शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

ऐन दिवाळीत अवकाळी पाऊस : खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पळापळ

By नितीन काळेल | Updated: November 10, 2023 16:05 IST

साताऱ्यात ऐन दिवाळीत अवकाळी पावसाची हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सातारा : जिल्ह्यात चार दिवसांपासून अवकाळी ढग असून सातारा शहरात तर शुक्रवारी सकाळच्या सुमारासच पाऊस झाला. यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पळापळ झाली. तर दुपारपर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. सातारा जिल्ह्यात चार दिवसांपासून अवकाळीचा फेरा सुरू झाला आहे. कऱ्हाड, पाटण तालुक्यात तीन दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाला. या पावसाने खरीप हंगामातील पिकांना दणका दिला. 

भात, सोयाबीन पीक काढणीस आलेले आहे त्यावर पावसाचा परिणाम झाला आहे. तर जमिनीत पाणी साठल्याने ऊसतोडी बंद झाल्या आहेत. तसेच कऱ्हाड आणि पाटण तालुक्यात ऊसतोडीसाठी मजूर आले आहेत. त्यांच्या कोपीत पावसाचे पाणी गेल्याने संसार उघड्यावर आले. या अवकाळी पावसाचा फटका पश्चिम भागातच अधिक बसला आहे. असे असलेतरी माण, खटाव तालुक्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण, सध्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी केली आहे. पीक उगवून आल्याने पाणी मिळाले आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठीही हा पाऊस उपयुक्त ठरला.

मागील चार दिवसांत जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. तर कोठे ढगाळ वातावरण तयार होत आहे. असे असतानाच सातारा शहरात शुक्रवारी सकाळीच रिमझिम स्वरुपात पाऊस पडला. यामुळे बाजारपेठेत तुरळक लोक दिसून आले. सध्या दिवाळी सणानिमित्ताने बाजारपेठ सजली आहे. यातच पाऊस होत असल्याने नागरिकांना वातावरण पाहूनच बाहेर पडावे लागत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmonsoonमोसमी पाऊसpatan-acपाटण