शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

वर्धन कारखाना ९ सप्टेंबरला सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:25 IST

औंध : वर्धन ॲग्रो कारखान्याने गत गळीत हंगामातील उसाची बिले शेतकऱ्यांच्या वेळेत खात्यावर वर्ग केल्याने वर्धन कारखान्यावर असणारा विश्वास ...

औंध : वर्धन ॲग्रो कारखान्याने गत गळीत हंगामातील उसाची बिले शेतकऱ्यांच्या वेळेत खात्यावर वर्ग केल्याने वर्धन कारखान्यावर असणारा विश्वास आणखी दृढ झाला आहे. येत्या ९ सप्टेंबरला वर्धन कारखाना सुरू करणार असून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन चेअरमन धैर्यशील कदम यांनी बुधवारी केले.

खटाव तालुक्यातील त्रिमली-घाटमाथा येथील वर्धन ॲग्रो कारखान्याच्या पाचव्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुनीता कदम, कार्यकारी संचालक विक्रमशील कदम, संचालक भीमराव पाटील, सत्त्वशील कदम, दत्तात्रय साळुंखे, पृथ्वीराज निकम, अविनाश साळुंखे, संतोष घाडगे, सतीश सोलापुरे, संजय माने, नीलेश माने, सतीश भोसले, रामचंद्र येवले, भूषण देशमुख, संतोष पाटील, विठ्ठल चव्हाण, तुकाराम पवार, महादेव पवार, जयसिंग पवार, अंकुश कदम, वसंत यादव, दिनकर शिंगाडे, दिलीप जाधव, रामचंद्र दबडे, किशोर येवले, आदी उपस्थिती होती.

धैर्यशील कदम म्हणाले, कारखाना लवकर सुरू करून जास्त दिवस चालविण्याचा मानस व्यवस्थापनाचा आहे. हंगामामध्ये जास्तीत जास्त दिवस कारखाना चालविण्यासाठी व्यवस्थापनाने आवश्यक ती कामे पूर्ण केली असून, शिस्तबद्ध नियोजन, समाधानी कामगार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या विश्वासाने कारखाना प्रगतिपथावर आहे. येणारा गळीत हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार आहे. त्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

कार्यकारी संचालक विक्रमशील कदम म्हणाले, तोडणी कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ज्यांनी अजून ऊसनोंदणी केली नाही. त्यांनी ऑनलाईन पद्धतीने ऊसनोंदणी करावी.

फोटो : वर्धन ॲग्रोचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा पार पडला. यावेळी धैर्यशील कदम, सुनीता कदम, विक्रमशील कदम यांच्यासह संचालक मंडळ, शेतकरी उपस्थित होते. (छाया : रशीद शेख)