शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-देवघरचे पाणी महिन्यात वाघोशीत

By admin | Updated: December 22, 2016 23:18 IST

मकरंद पाटील : औद्योगिकीकरणामुळे खंडाळ्याची दुष्काळी म्हणून ओळख पुसली

शिरवळ : ‘खंडाळा तालुक्यात औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढीला लागले असून, दुष्काळी तालुका म्हणून असलेली ओळख पुसली गेली आहे. खंडाळ्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन धोम-बलकवडीचे पाणी खंडाळ्याच्या शिवारापर्यंत आल्यांनतर आता महिनाभरात शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न झालेल्या नीरा-देवघरच्या कालव्यांचे काम पूर्ण करत पाणी वाघोशीपर्यंत घेऊन जाणार आहे,’ अशी घोषणा आमदार मकरंद पाटील यांनी केली. सांगवी, ता. खंडाळा येथे विविध विकासकामांच्या व वडगाव पोतनीस याठिकाणी आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून नाबार्डच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या वडगाव-पळशी पुलाचे भूमिपूजन व सभामंडप, सोसायटी कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी भोर-वेल्ह्याचे आमदार संग्राम थोपटे, खंडाळा पंचायत समिती सभापती नितीन भरगुडे-पाटील, अ‍ॅड. शामराव गाडवे, पंचायत समिती सदस्य रमेश धायगुडे, लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र तांबे, शिरवळचे उपसरपंच उदय कबुले, वडगाव सरपंच सोनल खामकर, उपसरपंच पंकज खामकर, राहुल खामकर, आदेश भापकर, अजय भोसले, राजेंद्र नेवसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता युवराज देसाई, ठेकेदार नंदकिशोर परदेशी, खंडाळा नगराध्यक्ष शरदकुमार दोशी, उपनगराध्यक्ष दयानंद खंडागळे, बंटी महांगरे आदी उपस्थित होते. यावेळी पुलाचे, सोसायटी कार्यालयाचे, सभामंडपाचे उद्घाटन आमदार मकरंद पाटील व आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आमदार थोपटे, नितीन भरगुडे, सोनल खामकर, पंकज खामकर यांनी मनोगतही व्यक्त केले. संजय खामकर यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल पवार यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष खामकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)