शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

उरमोडी येणार हो ‘माण’च्या अंगणी!

By admin | Updated: August 22, 2014 22:07 IST

गावोगावी स्वागताची जंगी तयारी : अपेक्षापूर्तीच्या सुवर्णक्षणाकडे दुष्काळग्रस्तांच्या नजरा

मलवडी : माण-खटाव मतदारसंघातील जनतेला लागलेला दुष्काळीचा कलंक पुसण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहकार्याने उरमोडीचे पाणी माणच्या अंगणी येत आहे. हे पाणी रविवार, दि. २४ रोजी खटाव तालुक्यातून किरकसाल बोगद्यातून येणार आहे. तालुक्यातील जनता या सुवर्णक्षणाकडे लक्ष ठेवून आहे.वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या खटाव-माणच्या जनतेला आमदार जयकुमार गोरे यांनी स्वप्न दाखविले होते. माण-खटावच्या मातीतून बारामती, सांगलीसारखा पाण्याने भरलेला कालवा पाहायचा आहे. येथील शेती हिरवीगार झाल्याची पाहायची आहे. येथील शेतकरी त्यांच्याच शेतात राबला पाहिजे. महिलांची पाण्यासाठीची वणवण थांबली पाहिजे, माणदेशी तरुणांना तेथेच रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, यासाठी आमदार जयकुमार गोेरे यांनी पाच वर्षे पाठपुरावा केला होता. या काळात उरमोडीच्या योजनेसाठी अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. याला यशही मिळाले आहे. दोन वर्षांपूर्वी दुष्काळाचा सामना करताना टंचाई काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून उरमोडीचे पाणी खटाव तालुक्यातील येरळवाडी धरणात आणले होते. त्या पाण्याचे पूजन करताना आमदार जयकुमार गोरे यांनी हेच पाणी माण तालुक्यात नेण्यासाठी लागणारा निधी द्या, असा आग्रह धरला होता.त्यानुसार निधी मंजूर होताच आमदार गोरे यांनी या कामाचा रात्रंदिवस पाठपुरावा केला. मुंबई, कऱ्हाड येथे अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन कामाचा आढावा घेतला. या योजनेच्या कामात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत: जातीने लक्ष घातले होते. त्यामुळे या कालव्याचे काम दर्जेदार झाले आहे.आमदार गोरे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण होण्याचा क्षण आला आहे. उरमोडीचे पाणी रविवार, दि. २४ रोजी किरकसाल बोगद्यातून येत आहे. अनेक वर्षांनंतर येणाऱ्या पाण्याचे स्वागत करण्यासाठी माण व खटाव तालुक्यातील जनता सज्ज झाली आहे. ज्या गावांमधून उरमोडीचा कालवा गेला आहे. त्या गावांमधील ग्रामस्थांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. उरमोडी योजनेच्या कालव्याच्या कामाची आमदार जयकुमार गोरे यांनी पाहणी केली. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे दुष्काळग्रस्तांचे लक्ष रविवारच्या कार्यक्रमाकडे लागले आहे. (प्रतिनिधी)