शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
2
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
3
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
4
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
5
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
6
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
7
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
8
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
9
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
10
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
12
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
13
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
14
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
15
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
16
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
17
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
18
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
19
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
20
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी

आल्याला पाणी देण्यासाठी ट्रॅक्टर इंजिनचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 23:04 IST

जयदीप जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क रहिमतपूर : पिके जगवण्यासाठी शेतकरी कशा कल्पना लढवेल, हे सांगता येत नाही. अशाचप्रकारे ...

जयदीप जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्करहिमतपूर : पिके जगवण्यासाठी शेतकरी कशा कल्पना लढवेल, हे सांगता येत नाही. अशाचप्रकारे कोरेगाव तालुक्यातील साप येथील एका प्रगतशील शेतकऱ्याने लखोपती करणारे आले पीक वाचवण्यासाठी चक्क विहिरीवर ट्रॅक्टर उभा करून पाणी देणे सुरू केले आहे. वीज पुरवठा बंद असल्याने ट्रॅक्टरच्या इंजिनचा मोटार म्हणून वापर कल्पकतेने केला आहे.गेल्या बारा दिवसांपूर्वी रहिमतपूर परिसरात वादळी पाऊस झाल्यामुळे साप येथील अनेक वीज खांब जमीनदोस्त झाले होते. वीज वितरण कंपनीच्या वतीने वीजवाहिन्यांची जोडणी सुरू असली तरी अद्याप काही शिवारातील विंधन विहिरींवरील वीजपुरवठा बंद आहे. त्यामध्येच पुरेसा पाऊसही होत नसल्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.उन्हामुळे आणि पोषक वातावरणाअभावी अनेक शेतकºयांचे आले पीक गाभाळलेय. अशी परिस्थिती निर्माण होऊन पिकाला धोका निर्माण होऊ नये म्हणून शेतकरी वेगवेगळ्या कल्पना वापरून पुरेसे पाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत.साप येथील एका शेतकºयाने आपल्या विहिरीवर ट्रॅक्टर उभा करून इंजिनचा मोटरप्रमाणे वापर करून विहिरीतील पाणी काढत स्प्रिंकलरच्या माध्यमातून आले पिकाला पाणी देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रॅक्टरच्या माध्यमातून आले पिकाला पाणी देण्याचे काम सुरू आहे.शेजारील शेतकरी हा वेगळा उपाय आवर्जून न्याहाळत असून, संबंधित शेतकºयाने केलेल्या कल्पनेचे कौतुक करत आहेत. हा अनोखा प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी विशेषत तरुण प्रयोगशील शेतकरी भेटी देत आहेत. काहीजण या अनोख्या प्रयोगाचे मोबाईलमध्ये चित्रीकरणही करत आहेत. हा प्रयोग करण्याची प्रेरणा घेतात. तसेच प्रयोगशील शेतकºयाचे कौतुक होत आहे.आले उगवणीला फटकासाधारणपणे १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीत आले लागवड केली जाते. मात्र, त्यावेळी तापमान सुमारे ३० ते ३५ अंश सेल्सिअस असणे गरजेचे असते. यंदा उन्हाळी पाऊस झाला नाही. तसेच तापमानाने चाळीशी ओलांडल्याने आले लागवडीला पोषक वातावरण नव्हते. अशा परिस्थितीतही अनेकांनी आले लागवड केली. अयोग्य वातावरणात शेतकºयांनी वाढीव तापमानात आले लागवड करून त्याला पाणी दिल्यामुळे ३५ टक्के शेतकºयांच्या आले उगवणीला फटका बसला आहे. तसेच अनेक शेतकºयांचे आले गाभाळल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यामुळे अनेक शेतकºयांनी पुन्हा आले लागवडीला सुरुवात केली आहे.महागाईचे बियाणे...जून महिना शेवटच्या टप्प्यावर आला असतानाही अद्याप पेरणी योग्य पुरेसा पाऊस पडला नाही. आकाशात काळ्या ढगांची गर्दी होताना दिसत आहे. मात्र, पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पाचशे किलो (एक गाडी) आले सुमारे चाळीस हजार रुपये दर देऊन बियाण्यांसाठी खरेदी केले आहे. एवढ्या महागाईच्या पिकाची लागण केल्यानंतर ते जगवणे गरजेचे बनले आहे. त्यावर उपाय म्हणून हा प्रयोग झाला.