शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीची चाकरी करणाºयांचा सत्कार हे दुर्दैव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखटाव : ‘माण-खटावच्या स्वाभिमानासाठी आजपर्यंत प्रत्येक आघाडीवर लढत आलो आहे. पाण्याची लढाई तर प्राणपणाने लढलो. शरद पवारांसह अनेक बड्या नेत्यांनी जनतेला फसविले. रामराजे तर पृथ्वीच्या अंतापर्यंत माणला पाणी मिळणार नाही, असे सांगायचे. त्यांच्यामुळेच माण-खटावच्या पाणी योजनांची परवड झाली. आपल्याला पाण्यापासून वंचित ठेवून फक्त बारामतीकरांची चाकरी करणाºया रामराजेंचा फटाके ...

लोकमत न्यूज नेटवर्कखटाव : ‘माण-खटावच्या स्वाभिमानासाठी आजपर्यंत प्रत्येक आघाडीवर लढत आलो आहे. पाण्याची लढाई तर प्राणपणाने लढलो. शरद पवारांसह अनेक बड्या नेत्यांनी जनतेला फसविले. रामराजे तर पृथ्वीच्या अंतापर्यंत माणला पाणी मिळणार नाही, असे सांगायचे. त्यांच्यामुळेच माण-खटावच्या पाणी योजनांची परवड झाली. आपल्याला पाण्यापासून वंचित ठेवून फक्त बारामतीकरांची चाकरी करणाºया रामराजेंचा फटाके फोडून माणमधे सत्कार होतो, हे मोठे दुर्दैव आहे,’ असा घणाघात आमदार जयकुमार गोरे यांनी केला.नरवणे, ता. माण येथे उरमोडी उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याचे पूजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, तालुकाध्यक्ष अर्जुनतात्या काळे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, माजी सभापती अतुल जाधव, सिध्दार्थ गुंडगे, विजय धट, नितीन दोशी, सुरेश म्हेत्रे, रामभाऊ देवकर, अकील काझी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार गोरे पुढे म्हणाले, ‘पाण्याचे राजकारण करून आजपर्यंत अनेकांनी माण-खटावच्या जनतेच्या भावनांशी खेळ केला. मी राजकारणात येताना दिलेला शब्द पूर्ण करत गेल्या चार वर्षांपासून उरमोडीचे पाणी दोन्ही तालुक्यात आणून दुष्काळी जनतेची सेवा करत आहे. माण-खटावच्या मातीची तहान भागवताना, इथल्या शिवारातून कॅनॉलचे पाणी वाहताना आणि ऊसासह बागायती शेती फुलताना समाधान होत आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून माण आणि खटाव या दुष्काळी तालुक्यातील जनता पाण्यासाठी टाहो फोडत आहे. आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधींनी या दोन्ही तालुक्यात पाण्याचे फक्त राजकारण केले. इथल्या जनतेला आश्वासनांवर झुलवत ठेवत राजकीय स्वार्थ साधला. जनतेला जगूही दिले नाही आणि मरूही दिले नाही. युद्ध फक्त घोषणा करून जिंकता येत नाही तर त्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून लढाई लढावी लागते. दुदैर्वाने पाण्यासाठी अशी लढाई कुणी लढलीच नाही.’मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उरमोडीचे विजबिल भरण्यासाठी सरकारला भाग पाडले. उरमोडीचे पाणी माणमधील गोंदवले, किरकसाल, पळशी, म्हसवड, देवापूर, वाकी अशा अनेक गावांमधे नेले आहे. आता हे पाणी नरवणे भागात आले आहे. पुढे वडजलमधे पाणी न्यायचे आहे. ढाकणी तलावातही पाणी सोडायचे आहे. पुढच्या वर्षी उरमोडीचे पाणी जांभुळणीच्या तलावात नेण्याची व्यवस्था करणार आहे.‘शेतकºयांनी या पाण्याचे महत्त्व जाणून ते जपून वापरावे. शेतात अधिकाधिक ठिबकसिंचन करावे.’ असेही गोरे शेवटी म्हणाले.यावेळी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, उरमोडीचे वाहणारे पाणी पाहून कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.लढाई सुरूच राहणार...माण-खटावमधील जनतेने आजपर्यंत खूप संघर्ष केला आहे. आहे त्यात समाधान मानून आपण जगतो. प्रतिकूल परिस्थितीशी लढताना इथली जनता सोशीक बनली आहे. आता मात्र दिलेला शब्द पाळत मी इथल्या काळ्या आईचे ऋण फेडत आहे. यापुढेही निवडणुका होतील, आरोप-प्रत्यारोप होतील. मात्र, माझी पाण्याची लढाई सुरूच राहील.पालकमंत्री बोलघेवडेआमदार गोरे म्हणाले, ‘पालकमंत्री मात्र फक्त बोलघेवडे आहेत. ते एका वर्षात जिहेकटापूर उपसासिंचन योजना पूर्ण करणार होते. पहिल्या वर्षी त्या योजनेला फक्त ७० हजारांचा निधी देणाºयांना आघाडीच्या काळात जिहेकटापूरसाठी मंजूर झालेले १२५ कोटी अद्याप खर्च करता आले नाहीत. आघाडीचे सरकार असते तर जिहेकटापूर योजना मार्गी लावली असती.जयकुमार गोरे उवाचराज्यात सरकार कुणाचेही असो माणमधे फक्त जयकुमारचेच सरकारआजपर्यंत आणि आत्ताही पाणी या फकड्यानेच आणले आहे. आता बारसे घालायला कुणीही यावे.उरमोडीचे पाणी लवकरच ढाकणी तलावात सोडणारमाण तालुक्याच्या शेवटच्या टोकाला पाणी पोहचेपर्यंत संघर्ष सुरूच रहाणार