शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

वाठारला माणशी तीन लिटर पाणी...

By admin | Updated: January 11, 2016 00:50 IST

जादा टँकरची मागणी : आगामी काळात वाग्देव महाराज रथोत्सव; जनावरांचा बाजार

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन गावचा पाणी प्रश्न अनेक वर्षांपासून गंभीर बनला आहे. सहा हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला बाराही महिने खासगी टँकरकडून पाणीविकत घ्यावे लागत आहे. गावाने आता काही नवीन योजना राबविण्याचे काम हाती घेतले असले तरी सध्या भेडसावणाऱ्या पाणी टंचाईबाबत शासन मात्र या गावची चेष्टा करण्याचे काम करत आहे. या गावाला दररोज लागणाऱ्या पाण्याची गरज पाहता एका माणसाला केवळ तीन लिटर पाणी उपलब्ध होत आहे. वाठार स्टेशन गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर देऊर येथील तळहिरा धरणाखाली आहे. मात्र गेल्या पाच या वर्षांत या धरणातच पाणी नसल्याने ही विहीर कोरडी पडली आहे. यामुळे वाठार स्टेशनला गेली कित्येक दिवसांपासून खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामपंचायतीने शासनाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रस्ताव देऊनही अद्याप या गावचा पाणी प्रश्न सुटलेला नाही. ग्रामपंचायतीने काही महिन्यांपूर्वी कोरेगाव तहसीलदार, तसेच गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांच्याकडे पाण्यासाठी प्रस्ताव पाठवले होते. त्यानुसार दररोज वीस हजार लिटर क्षमतेच्या सहा खेपा मागण्यात आल्या होत्या; परंतु प्रत्यक्षात दहा हजार लिटरचे सहा टँकर सुरू करण्यात आले होते. मात्र गेल्या आठवड्यात या सहांपैकी केवळ दोन टँकरद्वारे पाणी गावाला दिले जात आहे. त्यामुळे सध्या वाठार स्टेशन गावाला पाण्याची मोठी टंचाई जाणवत आहे. वाठार स्टेशनचा समर्थ वाग्देव महाराजांचा रथोत्सव दि. २२ जानेवारीपासून सुरू होणार आहे. तसेच या रथोत्सवानिमित्त होणारा जनावरांचा वार्षिक बाजारही दि. १३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. पाण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी या काळात वाढीव सहा खेपा सुरू कराव्यात, अशी मागणी नुकतीच कोरेगावच्या तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना करण्यात आली आहे. याबाबत शासनाने तातडीने लक्ष घालून वाढीव पाण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. याबाबत वाढीव पाणी मिळण्यासाठी पाठपुरावा करूनही ते उपलब्ध होत नसल्याच्या भावना वाठार स्टेशन ग्रामस्थांतून व्यक्त होत आहेत. (वार्ताहर) दि.१३ ते २४ जानेवारी यादरम्यान, वाग्देव महाराजांचा रथोत्सव व जनावरांचा बाजार आहे. यामुळे वाठार स्टेशनमध्ये पाण्याची गैरसोय होऊ नये. याबाबत शासनाने पाणी टँकरमध्ये वाढ करावी. नवीन टँकरद्वारे या काळात पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निवेदन आम्ही संबंधितांना दिले आहे.- महेश लोंढे, सरपंच वाठार स्टेशन कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात पाण्याची समस्या कायम असते. त्यामुळे येथील जनतेला पाणीटंचाई सतत भासत असते. या भागातीलच वाठार स्टेशन हे महत्वाचे व मध्यवर्ती गाव आहे. तसेच येथे रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे नागरिकांची गर्दी असते. मात्र, येथे पाण्याची टंचाई नेहमीच असते. वर्षातून काही महिने येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. येथील पाण्याची समस्या कायमस्वरुपी संपविण्याची मागणी होत आहे.