शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

वाठारला माणशी तीन लिटर पाणी...

By admin | Updated: January 11, 2016 00:50 IST

जादा टँकरची मागणी : आगामी काळात वाग्देव महाराज रथोत्सव; जनावरांचा बाजार

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन गावचा पाणी प्रश्न अनेक वर्षांपासून गंभीर बनला आहे. सहा हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला बाराही महिने खासगी टँकरकडून पाणीविकत घ्यावे लागत आहे. गावाने आता काही नवीन योजना राबविण्याचे काम हाती घेतले असले तरी सध्या भेडसावणाऱ्या पाणी टंचाईबाबत शासन मात्र या गावची चेष्टा करण्याचे काम करत आहे. या गावाला दररोज लागणाऱ्या पाण्याची गरज पाहता एका माणसाला केवळ तीन लिटर पाणी उपलब्ध होत आहे. वाठार स्टेशन गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर देऊर येथील तळहिरा धरणाखाली आहे. मात्र गेल्या पाच या वर्षांत या धरणातच पाणी नसल्याने ही विहीर कोरडी पडली आहे. यामुळे वाठार स्टेशनला गेली कित्येक दिवसांपासून खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामपंचायतीने शासनाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रस्ताव देऊनही अद्याप या गावचा पाणी प्रश्न सुटलेला नाही. ग्रामपंचायतीने काही महिन्यांपूर्वी कोरेगाव तहसीलदार, तसेच गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांच्याकडे पाण्यासाठी प्रस्ताव पाठवले होते. त्यानुसार दररोज वीस हजार लिटर क्षमतेच्या सहा खेपा मागण्यात आल्या होत्या; परंतु प्रत्यक्षात दहा हजार लिटरचे सहा टँकर सुरू करण्यात आले होते. मात्र गेल्या आठवड्यात या सहांपैकी केवळ दोन टँकरद्वारे पाणी गावाला दिले जात आहे. त्यामुळे सध्या वाठार स्टेशन गावाला पाण्याची मोठी टंचाई जाणवत आहे. वाठार स्टेशनचा समर्थ वाग्देव महाराजांचा रथोत्सव दि. २२ जानेवारीपासून सुरू होणार आहे. तसेच या रथोत्सवानिमित्त होणारा जनावरांचा वार्षिक बाजारही दि. १३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. पाण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी या काळात वाढीव सहा खेपा सुरू कराव्यात, अशी मागणी नुकतीच कोरेगावच्या तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना करण्यात आली आहे. याबाबत शासनाने तातडीने लक्ष घालून वाढीव पाण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. याबाबत वाढीव पाणी मिळण्यासाठी पाठपुरावा करूनही ते उपलब्ध होत नसल्याच्या भावना वाठार स्टेशन ग्रामस्थांतून व्यक्त होत आहेत. (वार्ताहर) दि.१३ ते २४ जानेवारी यादरम्यान, वाग्देव महाराजांचा रथोत्सव व जनावरांचा बाजार आहे. यामुळे वाठार स्टेशनमध्ये पाण्याची गैरसोय होऊ नये. याबाबत शासनाने पाणी टँकरमध्ये वाढ करावी. नवीन टँकरद्वारे या काळात पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निवेदन आम्ही संबंधितांना दिले आहे.- महेश लोंढे, सरपंच वाठार स्टेशन कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात पाण्याची समस्या कायम असते. त्यामुळे येथील जनतेला पाणीटंचाई सतत भासत असते. या भागातीलच वाठार स्टेशन हे महत्वाचे व मध्यवर्ती गाव आहे. तसेच येथे रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे नागरिकांची गर्दी असते. मात्र, येथे पाण्याची टंचाई नेहमीच असते. वर्षातून काही महिने येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. येथील पाण्याची समस्या कायमस्वरुपी संपविण्याची मागणी होत आहे.