शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

पावसाच्या पाण्याने पालेभाज्या चिंब... दरवाढीने ग्राहकांची बोंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 17:18 IST

गत सप्ताहात पावसाने झोडपून काढल्याने कोथिंबीर, पालक आणि मेथी शेतात पाणी भरल्याने कुजल्या. त्याचा परिणाम बाजारपेठेत दिसत आहे. या दिवसांत मुबलक असणाºया या पालेभाज्यांनी पन्नाशी गाठली आहे. पावसाच्या पाण्याने पालेभाज्या चिंब झाल्या तर दरवाढीने ग्राहकांची मात्र बोंब झाली.

ठळक मुद्देकोथिंबीरसह मेथी, पालकचे दर पन्नाशीकडेलसणी मेथी, पालक पनीर... सध्या नाहीच!पाण्यात बुडून या भाज्या शेतातच कुजल्यापालेभाज्यांनी गाठली पन्नाशी

सातारा, दि. ३  : गत सप्ताहात पावसाने झोडपून काढल्याने कोथिंबीर, पालक आणि मेथी शेतात पाणी भरल्याने कुजल्या. त्याचा परिणाम बाजारपेठेत दिसत आहे. या दिवसांत मुबलक असणाºया या पालेभाज्यांनी पन्नाशी गाठली आहे. पावसाच्या पाण्याने पालेभाज्या चिंब झाल्या तर दरवाढीने ग्राहकांची मात्र बोंब झाली.

दसरा, दिवाळीत साताºयाच्या बाजारपेठेत कोथिंबीर, मेथी आणि पालक या पालेभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. अंतरपीक म्हणून या तिन्ही भाज्या घेण्याकडे शेतकºयांचा कल असतो. शहर व परिसरातील शेतकरी या पालेभाज्या घेऊन शहरात विक्रीस आणतात. पण पितृपक्ष पंधरवड्यानंतर सलग लागून राहिलेल्या पावसात या भाज्या चांगल्या उगवून आल्या. त्यानंतर नवरात्रीत तिसºया माळेपर्यंत धो-धो कोसळणाºया पावसाने या पिकांचे नुकसान केले.

जमिनीला लागून काही इंचावर असणाºया या भाज्या पावसाचा मार सोसू शकल्या नाहीत. त्यामुळे मातीत पडून आणि पाण्यात बुडून या भाज्या शेतातच कुजल्या. परिणामी दसºयाच्या दरम्यान या भाज्या बाजारपेठेतून गायबच झाल्या होत्या. 

रविवारी जिल्ह्याच्या दुसºया टोकापासून प्रवास करून आलेल्या कोथिंबीर, मेथी आणि पालकने मात्र भलताच भाव खालला. दसºया दिवशी आणि रविवारी झक्कास जेवणाचा बेत करण्यासाठी कोथिंबीर आणायला गेलेल्यांना दर ऐकून अंगावर शहारे आले.

सुकलेल्या आणि निस्तेज अशा चार काड्यांचा दर दहा आणि पंधरा रुपये चालला होता. त्यातल्या त्यात बरी पालेभाजी ३० आणि ३५ रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होती. चांगल्या दर्जाची पालेभाजी मात्र पन्नासच्या खाली कोणीही द्यायला तयार नव्हते.

लसणी मेथी, पालक पनीर... सध्या नाहीच!साताºयात मेथीची भाजी विविध पद्धतीने खाणारे खवय्ये आहेत. शहर व परिसरातील हॉटेलमध्ये लसणी मेथी, मेथीचं पिठलं, पालक पनीर यांसारखे पदार्थ खाण्यास पसंती दिली जाते. बाजारपेठेतील या दरवाढीमुळे काही हॉटेल व्यावसायिकांनी हे पदार्थ न करण्याचा निर्णय घेतला आहे. मसाला पापड, व्हेज मंजुरियन सारख्या पदार्थांवर कोथिंबीरची जागा बारीक चिरलेल्या कोबीने घेतल्याचे पाहायला मिळते.

मंडईतील पालेभाज्यांचे दर चांगलेच वधारले आहेत. त्यामुळे जेवणात सुकी भाजी म्हणून आता कडधान्यांच्या उसळी आणि सॅलेडवर सध्या भर दिला आहे. त्याबरोबरचं लोणचं आणि चटणीचा आधार आहे. - चंद्रकांत कुलकर्णी, सातारा.