शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
4
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
5
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
6
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
7
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
8
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
9
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
10
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
11
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
12
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
13
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
14
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
15
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
16
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
17
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
18
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
19
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

सुटीच्या तोंडावर बदलीचा भुंगा !

By admin | Updated: April 21, 2017 22:27 IST

प्राथमिक शाळांतील शिक्षक अस्वस्थ : ऐन उन्हाळ्यात हजारो शिक्षकांचा जीव लागला टांगणीला

रेठरे बुद्रुक : प्राथमिक शिक्षकांच्या होऊ घातलेल्या बदल्यांचा प्राथमिक शिक्षकांनी चांगलाच धसका घेतला आहे. बदली आदेशाबाबत शिक्षकांमध्ये अद्याप संभ्रमावस्था आहे. बदल्यांसाठी अवघड आणि सोपे क्षेत्र अशी गावांची वर्गवारी केली असल्यामुळे बरीच वर्षे सोप्या क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांचा जीव टांगणीला लागला आहे. ऐन उन्हाळी सुटीच्या तोंडावर अन्यायकारक बदल्या होणार असल्यामुळे ‘बदलीचा भुंगा घालतोय पिंगा,’ अशी शिक्षकांची अवस्था झाली आहे. आजपर्यंत एप्रिल, मे महिन्यात प्रशासकीय व विनंती स्वरूपाच्या तालुकास्तरावरून बदल्या होत होत्या. मात्र, २७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या शासन आदेशान्वये आता प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या सेवा ज्येष्ठतेनुसारच मात्र जिल्हास्तरावरून आॅनलाईन पद्धतीने खो-खो स्वरूपात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शिक्षकांच्या नेमणुकीपासून जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील पात्र शिक्षकांना क्रमाने वीस शाळांचे पसंतीक्रम देण्यात येणार आहेत. या बदली प्रक्रियेमुळे बहुतांशी शिक्षकांच्या अन्यायकारक बदल्या होणार आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा दर्जा दिवसेंदिवस सुधारत आहे. या शाळांची गुणवत्ताही वाढली आहे. या कामी शिक्षकांनी चांगले काम केले आहे. मात्र, यंदाच्या जिल्हास्तरावरून होणाऱ्या बदल्यांमुळे काही शिक्षकांची सोय झाली तरी बहुतांश शिक्षकांची गैरसोय होणार आहे. तसेच जिल्हा सेवा ज्येष्ठता यादीमुळे सतत बदलीस पात्र राहण्याचा धोकाही आहे. जर आपली बदली वर्षभरात होणार आहे, अशी कल्पना शिक्षकांना आली तर त्याचे कार्यरत शाळेमध्ये ज्ञानदान करण्याकडे लक्ष राहणार नाही. तसेच जो शिक्षक अथवा शिक्षिका पती, पत्नीपैकी एकजण शिक्षक आहे त्यांना जिल्ह्यात कोठेही बदली होऊ शकते. त्यामुळे शिक्षकांचे मानसिक संतुलनही बिघडू शकते. त्यामुळे या अन्यायकारक बदल्या होऊ नयेत, तालुकास्तरावरूनच बदल्या व्हाव्यात, अशी मागणी शिक्षकांमधून केली जात आहे. सध्या तरी सर्व शिक्षक संघटना या बदल्यांच्या विरोधात एकवटल्या आहेत. शिक्षक संघटनांना बदल्या रद्द करण्यासाठी यश आले तर ठीक आहे. मात्र, बदल्या झाल्याच तर आपल्याला कोणते गाव मिळेल या विवंचनेत सध्या शिक्षक गुरफटले आहेत. सुटीच्या तोंडावरच शिक्षकांना बदलीच्या टेन्शनने घेरले आहे. त्यामुळे सध्या तरी बदल्या कधी आणि कशा पद्धतीने होतील, या विचारातच शिक्षक आहेत. (वार्ताहर)संघटनेची मोर्चाची तयारीअन्यायकारक बदल्या तसेच शिक्षकांच्या इतर प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षकांच्या सर्व संघटना सध्या एक झाल्या आहेत. शासनाचे बदल्यांबाबतचे स्पष्ट धोरण आणि विविध मागण्यांबाबत समन्वय समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन सध्या करण्यात येत आहे.