शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यातली भाजी चक्क बाजारपेठेत विक्रीला ! साताऱ्यातील प्रकार : अंधाराचा आसरा घेऊन सुरू आहे बिनभांडवली धंदा; आरोग्याचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:13 IST

सातारा : व्यापारी आणि शेतकºयांनी टाकून दिलेल्या भाजीतून निवडक भाजी पुन्हा एकदा विक्रीसाठी मंडईत येऊ लागली आहे.

सातारा : व्यापारी आणि शेतकºयांनी टाकून दिलेल्या भाजीतून निवडक भाजी पुन्हा एकदा विक्रीसाठी मंडईत येऊ लागली आहे. दिवसभर मिळेल ते काम करणं आणि संध्याकाळी मंडईच्या कचराकुंडी लगत पडलेली भाजी वेचून त्याची विक्री करणं, हा वयस्क महिला आणि पुरुषांचा व्यवसाय बनू लागल्याची धक्कादायक बाब उघड झालीआहे.

साताऱ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत भल्या पहाटे शेतकऱ्यासह व्यापाºयांची गर्दी असते. रविवार आणि गुरुवार या आठवड्यातून दोन दिवस मंडईचे असले तरीही रोज सकाळी ताजी मंडई नेणाºयांचे प्रमाणही आता वाढू लागले आहे. सकाळी सहा ते नऊ या वेळेत ही मंडई भरलेली असते. त्यानंतर मात्र शेतकरी शिल्लक राहिलेला खराब माल रस्त्यालगत किंवा कचराकुंडी शेजारी जनावरांना खायला पाला म्हणून टाकून जातो. नेमकं याच ठिकाणी जाऊन या महिला घाणीतील त्यातील बरी असलेली भाजी गोळा करून पिशवीत भरतात. त्यांचा हा बिनभांडवली अनेक सामान्यांच्या प्रकृतीवर आघात करणारा ठरू शकतो.सकाळ होताच बाजार समितीत एन्ट्रीसकाळी नऊ वाजता मंडई उठली की या महिलांची बाजार समितीत एन्ट्री होते. त्यानंतर कचराकुंडी शेजारून गोळा केलेली भाजी, पिकलेली वांगी, डागाळलेला फ्लॉवर, तुकडे झालेल्या हिरव्या मिरच्या, नरमलेली मेथी आदी भाज्या त्या त्यांच्या बॅगमध्ये ठेवतात. सरासरी पन्नास ते शंभर रुपयांची भाजी गोळा केल्याशिवाय त्या हा परिसर सोडत नाहीत. रात्री अंधाराचा आसरा घेऊन या महिला भाजी विक्रीसाठी बसतात.हेडलाईटच्या उजेडात विक्रीमंडईतून गोळा करण्यात आलेली ही भाजी प्रकाशात खराब झालेली दिसते. भाजीचे खरे स्वरूप लक्षात येऊ नये म्हणून या वयस्कर महिला राजवाडा बसस्थानकापाशी अंधारात बसतात. अनेकदा गरिबाला मदत करण्याच्या उद्देशाने येथे भाजी खरेदी करणारे ग्राहक येतात. फसवणूक झाल्याचे घरी गेल्यावर लक्षात येते.म्हणून एवढीच भाजीअंधारात बसलेल्या या भाजी विक्रेत्यांना एवढी कमी भाजी घेऊन का बसता? असे विचारल्यावर त्या, ‘भाजी विकत घ्यायला पैसं न्हाईत. होत्या तेवढ्या पैशात एवढीच भाजी आली. म्हणून मग एवढीच भाजी आणली विकायला’, असे स्वच्छ उत्तर अत्यंत निरंक चेहºयाने त्या देतात.