शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

राज्य सरकार गाफील राहिल्यानेच 'वेदांता' गुजरातला!, माजी मंत्री बाळासाहेब पाटलांची टीका

By प्रमोद सुकरे | Updated: September 16, 2022 16:20 IST

सण, उत्सव हे साजरे झालेच पाहिजेत. पण त्याला किती वेळ द्यायचा हे ठरविले पाहिजे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या सरकारने अधिक वेळ दिला पाहिजे.

कराड : सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत हे दोघेही महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. वेदांता प्रकल्पाचा विषय हा त्यावेळचा आहे. तो सर्वांना चांगला माहित आहे. सर्च रिपोर्ट मध्ये सुद्धा या प्रकल्पासाठी महाराष्ट्रालाच पसंती होती. पण राज्यातील सरकार गाफील राहिल्यानेच हा प्रकल्प गुजरातला गेला. त्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. अशी टीका राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना केली.बाळासाहेब पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरातकडे मोठा ओढा आहे. त्यामुळेच हा प्रकल्प इतर कोणत्याही राज्यात न जाता गुजरातला गेला आहे. तुम्हाला दुसरा मोठा प्रकल्प देतो असे सांगून सध्या सरकारची बोळवण सुरू आहे.नव्या सरकारच्या कारभारावर बोलताना पाटील म्हणाले, सण, उत्सव हे साजरे झालेच पाहिजेत. पण त्याला किती वेळ द्यायचा हे ठरविले पाहिजे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या सरकारने अधिक वेळ दिला पाहिजे. आज लंपी सारख्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना अजून पालकमंत्र्यांच्या नियुक्या झालेल्या नाहीत. सरकारचा कारभार गतिमान करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार  आवश्यक आहे. पण त्याकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही असेही ते म्हणाले.त्यांचा राग कोणावर आहे हे सर्वांना माहीतकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर, ४ वेळा मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रासाठी भरीव काही केले नाही. अशी टीका केली आहे. याबाबत छेडले असता बाळासाहेब पाटील म्हणाले, ते माजी मुख्यमंत्री आहेत; त्यांच्याविषयी मी काय बोलणार? पण त्यांचा शिवसेना, काँग्रेस व आता भाजप असा झालेला प्रवास पाहता त्यांचा राग कोणावर आहे हे सर्वांना माहीत असल्याचेही त्यांनी सांगितले.बाजार समितीला सरसकट शेतकरी मतदार परवडणार नाहीशेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका नजीकच्या काळात होऊ घातल्या आहेत. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सोसायटी संचालक व ग्रामपंचायत सदस्य हेच त्याचे मतदार असतील असे वाटते. पण या सरकारने जर सर्व शेतकऱ्यांना याचे मतदार करून निवडणुका घेण्याचा प्रयत्न केला तर ते बाजार समित्यांना आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही .असे मतही माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले.माझी तयारी कायमच सुरू असते!कराड बाजार समितिच्या निवडणूकीसाठी तुमची सध्या काय तयारी सुरू आहे? याबाबत विचारले असता, निवडणुका आल्यावर मी त्याची तयारी करीत नाही. तर माझी कायमच तयारी सुरू असते असे सांगत बाळासाहेब पाटील यांनी बाजार समिती निवडणूक कधीही लागू द्या आपण सज्ज आहोत असेच संकेत दिले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBalasaheb Patilबाळासाहेब पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदे