही करीत आलेले आहेत. शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दररोज पहाटे आलेल्या मालाचा लिलाव होतो. हा शेतीमाल, भाजीपाला हे किरकोळ विक्रेते खरेदी करतात. आणि दिवसभर मंडई परिसरात त्याची विक्री करीत असतात.यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांची उपजीविका चालत असते. परंतु सहा महिन्यांपासून शासनाने शेतीमाल खरेदी-विक्री नियमन मुक्ती केली असून, किरकोळ विक्रेत्यांनी खरेदी करणाऱ्या मालावर सहा टक्के अडतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या व्यापाऱ्यांची कोंडी होऊन बसली आहे.कऱ्हाड येथील मार्केटच्या स्पर्धेत सांगली, मिरज, वडगाव, जयसिंगपूर, कुरुंदवाड, कोल्हापूर, निपाणी, संकेश्वर, घटप्रभा, बेळगाव ही मार्केट आहेत. या मार्केटमधून येणाऱ्या मालाच्या स्पर्धेत विक्री करताना कऱ्हाडचा विक्रेता टिकत नसल्याचे मत येथील किरकोळ व्यापारी व्यक्त करीत आहेत. यातून योग्य निर्णय निघावा यासाठी त्यांनी माल खरेदी व विक्री बंदचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी) बाजार समितीकडून दखल नाही...सहा टक्के अडतीचा निर्णय हा किरकोळ व्यापाऱ्यांवर अन्यायकारक असून, यावर योग्य तो तोडगा काढावा याबाबत किरकोळ व्यापाऱ्यांच्या संघटनेने कृषी उत्पन्न बाजार समिती कऱ्हाडकडे एक निवेदन दिले आहे. यावेळी दीपक जगताप, संजय बुचडे, भगवान पिसाळ, विजय माळी, अरुणा कांबळे, कय्युम बागवान, अमोल धोंडूगडे, नंदकुमार गुरव, अविनाश कवडे, सोमनाथ पवार, संतोष सावंत, आनंदा कदम, शामराव होगाडे आदींसह किरकोळ भाजी विक्रे ते व्यापारी उपस्थित होते. या निवेदनाद्वारे खरेदी बंद करण्याचा निर्णयही त्यांनी कळविला आहे. मात्र, बाजार समितीकडून याची दखल घेतली गेलेली दिसत नाही. भाज्यांचे दर कडाडलेसध्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. भाजीपाल्यांचे प्रमाण कमी असल्याने त्याचा तुटवडा मार्केटमध्ये जाणवत आहे. त्यातच किरकोळ विक्रेत्यांनी मालाची खरेदी आणि विक्री बंद केल्याने सध्या थेट शेतकरीच काही प्रमाणात भाजीपाला विकताना दिसतात. परिणामी भाज्यांचे दर कडाडल्याचे समजते. त्यामुळे सामान्य ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.