शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

बेरोजगारी, कर्जबाजारीपणा अन् दुष्काळ दहा तोंडी रावणासारखे - आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:41 IST

आदित्य ठाकरे म्हणाले, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण तर २० टक्के राजकारणाचा मूलमंत्र दिला. हे कार्य अविरत सुरू ठेवण्यासाठी जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज रहिमतपूर येथे आलो आहे. मी येथे केवळ मत मागायला नव्हे तर नवमहाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न घेऊन आलो आहे.’

ठळक मुद्दे। रहिमतपूर येथे महायुतीच्या उमेदवारांची प्रचारसभा

रहिमतपूर : ‘बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ आदी प्रश्न दहा तोंडी रावणासारखे राज्यापुढे उभे आहेत. राज्याच्या विकासाच्या प्रक्रियेत आड येणाऱ्या दहातोंडे रावणाचा वध करीत पुन्हा युतीचे सरकार सत्तेवर येईल,’ असा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे क-हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम व लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उदयनराजे भोसले, धैर्यशील कदम, शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे- पाटील, माजी आमदार कांताताई नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण तर २० टक्के राजकारणाचा मूलमंत्र दिला. हे कार्य अविरत सुरू ठेवण्यासाठी जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज रहिमतपूर येथे आलो आहे. मी येथे केवळ मत मागायला नव्हे तर नवमहाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न घेऊन आलो आहे.’यावेळी उदयनराजे भोसले, धैर्यशील कदम, नितीन बानगुडे-पाटील, कांताताई नलवडे, रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांनी मनोगत व्यक्त केले.

सभेला शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, पुरुषोत्तम जाधव, अ‍ॅड. विशाल शेजवळ, नगरसेविका रुक्मिणी सुतार, चित्रा महाडिक, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, भीमराव पाटील, सुनीता कदम, पंचायत समितीच्या सदस्या विजया गुरव, रवींद्र भोसले, पक्षनेते रामकृष्ण वेताळ, संपतराव माने व ग्रामस्थ उपस्थित होते.रहिमतपूर येथे शनिवारी झालेल्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांनी भाषण केले. यावेळी चंद्रकांत जाधव, पुरुषोत्तम जाधव, नितीन बानगुडे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShiv Senaशिवसेना