शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

वीज कर्मचाऱ्यांचे चार दिवसांपासून अविरत परिश्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:41 IST

सातारा : कोरोना महामारीमुळे सारे जग थांबले असतानाही वीज कर्मचारी मात्र अखंडित वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यातच ‘तौक्ते’ चक्रीवादळाने ...

सातारा : कोरोना महामारीमुळे सारे जग थांबले असतानाही वीज कर्मचारी मात्र अखंडित वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यातच ‘तौक्ते’ चक्रीवादळाने विस्कळीत झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अविरत प्रयत्नांमुळे बारामती परिमंडलाने सोलापूर, सातारा व बारामती मंडलातील ९५ टक्क्यांहून अधिक वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळवले आहे.

‘तौक्ते’ चक्रीवादळाने बारामती परिमंडलातील ५६ वीज उपकेंद्रांना ठप्प केले होते. मात्र, महावितरणने यंत्रणा युद्धपातळीवर राबवून सर्व वीज उपकेंद्रे व त्यातून निघणाऱ्या वीज वाहिन्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळवले आहे. कोरोना रुग्णालये, केअर सेंटर, ऑक्सिजन प्लांट आदी अत्यावश्यक सेवांचा वीजपुरवठा काही तासांतच सुरु केला होता. यामध्ये ५४ उपकेंद्रे दुसऱ्याच दिवशी सुरु झाली. मात्र, महाबळेश्वरमधील वेण्णालेक व कोळीआळी जीआयएस उपकेंद्रे सुरु होण्यास वारंवार अडथळे येत होते. उशिरा ही दोन्ही उपकेंद्रे पूर्ववत झाली.

बारामती परिमंडलात ७ लाख २४ हजार ३८८ ग्राहकांचा वीजपुरवठा चक्रीवादळाने विस्कळीत झाला होता. बुधवारी दुपारपर्यंत ७ लाख १२ हजार ४२० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला. त्यासाठी ६२३ विजेचे खांब उभे करण्यात आले. बाधित झालेल्या १ हजार ४३८ पैकी १४१५ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. अद्याप गावाबाहेर, डोंगरात वस्ती करून राहिलेल्या १४५ रोहित्रांचा वीजपुरवठा पूर्ववत करणे बाकी आहे.

बारामती परिमंडलात चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका सातारा जिल्ह्याला बसला आहे. सातारा जिल्ह्यातील ४ लाख ५४ हजार ५९५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यातील ४ लाख ४२ हजार ७५८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. अद्याप महाबळेश्वर व पाचगणी भागातील ८ हजार व कऱ्हाड विभागातील ३१०० ग्राहकांच्या वीजपुरवठ्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. याकामी महावितरणचे व ठेकेदारांचे मनुष्यबळ अहोरात्र परिश्रम घेत आहे.

कोट :

कोविड काळात सामान्यांना घरात बसू वाटेल, अशी व्यवस्था महावितरणमुळेच होऊ शकली. महामारीच्या या काळात प्रचंड उत्साह आणि उमेदीने महावितरणच्या शेवटच्या फळीपर्यंत सर्वांनी काम केले. तौक्ते वादळाने केलेली दैनाही आमच्या माणसांनी चोवीस तासात दुरूस्त करून आमची कार्यक्षमता सिध्द केली.

- गौतम गायकवाड, अधीक्षक अभियंता, महावितरण, सातारा