शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सुटीच्या तोंडावर बदलीचा भुंगा !

By admin | Updated: April 21, 2017 22:27 IST

प्राथमिक शाळांतील शिक्षक अस्वस्थ : ऐन उन्हाळ्यात हजारो शिक्षकांचा जीव लागला टांगणीला

रेठरे बुद्रुक : प्राथमिक शिक्षकांच्या होऊ घातलेल्या बदल्यांचा प्राथमिक शिक्षकांनी चांगलाच धसका घेतला आहे. बदली आदेशाबाबत शिक्षकांमध्ये अद्याप संभ्रमावस्था आहे. बदल्यांसाठी अवघड आणि सोपे क्षेत्र अशी गावांची वर्गवारी केली असल्यामुळे बरीच वर्षे सोप्या क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांचा जीव टांगणीला लागला आहे. ऐन उन्हाळी सुटीच्या तोंडावर अन्यायकारक बदल्या होणार असल्यामुळे ‘बदलीचा भुंगा घालतोय पिंगा,’ अशी शिक्षकांची अवस्था झाली आहे. आजपर्यंत एप्रिल, मे महिन्यात प्रशासकीय व विनंती स्वरूपाच्या तालुकास्तरावरून बदल्या होत होत्या. मात्र, २७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या शासन आदेशान्वये आता प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या सेवा ज्येष्ठतेनुसारच मात्र जिल्हास्तरावरून आॅनलाईन पद्धतीने खो-खो स्वरूपात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शिक्षकांच्या नेमणुकीपासून जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील पात्र शिक्षकांना क्रमाने वीस शाळांचे पसंतीक्रम देण्यात येणार आहेत. या बदली प्रक्रियेमुळे बहुतांशी शिक्षकांच्या अन्यायकारक बदल्या होणार आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा दर्जा दिवसेंदिवस सुधारत आहे. या शाळांची गुणवत्ताही वाढली आहे. या कामी शिक्षकांनी चांगले काम केले आहे. मात्र, यंदाच्या जिल्हास्तरावरून होणाऱ्या बदल्यांमुळे काही शिक्षकांची सोय झाली तरी बहुतांश शिक्षकांची गैरसोय होणार आहे. तसेच जिल्हा सेवा ज्येष्ठता यादीमुळे सतत बदलीस पात्र राहण्याचा धोकाही आहे. जर आपली बदली वर्षभरात होणार आहे, अशी कल्पना शिक्षकांना आली तर त्याचे कार्यरत शाळेमध्ये ज्ञानदान करण्याकडे लक्ष राहणार नाही. तसेच जो शिक्षक अथवा शिक्षिका पती, पत्नीपैकी एकजण शिक्षक आहे त्यांना जिल्ह्यात कोठेही बदली होऊ शकते. त्यामुळे शिक्षकांचे मानसिक संतुलनही बिघडू शकते. त्यामुळे या अन्यायकारक बदल्या होऊ नयेत, तालुकास्तरावरूनच बदल्या व्हाव्यात, अशी मागणी शिक्षकांमधून केली जात आहे. सध्या तरी सर्व शिक्षक संघटना या बदल्यांच्या विरोधात एकवटल्या आहेत. शिक्षक संघटनांना बदल्या रद्द करण्यासाठी यश आले तर ठीक आहे. मात्र, बदल्या झाल्याच तर आपल्याला कोणते गाव मिळेल या विवंचनेत सध्या शिक्षक गुरफटले आहेत. सुटीच्या तोंडावरच शिक्षकांना बदलीच्या टेन्शनने घेरले आहे. त्यामुळे सध्या तरी बदल्या कधी आणि कशा पद्धतीने होतील, या विचारातच शिक्षक आहेत. (वार्ताहर)संघटनेची मोर्चाची तयारीअन्यायकारक बदल्या तसेच शिक्षकांच्या इतर प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षकांच्या सर्व संघटना सध्या एक झाल्या आहेत. शासनाचे बदल्यांबाबतचे स्पष्ट धोरण आणि विविध मागण्यांबाबत समन्वय समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन सध्या करण्यात येत आहे.