शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

भाजी झाली राजी; फळांची मात्र नाराजी

By admin | Updated: October 27, 2014 23:45 IST

राजवाडा मंडई : रस्त्यावरच ठाण मांडून बसण्याची जुनी सवय मोडण्यावर पालिकेचा भर; फळविक्रेत्यांची मात्र चुळबूळ

सातारा : राजवाडा परिसरात पादचारी मार्गांवर अतिक्रमण करून फळविक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या स्थलांतराचा विषय ऐरणीवर आला आहे. याच परिसरात उभारलेल्या फू्रट मार्केटमध्ये त्यांना कट्टे देण्यात येणार आहेत. मात्र, हे मार्केट दुसऱ्या मजल्यावर असल्याने त्या ठिकाणी व्यवसाय होणार कसा? असा प्रश्न या विक्रेत्यांनी उपस्थित केला असल्याने भाजी झाली राजी; मात्र फळांची नाराजी!, असे चित्र निर्माण झाले आहे.राजवाड्यापासून कमानी हौदापर्यंतच्या फळविक्रेत्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्याच्या हेतूने राजवाड्यावर प्रतापसिंह महाराज भाजी मंडई व फ्रूट मार्केटची इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन होऊन बराच कालावधी उलटला तरी भाजी व फळविक्रेत्यांना कट्टे वाटप झालेले नव्हते. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर आज (मंगळवारी) भाजी विक्रेत्यांना कट्टे वाटप करण्यात येणार आहेत. त्याबाबतची सोडत काढण्यात येणार आहे. याठिकाणी १२३ भाजी विक्रेत्यांची सोय होणार आहे.दरम्यान, फळविक्रेत्यांना या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जागा देण्यात येणार आहे. सध्या राजवाड्यासमोरील फूटपाथ तसेच कमानी हौदापर्यंत जागा मिळेल, त्या ठिकाणी बसून फळविक्री केली जाते. पादचारी मार्गाचा वापर यासाठी होत असल्याने पादचाऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे.या परिस्थितीमध्ये फळविक्रेत्यांचेही नव्या इमारतीत स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, फळविक्रेत्यांना दुसऱ्या मजल्यावर जागा दिली जाणार असल्याने ४0 पायऱ्या चढून फळ खरेदीला कोण येणार?, असा प्रश्न या विक्रेत्यांना भेडसावत आहे. भाजी विक्रेत्यांच्या कट्ट्यांमधील काही कट्टे फळविक्रेत्यांना दिल्यास व्यवसाय होऊ शकेल, असा त्यांचा युक्तिवाद आहे. त्याऐवजी दुसरी सोयीची जागा पालिकेने उपलब्ध करून दिल्यास रस्त्यावरील विक्री बंद करण्यात येईल, असे फळविक्रेत्यांनी स्पष्ट केले आहे. फळ विक्रीच्या कट्ट्यांची रुंदीही कमी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मालाची ने-आण करतानाही गैरसोय होणार आहे, असे फळविक्रेते सांगतात. फळविक्रीसाठी फूटपाथ हायजॅक झाल्याने पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यांवरुन चालावे लागते. याच रस्त्यातून वाहनांचीही ये-जा सुरु असते. त्यामुळे कोंडीत भर पडते. पालिका प्रशासन याबाबत काय निर्णय घेते? याची उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)जनावराचा दवाखाना व पार्किंग, सदाशिव पेठेतील जुन्या किंवा नव्या भाजी मंडईत फळविक्रेत्यांची सोय करावी, अशी मागणी आहे.फूटपाथवरील फळविक्रेत्यांच्या अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर आहे. जिथे चौपाटी तिथे फळविक्रेत्यांना जागा देण्याची मागणी केली जात आहे. फ्रूट मार्केट बांधले असल्याने प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचीच शक्यता दाट आहे.रस्त्यावर होईल तेवढा व्यवसाय चांगला होणार आहे. वादाचा कुठलाच मुद्दा नाही. माल दहा डाग आला तर ओझं ४0 पायऱ्या चढून न्यायला लागतं. ग्राहक दहा रुपयांची केळी न्यायला कोण येणार नाही. याचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे. पूर्ण देशात अशी मंडई कुठेच नाही.- अस्लम बागवान, फळविक्रेता