शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

भाजी झाली राजी; फळांची मात्र नाराजी

By admin | Updated: October 27, 2014 23:45 IST

राजवाडा मंडई : रस्त्यावरच ठाण मांडून बसण्याची जुनी सवय मोडण्यावर पालिकेचा भर; फळविक्रेत्यांची मात्र चुळबूळ

सातारा : राजवाडा परिसरात पादचारी मार्गांवर अतिक्रमण करून फळविक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या स्थलांतराचा विषय ऐरणीवर आला आहे. याच परिसरात उभारलेल्या फू्रट मार्केटमध्ये त्यांना कट्टे देण्यात येणार आहेत. मात्र, हे मार्केट दुसऱ्या मजल्यावर असल्याने त्या ठिकाणी व्यवसाय होणार कसा? असा प्रश्न या विक्रेत्यांनी उपस्थित केला असल्याने भाजी झाली राजी; मात्र फळांची नाराजी!, असे चित्र निर्माण झाले आहे.राजवाड्यापासून कमानी हौदापर्यंतच्या फळविक्रेत्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्याच्या हेतूने राजवाड्यावर प्रतापसिंह महाराज भाजी मंडई व फ्रूट मार्केटची इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन होऊन बराच कालावधी उलटला तरी भाजी व फळविक्रेत्यांना कट्टे वाटप झालेले नव्हते. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर आज (मंगळवारी) भाजी विक्रेत्यांना कट्टे वाटप करण्यात येणार आहेत. त्याबाबतची सोडत काढण्यात येणार आहे. याठिकाणी १२३ भाजी विक्रेत्यांची सोय होणार आहे.दरम्यान, फळविक्रेत्यांना या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जागा देण्यात येणार आहे. सध्या राजवाड्यासमोरील फूटपाथ तसेच कमानी हौदापर्यंत जागा मिळेल, त्या ठिकाणी बसून फळविक्री केली जाते. पादचारी मार्गाचा वापर यासाठी होत असल्याने पादचाऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे.या परिस्थितीमध्ये फळविक्रेत्यांचेही नव्या इमारतीत स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, फळविक्रेत्यांना दुसऱ्या मजल्यावर जागा दिली जाणार असल्याने ४0 पायऱ्या चढून फळ खरेदीला कोण येणार?, असा प्रश्न या विक्रेत्यांना भेडसावत आहे. भाजी विक्रेत्यांच्या कट्ट्यांमधील काही कट्टे फळविक्रेत्यांना दिल्यास व्यवसाय होऊ शकेल, असा त्यांचा युक्तिवाद आहे. त्याऐवजी दुसरी सोयीची जागा पालिकेने उपलब्ध करून दिल्यास रस्त्यावरील विक्री बंद करण्यात येईल, असे फळविक्रेत्यांनी स्पष्ट केले आहे. फळ विक्रीच्या कट्ट्यांची रुंदीही कमी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मालाची ने-आण करतानाही गैरसोय होणार आहे, असे फळविक्रेते सांगतात. फळविक्रीसाठी फूटपाथ हायजॅक झाल्याने पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यांवरुन चालावे लागते. याच रस्त्यातून वाहनांचीही ये-जा सुरु असते. त्यामुळे कोंडीत भर पडते. पालिका प्रशासन याबाबत काय निर्णय घेते? याची उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)जनावराचा दवाखाना व पार्किंग, सदाशिव पेठेतील जुन्या किंवा नव्या भाजी मंडईत फळविक्रेत्यांची सोय करावी, अशी मागणी आहे.फूटपाथवरील फळविक्रेत्यांच्या अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर आहे. जिथे चौपाटी तिथे फळविक्रेत्यांना जागा देण्याची मागणी केली जात आहे. फ्रूट मार्केट बांधले असल्याने प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचीच शक्यता दाट आहे.रस्त्यावर होईल तेवढा व्यवसाय चांगला होणार आहे. वादाचा कुठलाच मुद्दा नाही. माल दहा डाग आला तर ओझं ४0 पायऱ्या चढून न्यायला लागतं. ग्राहक दहा रुपयांची केळी न्यायला कोण येणार नाही. याचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे. पूर्ण देशात अशी मंडई कुठेच नाही.- अस्लम बागवान, फळविक्रेता