शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकार गाफील राहिल्यानेच 'वेदांता' गुजरातला!, माजी मंत्री बाळासाहेब पाटलांची टीका

By प्रमोद सुकरे | Updated: September 16, 2022 16:20 IST

सण, उत्सव हे साजरे झालेच पाहिजेत. पण त्याला किती वेळ द्यायचा हे ठरविले पाहिजे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या सरकारने अधिक वेळ दिला पाहिजे.

कराड : सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत हे दोघेही महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. वेदांता प्रकल्पाचा विषय हा त्यावेळचा आहे. तो सर्वांना चांगला माहित आहे. सर्च रिपोर्ट मध्ये सुद्धा या प्रकल्पासाठी महाराष्ट्रालाच पसंती होती. पण राज्यातील सरकार गाफील राहिल्यानेच हा प्रकल्प गुजरातला गेला. त्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. अशी टीका राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना केली.बाळासाहेब पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरातकडे मोठा ओढा आहे. त्यामुळेच हा प्रकल्प इतर कोणत्याही राज्यात न जाता गुजरातला गेला आहे. तुम्हाला दुसरा मोठा प्रकल्प देतो असे सांगून सध्या सरकारची बोळवण सुरू आहे.नव्या सरकारच्या कारभारावर बोलताना पाटील म्हणाले, सण, उत्सव हे साजरे झालेच पाहिजेत. पण त्याला किती वेळ द्यायचा हे ठरविले पाहिजे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या सरकारने अधिक वेळ दिला पाहिजे. आज लंपी सारख्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना अजून पालकमंत्र्यांच्या नियुक्या झालेल्या नाहीत. सरकारचा कारभार गतिमान करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार  आवश्यक आहे. पण त्याकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही असेही ते म्हणाले.त्यांचा राग कोणावर आहे हे सर्वांना माहीतकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर, ४ वेळा मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रासाठी भरीव काही केले नाही. अशी टीका केली आहे. याबाबत छेडले असता बाळासाहेब पाटील म्हणाले, ते माजी मुख्यमंत्री आहेत; त्यांच्याविषयी मी काय बोलणार? पण त्यांचा शिवसेना, काँग्रेस व आता भाजप असा झालेला प्रवास पाहता त्यांचा राग कोणावर आहे हे सर्वांना माहीत असल्याचेही त्यांनी सांगितले.बाजार समितीला सरसकट शेतकरी मतदार परवडणार नाहीशेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका नजीकच्या काळात होऊ घातल्या आहेत. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सोसायटी संचालक व ग्रामपंचायत सदस्य हेच त्याचे मतदार असतील असे वाटते. पण या सरकारने जर सर्व शेतकऱ्यांना याचे मतदार करून निवडणुका घेण्याचा प्रयत्न केला तर ते बाजार समित्यांना आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही .असे मतही माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले.माझी तयारी कायमच सुरू असते!कराड बाजार समितिच्या निवडणूकीसाठी तुमची सध्या काय तयारी सुरू आहे? याबाबत विचारले असता, निवडणुका आल्यावर मी त्याची तयारी करीत नाही. तर माझी कायमच तयारी सुरू असते असे सांगत बाळासाहेब पाटील यांनी बाजार समिती निवडणूक कधीही लागू द्या आपण सज्ज आहोत असेच संकेत दिले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBalasaheb Patilबाळासाहेब पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदे