शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

वाठारला माणशी तीन लिटर पाणी...

By admin | Updated: January 11, 2016 00:50 IST

जादा टँकरची मागणी : आगामी काळात वाग्देव महाराज रथोत्सव; जनावरांचा बाजार

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन गावचा पाणी प्रश्न अनेक वर्षांपासून गंभीर बनला आहे. सहा हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला बाराही महिने खासगी टँकरकडून पाणीविकत घ्यावे लागत आहे. गावाने आता काही नवीन योजना राबविण्याचे काम हाती घेतले असले तरी सध्या भेडसावणाऱ्या पाणी टंचाईबाबत शासन मात्र या गावची चेष्टा करण्याचे काम करत आहे. या गावाला दररोज लागणाऱ्या पाण्याची गरज पाहता एका माणसाला केवळ तीन लिटर पाणी उपलब्ध होत आहे. वाठार स्टेशन गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर देऊर येथील तळहिरा धरणाखाली आहे. मात्र गेल्या पाच या वर्षांत या धरणातच पाणी नसल्याने ही विहीर कोरडी पडली आहे. यामुळे वाठार स्टेशनला गेली कित्येक दिवसांपासून खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामपंचायतीने शासनाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रस्ताव देऊनही अद्याप या गावचा पाणी प्रश्न सुटलेला नाही. ग्रामपंचायतीने काही महिन्यांपूर्वी कोरेगाव तहसीलदार, तसेच गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांच्याकडे पाण्यासाठी प्रस्ताव पाठवले होते. त्यानुसार दररोज वीस हजार लिटर क्षमतेच्या सहा खेपा मागण्यात आल्या होत्या; परंतु प्रत्यक्षात दहा हजार लिटरचे सहा टँकर सुरू करण्यात आले होते. मात्र गेल्या आठवड्यात या सहांपैकी केवळ दोन टँकरद्वारे पाणी गावाला दिले जात आहे. त्यामुळे सध्या वाठार स्टेशन गावाला पाण्याची मोठी टंचाई जाणवत आहे. वाठार स्टेशनचा समर्थ वाग्देव महाराजांचा रथोत्सव दि. २२ जानेवारीपासून सुरू होणार आहे. तसेच या रथोत्सवानिमित्त होणारा जनावरांचा वार्षिक बाजारही दि. १३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. पाण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी या काळात वाढीव सहा खेपा सुरू कराव्यात, अशी मागणी नुकतीच कोरेगावच्या तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना करण्यात आली आहे. याबाबत शासनाने तातडीने लक्ष घालून वाढीव पाण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. याबाबत वाढीव पाणी मिळण्यासाठी पाठपुरावा करूनही ते उपलब्ध होत नसल्याच्या भावना वाठार स्टेशन ग्रामस्थांतून व्यक्त होत आहेत. (वार्ताहर) दि.१३ ते २४ जानेवारी यादरम्यान, वाग्देव महाराजांचा रथोत्सव व जनावरांचा बाजार आहे. यामुळे वाठार स्टेशनमध्ये पाण्याची गैरसोय होऊ नये. याबाबत शासनाने पाणी टँकरमध्ये वाढ करावी. नवीन टँकरद्वारे या काळात पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निवेदन आम्ही संबंधितांना दिले आहे.- महेश लोंढे, सरपंच वाठार स्टेशन कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात पाण्याची समस्या कायम असते. त्यामुळे येथील जनतेला पाणीटंचाई सतत भासत असते. या भागातीलच वाठार स्टेशन हे महत्वाचे व मध्यवर्ती गाव आहे. तसेच येथे रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे नागरिकांची गर्दी असते. मात्र, येथे पाण्याची टंचाई नेहमीच असते. वर्षातून काही महिने येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. येथील पाण्याची समस्या कायमस्वरुपी संपविण्याची मागणी होत आहे.