शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
5
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
6
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
7
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
8
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
9
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
10
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
11
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
12
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
13
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
14
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
15
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
16
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
17
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
18
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
19
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
20
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान

उरमोडी येणार हो ‘माण’च्या अंगणी!

By admin | Updated: August 22, 2014 22:07 IST

गावोगावी स्वागताची जंगी तयारी : अपेक्षापूर्तीच्या सुवर्णक्षणाकडे दुष्काळग्रस्तांच्या नजरा

मलवडी : माण-खटाव मतदारसंघातील जनतेला लागलेला दुष्काळीचा कलंक पुसण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहकार्याने उरमोडीचे पाणी माणच्या अंगणी येत आहे. हे पाणी रविवार, दि. २४ रोजी खटाव तालुक्यातून किरकसाल बोगद्यातून येणार आहे. तालुक्यातील जनता या सुवर्णक्षणाकडे लक्ष ठेवून आहे.वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या खटाव-माणच्या जनतेला आमदार जयकुमार गोरे यांनी स्वप्न दाखविले होते. माण-खटावच्या मातीतून बारामती, सांगलीसारखा पाण्याने भरलेला कालवा पाहायचा आहे. येथील शेती हिरवीगार झाल्याची पाहायची आहे. येथील शेतकरी त्यांच्याच शेतात राबला पाहिजे. महिलांची पाण्यासाठीची वणवण थांबली पाहिजे, माणदेशी तरुणांना तेथेच रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, यासाठी आमदार जयकुमार गोेरे यांनी पाच वर्षे पाठपुरावा केला होता. या काळात उरमोडीच्या योजनेसाठी अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. याला यशही मिळाले आहे. दोन वर्षांपूर्वी दुष्काळाचा सामना करताना टंचाई काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून उरमोडीचे पाणी खटाव तालुक्यातील येरळवाडी धरणात आणले होते. त्या पाण्याचे पूजन करताना आमदार जयकुमार गोरे यांनी हेच पाणी माण तालुक्यात नेण्यासाठी लागणारा निधी द्या, असा आग्रह धरला होता.त्यानुसार निधी मंजूर होताच आमदार गोरे यांनी या कामाचा रात्रंदिवस पाठपुरावा केला. मुंबई, कऱ्हाड येथे अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन कामाचा आढावा घेतला. या योजनेच्या कामात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत: जातीने लक्ष घातले होते. त्यामुळे या कालव्याचे काम दर्जेदार झाले आहे.आमदार गोरे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण होण्याचा क्षण आला आहे. उरमोडीचे पाणी रविवार, दि. २४ रोजी किरकसाल बोगद्यातून येत आहे. अनेक वर्षांनंतर येणाऱ्या पाण्याचे स्वागत करण्यासाठी माण व खटाव तालुक्यातील जनता सज्ज झाली आहे. ज्या गावांमधून उरमोडीचा कालवा गेला आहे. त्या गावांमधील ग्रामस्थांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. उरमोडी योजनेच्या कालव्याच्या कामाची आमदार जयकुमार गोरे यांनी पाहणी केली. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे दुष्काळग्रस्तांचे लक्ष रविवारच्या कार्यक्रमाकडे लागले आहे. (प्रतिनिधी)