शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
3
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
4
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
5
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
6
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
7
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
8
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
9
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
10
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
11
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
12
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
13
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
14
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
15
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
16
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
17
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
18
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
19
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
20
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?

आल्याला पाणी देण्यासाठी ट्रॅक्टर इंजिनचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 23:04 IST

जयदीप जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क रहिमतपूर : पिके जगवण्यासाठी शेतकरी कशा कल्पना लढवेल, हे सांगता येत नाही. अशाचप्रकारे ...

जयदीप जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्करहिमतपूर : पिके जगवण्यासाठी शेतकरी कशा कल्पना लढवेल, हे सांगता येत नाही. अशाचप्रकारे कोरेगाव तालुक्यातील साप येथील एका प्रगतशील शेतकऱ्याने लखोपती करणारे आले पीक वाचवण्यासाठी चक्क विहिरीवर ट्रॅक्टर उभा करून पाणी देणे सुरू केले आहे. वीज पुरवठा बंद असल्याने ट्रॅक्टरच्या इंजिनचा मोटार म्हणून वापर कल्पकतेने केला आहे.गेल्या बारा दिवसांपूर्वी रहिमतपूर परिसरात वादळी पाऊस झाल्यामुळे साप येथील अनेक वीज खांब जमीनदोस्त झाले होते. वीज वितरण कंपनीच्या वतीने वीजवाहिन्यांची जोडणी सुरू असली तरी अद्याप काही शिवारातील विंधन विहिरींवरील वीजपुरवठा बंद आहे. त्यामध्येच पुरेसा पाऊसही होत नसल्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.उन्हामुळे आणि पोषक वातावरणाअभावी अनेक शेतकºयांचे आले पीक गाभाळलेय. अशी परिस्थिती निर्माण होऊन पिकाला धोका निर्माण होऊ नये म्हणून शेतकरी वेगवेगळ्या कल्पना वापरून पुरेसे पाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत.साप येथील एका शेतकºयाने आपल्या विहिरीवर ट्रॅक्टर उभा करून इंजिनचा मोटरप्रमाणे वापर करून विहिरीतील पाणी काढत स्प्रिंकलरच्या माध्यमातून आले पिकाला पाणी देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रॅक्टरच्या माध्यमातून आले पिकाला पाणी देण्याचे काम सुरू आहे.शेजारील शेतकरी हा वेगळा उपाय आवर्जून न्याहाळत असून, संबंधित शेतकºयाने केलेल्या कल्पनेचे कौतुक करत आहेत. हा अनोखा प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी विशेषत तरुण प्रयोगशील शेतकरी भेटी देत आहेत. काहीजण या अनोख्या प्रयोगाचे मोबाईलमध्ये चित्रीकरणही करत आहेत. हा प्रयोग करण्याची प्रेरणा घेतात. तसेच प्रयोगशील शेतकºयाचे कौतुक होत आहे.आले उगवणीला फटकासाधारणपणे १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीत आले लागवड केली जाते. मात्र, त्यावेळी तापमान सुमारे ३० ते ३५ अंश सेल्सिअस असणे गरजेचे असते. यंदा उन्हाळी पाऊस झाला नाही. तसेच तापमानाने चाळीशी ओलांडल्याने आले लागवडीला पोषक वातावरण नव्हते. अशा परिस्थितीतही अनेकांनी आले लागवड केली. अयोग्य वातावरणात शेतकºयांनी वाढीव तापमानात आले लागवड करून त्याला पाणी दिल्यामुळे ३५ टक्के शेतकºयांच्या आले उगवणीला फटका बसला आहे. तसेच अनेक शेतकºयांचे आले गाभाळल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यामुळे अनेक शेतकºयांनी पुन्हा आले लागवडीला सुरुवात केली आहे.महागाईचे बियाणे...जून महिना शेवटच्या टप्प्यावर आला असतानाही अद्याप पेरणी योग्य पुरेसा पाऊस पडला नाही. आकाशात काळ्या ढगांची गर्दी होताना दिसत आहे. मात्र, पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पाचशे किलो (एक गाडी) आले सुमारे चाळीस हजार रुपये दर देऊन बियाण्यांसाठी खरेदी केले आहे. एवढ्या महागाईच्या पिकाची लागण केल्यानंतर ते जगवणे गरजेचे बनले आहे. त्यावर उपाय म्हणून हा प्रयोग झाला.