शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

राज्य सरकार गाफील राहिल्यानेच 'वेदांता' गुजरातला!, माजी मंत्री बाळासाहेब पाटलांची टीका

By प्रमोद सुकरे | Updated: September 16, 2022 16:20 IST

सण, उत्सव हे साजरे झालेच पाहिजेत. पण त्याला किती वेळ द्यायचा हे ठरविले पाहिजे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या सरकारने अधिक वेळ दिला पाहिजे.

कराड : सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत हे दोघेही महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. वेदांता प्रकल्पाचा विषय हा त्यावेळचा आहे. तो सर्वांना चांगला माहित आहे. सर्च रिपोर्ट मध्ये सुद्धा या प्रकल्पासाठी महाराष्ट्रालाच पसंती होती. पण राज्यातील सरकार गाफील राहिल्यानेच हा प्रकल्प गुजरातला गेला. त्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. अशी टीका राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना केली.बाळासाहेब पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरातकडे मोठा ओढा आहे. त्यामुळेच हा प्रकल्प इतर कोणत्याही राज्यात न जाता गुजरातला गेला आहे. तुम्हाला दुसरा मोठा प्रकल्प देतो असे सांगून सध्या सरकारची बोळवण सुरू आहे.नव्या सरकारच्या कारभारावर बोलताना पाटील म्हणाले, सण, उत्सव हे साजरे झालेच पाहिजेत. पण त्याला किती वेळ द्यायचा हे ठरविले पाहिजे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या सरकारने अधिक वेळ दिला पाहिजे. आज लंपी सारख्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना अजून पालकमंत्र्यांच्या नियुक्या झालेल्या नाहीत. सरकारचा कारभार गतिमान करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार  आवश्यक आहे. पण त्याकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही असेही ते म्हणाले.त्यांचा राग कोणावर आहे हे सर्वांना माहीतकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर, ४ वेळा मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रासाठी भरीव काही केले नाही. अशी टीका केली आहे. याबाबत छेडले असता बाळासाहेब पाटील म्हणाले, ते माजी मुख्यमंत्री आहेत; त्यांच्याविषयी मी काय बोलणार? पण त्यांचा शिवसेना, काँग्रेस व आता भाजप असा झालेला प्रवास पाहता त्यांचा राग कोणावर आहे हे सर्वांना माहीत असल्याचेही त्यांनी सांगितले.बाजार समितीला सरसकट शेतकरी मतदार परवडणार नाहीशेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका नजीकच्या काळात होऊ घातल्या आहेत. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सोसायटी संचालक व ग्रामपंचायत सदस्य हेच त्याचे मतदार असतील असे वाटते. पण या सरकारने जर सर्व शेतकऱ्यांना याचे मतदार करून निवडणुका घेण्याचा प्रयत्न केला तर ते बाजार समित्यांना आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही .असे मतही माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले.माझी तयारी कायमच सुरू असते!कराड बाजार समितिच्या निवडणूकीसाठी तुमची सध्या काय तयारी सुरू आहे? याबाबत विचारले असता, निवडणुका आल्यावर मी त्याची तयारी करीत नाही. तर माझी कायमच तयारी सुरू असते असे सांगत बाळासाहेब पाटील यांनी बाजार समिती निवडणूक कधीही लागू द्या आपण सज्ज आहोत असेच संकेत दिले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBalasaheb Patilबाळासाहेब पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदे