शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

स्वखर्चातून गावामध्येच उभारलाय ‘वाचनकट्टा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 22:14 IST

अजय जाधव । उंब्रज : ‘वाचाल तर वाचाल’ हे वाक्य आपण कायम शाळेच्या भिंतीवर वाचत आलो आहोत. या वाक्याची ...

अजय जाधव ।उंब्रज : ‘वाचाल तर वाचाल’ हे वाक्य आपण कायम शाळेच्या भिंतीवर वाचत आलो आहोत. या वाक्याची अंमलबजावणी करत ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी. या उद्देशाने कºहाड तालुक्यातील चोरेसारख्या ग्रामीण भागातील स्वाती साळुंखे यांनी पुढाकार घेतलाय. त्यांनी गावातील कट्ट्यावर विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी पुस्तकांचा खुला वाचनकट्टा मोफत सुरू केला आहे.सर्वत्र तरुणाई मोबाईलच्या आहारी गेलेली दिसून येते. या मोबाईलमधून तरुणाईने बाहेर पडावे, त्यांनी वाचावे, यासाठी चोरे ग्रामपंचायतीच्या सदस्या स्वाती साळुंखे यांनी गावातील जुन्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील कट्ट्याचे रुपांतर वाचनालयात केले. अन् तो कट्टा आता बनला आहे वाचनकट्टा.मुलांना, युवकांना व ग्रामस्थांना याठिकाणी बसून वाचन करता येईल, अशी सोय करण्यात आलेली आहे. ही पुस्तके घरी नेऊन वाचायची असतील तर तशीही सोय करण्यात आलेली असून, पुस्तक घरी नेणाऱ्यांनी नोंदवहीत फक्त नाव व मोबाईल नंबर नोंदवणे गरजेचे आहे. त्यांनीच पुस्तक माघारी ठेवताना नोंदवहीत पुस्तक जमा नोंदवून वाचनकट्ट्यावरील पुस्तक ठेवण्याच्या जागी पुस्तक ठेवायचे, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेले आहे.चोरे गावातील जुन्या ग्रामपंचायतीच्या समोरील कट्ट्यावर गावातील तरुण व ग्रामस्थ, तरुण व ग्रामस्थांना बसण्याची जागा होती. एसटी येण्यासाठी प्रतीक्षा करणारे असंख्य महाविद्यालयीन तरुण ग्रामस्थ उभे राहतात. या ठिकाणी पुस्तके ठेवून त्यांना वाचनाची आवड निर्माण करावी, असे सुचले आणि वाचनकट्टा तयार केला.- स्वाती साळुंखेग्रामपंचायत सदस्या, चोरेस्वाती साळुंखे यांनी उभारलेल्या वाचन कट्ट्याचा उपक्रम स्तुत्य आहे. या कट्ट्यामुळे ऐतिहासिक कादंबरी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची अशी अनेक पुस्तके गावात विनामूल्य उपलब्ध झाली आहेत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना या अनोख्या अशा वाचनकट्ट्याचा नक्कीच लाभ होणार आहे. तसेच त्यांच्या करिअरसाठी दिशादर्शक ठरेल.- माधवी गुरव, महाविद्यालयीन युवती, चोरे, ता. कºहाड