शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

वडूजला रणनीती आखण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:42 IST

शेखर जाधव लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : नगरपंचायतींच्या निवडणुका लवकरच होत असल्याने खटाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूजमध्ये राजकीय हालचालींनी ...

शेखर जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : नगरपंचायतींच्या निवडणुका लवकरच होत असल्याने खटाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूजमध्ये राजकीय हालचालींनी वेग आला आहे. सत्ताधारी, विरोधक आणि इच्छुक उमेदवारांकडून आतापासून निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. सत्ताधारी गटाने शहरातील विकासकामे घाई गडबडीत पूर्ण करण्याचा घाट घातला आहे. तर विरोधी गट उमेदवार चाचपणीत व्यस्त आहे. वाॅर्ड रचना व आरक्षणानंतर लढतीत आमनेसामने कोण हे येणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

वडूज ग्रामपचांयतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यांनतर येथील राजकारणात अनेक फेरबदल झाले. सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण? असा प्रश्न येथील मतदारांना पडला. जनतेच्या मूलभूत समस्येवर विरोधी पक्ष चुप्पी साधून आहे. त्यामुळे आगामी पंचवार्षिक निवडणुकीचे चित्र कसे असेल हे वॉर्ड आरक्षणावर अवलंबून आहे. सद्य:स्थितीत भाजपविरुद्ध राष्ट्रवादी, कॉँग्रेस व शिवसेना यांच्यात कशाप्रकारे युती होणार, नाराज इच्छुक उमेदवार ऐनवेळी अपक्ष लढणार का? यामुळे ही निवडणूक तिरंगी का चौरंगी होणार याकडे मतदाराचे लक्ष लागले आहे.

१७ नगरसेवक असलेल्या वडूज नगरपंचायतीची २०१६ ची निवडणूक लक्षवेधी ठरली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ५, राष्ट्रीय कॉँग्रेसच्या ५, भाजपच्या ३ तर अपक्ष ४ नगरसेवकांनी विजय मिळविला. नगरपंचायतीत प्रथम राष्ट्रवादी, अपक्ष व भाजप अशी सत्ता स्थापन झाली. यांनंतर बऱ्याच घडामोडी घडल्या अन् राष्ट्रवादीने भाजपाच्या तीन व एका अपक्ष नगरसेवकाला सोबत घेऊन नगरपंचायतीत सत्ता स्थापन केली अन् सत्ताधाऱ्यांनी शहराचा विकास साधण्याचा प्रयत्न सुरू केला.

वडूजची जनता सोशिक व शांत समजली जाते. येथील जनतेला आजवर प्रत्येक राजकीय पुढाऱ्यांनी विकासकामांचे गाजर दाखवले आहे. अपवाद वगळता विकास कामांचा पाठपुरावा न झाल्याने शहराचा विकास साधण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले. सत्ताधाऱ्यांनी स्मशानभूमी, शववाहिका या व्यतिरिक्त कोणतेही अन्य ठोस काम केले नाही. विरोधी गटाने प्रत्येक मासिक सभेत सत्ताधारी गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न न केल्याने याचा शहराच्या विकासावर परिणाम झाल्याचे दिसते. सत्ताधारी व विरोधक यांची अंतर्गत हातमिळवणी तर झाली नसेल ना असा प्रश्न येथील जनतेला पडल्याशिवाय राहत नाही. गेल्या साडेचार वर्षांत तालुक्याच्या राजकारणाबरोबरच नगरपंचायत हद्दीतील राजकीय समीकरणे बदलल्यामुळे सत्ताधारी कोण? आणि विरोधी गटात कोण? हे सध्यातरी ओळखणे कठीण बनले आहे. नगरपंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच येथील नगरपंचायतीचे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. शहरातील अंतर्गत गटारे, कॉँक्रिटीकरण, प्रस्तावित मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण या व्यतिरिक्त दिसण्यासारखे मोठे भरीव काम करण्यास सत्ताधारी मंडळींना अद्याप तरी यश आल्याचे दिसून येत नाही. या पाच वर्षात कामे बोटावर मोजण्या इतपत झाली, पण सभागृहात विकासकामांचे ठराव मात्र हजारोंच्या संख्येने केले गेले.

जोड..