शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

भादेच्या पियूषची घरात अभ्यास करून यूपीएससीत बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:00 IST

सातारा : वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कायदेपंडित बनण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. त्यासाठी स्वत:ला अभ्यासात झोकूनही दिलं.

स्वप्नील शिंदे।सातारा : वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कायदेपंडित बनण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. त्यासाठी स्वत:ला अभ्यासात झोकूनही दिलं. वकिलीचा अभ्यास करत असतानाच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली अन् त्यांनी यशाला गवसणी घातली. खंडाळा तालुक्यातील भादे येथील पियूष साळुंखे यांनी यूपीएससीत केंद्रात ६३ वा तर राज्यात पाचवा क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.मूळचे भादे येथील रहिवासी असलेल्या पियूष साळुंखे त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पुणे येथील सेंट विंसेन्ट हायस्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिक अँड टेलिकम्युनिकेशनमधून इंजिनिअरिंग पूर्ण केले. दरम्यान, लहानपणापासून वडिलांप्रमाणे वकील होण्याचे स्वप्न ते पाहत होते. म्हणून एलएलबीचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. वकिलीचे शिक्षण घेत असताना त्यांनी यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली.२०१६ मध्ये त्यांनी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली. पूर्व परीक्षेत यश मिळाले. मात्र, मुख्य परीक्षेत स्कोर कमी आल्याने अपयश आले. पहिल्या प्रयत्नात अपयशामुळे काही प्रमाणात निराशा आली. दरम्यान, आई-वडील आणि मित्रांनी समजूत काढून पुन्हा जोरात प्रयत्न करण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर निराशा झटकून पियूष यांनी जिद्दीने अभ्यासाला सुरुवात केली. २०१७ च्या पूर्व, मुख्य परीक्षेत यश मिळवून मुलाखतीपर्यंत मजल मारली. पहिलीच मुलाखत असल्याने काही प्रमाणात दडपण होते. तरी न डगमगता त्याला सामोरे गेले. मुलाखत दिल्यानंतर एलएलबीच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देत पुन्हा यूपीएससीचा अभ्यास सुरू केला अन् अपेक्षितपणे लागलेल्या निकालामुळे विश्वास बसत नव्हता की देशात ६३ वा क्रमांक मिळवला.मुलाखतीत दृष्टिकोन पाहिला जातोमुख्य परीक्षेनंतर आयोगातर्फे घेण्यात आलेली मुलाखत केवळ २० मिनिटांची झाली. यावर्षी घेण्यात आलेल्या मुलाखतीत ती सर्वात कमी वेळाची होती. त्यामुळे मुलाखत किती घेतली? हे महत्त्वाचे नाही. तर त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे भविष्यातील एक प्रशासकीय अधिकारी म्हणून कशा पद्धतीने देतो, हे महत्त्वाचे असते.लायब्ररी व क्लास न लावता केला अभ्यासपियूष यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करत असताना ते लायब्ररी व क्लास न लावता केवळ घरी बसून अभ्यास करीत होते. त्याचदरम्यान, एलएलबी, कॉलेज, जिम जाणे, फिल्म पाहणे व मित्र मंडळींमध्ये वेळही घालवत होते.पदावर रुजू झाल्यानंतर शासनांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे मुख्य धोरण असेल. तसेच त्याची अंमलबजावणी करत असताना प्रशासन पारदर्शकपणे चालवण्यावर भर राहील. जिद्द व चिकाटीच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते.- पियूष साळुंखे