शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

नीरा-देवघरचे पाणी महिन्यात वाघोशीत

By admin | Updated: December 22, 2016 23:18 IST

मकरंद पाटील : औद्योगिकीकरणामुळे खंडाळ्याची दुष्काळी म्हणून ओळख पुसली

शिरवळ : ‘खंडाळा तालुक्यात औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढीला लागले असून, दुष्काळी तालुका म्हणून असलेली ओळख पुसली गेली आहे. खंडाळ्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन धोम-बलकवडीचे पाणी खंडाळ्याच्या शिवारापर्यंत आल्यांनतर आता महिनाभरात शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न झालेल्या नीरा-देवघरच्या कालव्यांचे काम पूर्ण करत पाणी वाघोशीपर्यंत घेऊन जाणार आहे,’ अशी घोषणा आमदार मकरंद पाटील यांनी केली. सांगवी, ता. खंडाळा येथे विविध विकासकामांच्या व वडगाव पोतनीस याठिकाणी आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून नाबार्डच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या वडगाव-पळशी पुलाचे भूमिपूजन व सभामंडप, सोसायटी कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी भोर-वेल्ह्याचे आमदार संग्राम थोपटे, खंडाळा पंचायत समिती सभापती नितीन भरगुडे-पाटील, अ‍ॅड. शामराव गाडवे, पंचायत समिती सदस्य रमेश धायगुडे, लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र तांबे, शिरवळचे उपसरपंच उदय कबुले, वडगाव सरपंच सोनल खामकर, उपसरपंच पंकज खामकर, राहुल खामकर, आदेश भापकर, अजय भोसले, राजेंद्र नेवसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता युवराज देसाई, ठेकेदार नंदकिशोर परदेशी, खंडाळा नगराध्यक्ष शरदकुमार दोशी, उपनगराध्यक्ष दयानंद खंडागळे, बंटी महांगरे आदी उपस्थित होते. यावेळी पुलाचे, सोसायटी कार्यालयाचे, सभामंडपाचे उद्घाटन आमदार मकरंद पाटील व आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आमदार थोपटे, नितीन भरगुडे, सोनल खामकर, पंकज खामकर यांनी मनोगतही व्यक्त केले. संजय खामकर यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल पवार यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष खामकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)