शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ऐन दिवाळीत अवकाळी पाऊस : खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पळापळ

By नितीन काळेल | Updated: November 10, 2023 16:05 IST

साताऱ्यात ऐन दिवाळीत अवकाळी पावसाची हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सातारा : जिल्ह्यात चार दिवसांपासून अवकाळी ढग असून सातारा शहरात तर शुक्रवारी सकाळच्या सुमारासच पाऊस झाला. यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पळापळ झाली. तर दुपारपर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. सातारा जिल्ह्यात चार दिवसांपासून अवकाळीचा फेरा सुरू झाला आहे. कऱ्हाड, पाटण तालुक्यात तीन दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाला. या पावसाने खरीप हंगामातील पिकांना दणका दिला. 

भात, सोयाबीन पीक काढणीस आलेले आहे त्यावर पावसाचा परिणाम झाला आहे. तर जमिनीत पाणी साठल्याने ऊसतोडी बंद झाल्या आहेत. तसेच कऱ्हाड आणि पाटण तालुक्यात ऊसतोडीसाठी मजूर आले आहेत. त्यांच्या कोपीत पावसाचे पाणी गेल्याने संसार उघड्यावर आले. या अवकाळी पावसाचा फटका पश्चिम भागातच अधिक बसला आहे. असे असलेतरी माण, खटाव तालुक्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण, सध्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी केली आहे. पीक उगवून आल्याने पाणी मिळाले आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठीही हा पाऊस उपयुक्त ठरला.

मागील चार दिवसांत जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. तर कोठे ढगाळ वातावरण तयार होत आहे. असे असतानाच सातारा शहरात शुक्रवारी सकाळीच रिमझिम स्वरुपात पाऊस पडला. यामुळे बाजारपेठेत तुरळक लोक दिसून आले. सध्या दिवाळी सणानिमित्ताने बाजारपेठ सजली आहे. यातच पाऊस होत असल्याने नागरिकांना वातावरण पाहूनच बाहेर पडावे लागत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmonsoonमोसमी पाऊसpatan-acपाटण