शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

बारा वर्षांनंतरही आशा सेविकांची परवड काही संपता संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 15:27 IST

आशा सेविकांना १२ वर्षोच्या तपानंतरही विविध प्रलंबित मागण्यासह दरमहा मिळणाऱ्या मासिक मानधनासाठी शासन दरबारी झगडावे लागत आहे. सुरुवातीला या आशा सेविकांना शासन दरमहा १५० रुपये मानधन व कामाचा मोबदला देत होते.

हणमंत यादवचाफळ: ग्रामीण भागासह शहरी भागात आरोग्य व्यवस्थेचा कणा ठरलेल्या आशा सेविकांना १२ वर्षोच्या तपानंतरही विविध प्रलंबित मागण्यासह दरमहा मिळणाऱ्या मासिक मानधनासाठी शासन दरबारी झगडावे लागत आहे. तोकड्या मानधनावर संसाराचा गाढा हाकणाऱ्या या सावित्रींच्या लेकिंची शासन व शासनकर्त्यांनी केलेली परवड व  व्यथा लोकमतच्या माध्यमातून मांडण्याचा  त्या प्रयत्न करत आहेत.सातारा जिल्हा सावित्रींच्या लेकिंचा जिल्हा म्हणून ओळखला जावू लागला आहे. या सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात शासनाने सन. २००९ साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अभियानाअंतर्गत आशा सेविकांची पदे भरली आहेत. सुरुवातीला या आशा सेविकांना शासन दरमहा १५० रुपये मानधन व कामाचा मोबदला देत होते. यावेळी कुटुंब प्रमुख १५० रुपयांसाठी आरोग्य विभागात काम करु देत नव्हते. शेवटि सावित्रीच्या लेकिंचा जिल्हा. मागेपुढे आपले काही तरी चांगले होईल या आशेने अनेकींनी आरोग्य सेवेचा वसा जोपासला पन आजही त्यांचा भ्रमनिरास झालेला पाहावयास मिळत आहे.

सुरुवातीला जिल्ह्यातील बऱ्याचशा गावात महिनो अनं महिने आशा सेविकांची पदे रिक्त असायची. तर ज्या ठिकाणी पदे भरली गेली त्यातील बहुतांश सेविकांनी सहा महिन्यांतच आरोग्य विभागाचा निरोप घेतला होता. हि खरी वस्तुस्थिती आहे.आज याच आशासेविका व गटप्रवर्तकांना १२ वर्षेपूर्ण होत आहेत. मात्र त्यांच्या हालअपेष्टा काही संपता संपेणात.  आशासेविका व गटप्रवर्तकांनी वेळोवेळी आशा वर्कस फेडरेशनच्या माध्यमातून राज्यभर आंदोलने, मोर्चे काढून शासन दरबारी विविध मागण्या मांडल्या परंतू यातिल प्रत्यक्षात शासनकर्त्यांच्या आश्वासना नंतर  किती मागण्या पूर्ण झाल्या हा संशोधनाचा विषय ठरला आहे. शासन व शासनकर्त्यांकडून आश्वासनांच्या फैरी झाडल्या गेल्या मात्र प्रत्यक्षात पदरी उपेक्षाच पडली आहे. शासन फक्त अध्यादेश काढत आहे पन निधीची तरतूद करताना उदासीन धोरण राबवत आहे. कोरोना काळातील त्याग लक्षात घेवून प्रशासनाने मासिक मानधन व कामाचा मोबदला यासाठी  निधीची तरतूद करत तो निधी दरमहा वेळेत आशांच्या खात्यावर वर्ग होणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा सेविकांची आहे.

गेली १२ वर्षोपासुन तुटपुंज्या मानधनावर आम्ही काम करत आहे. शासन वेळेत मोबदला देत नाही. फक्त अध्यादेश काढत आहे पन निधीची तरतूद करताना उदासीन धोरण राबवत आहे. कोरोना काळातील आमचा त्याग लक्षात घेवून प्रशासनाने मासिक मानधन व कामाचा मोबदला यासाठी  निधीची तरतूद करत तो निधी दरमहा वेळेत आशांच्या खात्यावर वर्ग होणे गरजेचे आहे. - अलका वेदफाटक - आशा सेविका, चाफळ.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर