शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वर्धन कारखाना ९ सप्टेंबरला सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:25 IST

औंध : वर्धन ॲग्रो कारखान्याने गत गळीत हंगामातील उसाची बिले शेतकऱ्यांच्या वेळेत खात्यावर वर्ग केल्याने वर्धन कारखान्यावर असणारा विश्वास ...

औंध : वर्धन ॲग्रो कारखान्याने गत गळीत हंगामातील उसाची बिले शेतकऱ्यांच्या वेळेत खात्यावर वर्ग केल्याने वर्धन कारखान्यावर असणारा विश्वास आणखी दृढ झाला आहे. येत्या ९ सप्टेंबरला वर्धन कारखाना सुरू करणार असून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन चेअरमन धैर्यशील कदम यांनी बुधवारी केले.

खटाव तालुक्यातील त्रिमली-घाटमाथा येथील वर्धन ॲग्रो कारखान्याच्या पाचव्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुनीता कदम, कार्यकारी संचालक विक्रमशील कदम, संचालक भीमराव पाटील, सत्त्वशील कदम, दत्तात्रय साळुंखे, पृथ्वीराज निकम, अविनाश साळुंखे, संतोष घाडगे, सतीश सोलापुरे, संजय माने, नीलेश माने, सतीश भोसले, रामचंद्र येवले, भूषण देशमुख, संतोष पाटील, विठ्ठल चव्हाण, तुकाराम पवार, महादेव पवार, जयसिंग पवार, अंकुश कदम, वसंत यादव, दिनकर शिंगाडे, दिलीप जाधव, रामचंद्र दबडे, किशोर येवले, आदी उपस्थिती होती.

धैर्यशील कदम म्हणाले, कारखाना लवकर सुरू करून जास्त दिवस चालविण्याचा मानस व्यवस्थापनाचा आहे. हंगामामध्ये जास्तीत जास्त दिवस कारखाना चालविण्यासाठी व्यवस्थापनाने आवश्यक ती कामे पूर्ण केली असून, शिस्तबद्ध नियोजन, समाधानी कामगार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या विश्वासाने कारखाना प्रगतिपथावर आहे. येणारा गळीत हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार आहे. त्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

कार्यकारी संचालक विक्रमशील कदम म्हणाले, तोडणी कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ज्यांनी अजून ऊसनोंदणी केली नाही. त्यांनी ऑनलाईन पद्धतीने ऊसनोंदणी करावी.

फोटो : वर्धन ॲग्रोचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा पार पडला. यावेळी धैर्यशील कदम, सुनीता कदम, विक्रमशील कदम यांच्यासह संचालक मंडळ, शेतकरी उपस्थित होते. (छाया : रशीद शेख)