शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

आवास योजनेत सातारा राज्यात दुसरा-पाच हजार कुटुंबांना मिळालं हक्काचं घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:33 IST

आयुष्यात प्रत्येकाला आपलं स्वत:चं घर असावं, असं वाटतं; मात्र आयुष्यभर राब-राब राबूनही अनेकांना हक्काचं घर बांधता येत नाही. कधी आयुष्य सरलं, हेही समजत नाही. अशा अनेकांना आधार मिळालाय तो

ठळक मुद्देलाभार्थ्यांना मिळते दीड लाखाचे अनुदान

दत्ता यादव ।सातारा : आयुष्यात प्रत्येकाला आपलं स्वत:चं घर असावं, असं वाटतं; मात्र आयुष्यभर राब-राब राबूनही अनेकांना हक्काचं घर बांधता येत नाही. कधी आयुष्य सरलं, हेही समजत नाही. अशा अनेकांना आधार मिळालाय तो पंतप्रधान आवास योजनेचा. या माध्यमातून प्रत्येकाला निवारा उपलब्ध करून देता-देता जिल्हा परिषदेचा डीआरडीए विभागाने गोरगरिबांना हक्काचा निवारा मिळवून देण्यात राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

हल्ली घर बांधणं म्हणजे, आवाक्याच्या बाहेरचं आहे. वीट, सिमेंट, वाळू आदी घर बांधणीचे लागणारे साहित्य दिवसेंदिवस महाग होत चालल्याने सर्वसामान्यांना घर बांधणं हे केवळ आता स्वप्नच राहिलं आहे.मात्र, जिल्हा परिषदेच्या डीआरडीए (जिल्हा ग्रामीण विभाग यंत्रणा) विभागाने अनेकांची स्वप्नपूर्तीच नव्हे तर गोरगरिबांना हक्काचं घर उपबल्ध करून दिलं आहे.

जिल्ह्यात वर्षभरात तब्बल ५ हजार ८२८ कुटुंबांना हक्काचा निवारा मिळाला आहे. १ हजार १०८ घरांचे बांधकाम सुरू असून, ६ हजार ३७२ घरांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे केवळ एका वर्षात तब्बल दहा हजार कुटुंबांच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

पूर्वी इंदिरा आवास योजनेतून १ लाख १० हजार अनुदान मिळत होते. मात्र, या योजनेला प्रधानमंत्री आवास योजना असे नामांतर करण्यात आले. सध्या १ लाख ५० हजार अनुदान घर बांधण्यासाठी शासनाकडून मिळत आहेत.लाभार्थ्याला १ लाख २० हजार थेट अनुदान, रोजगार हमी योजनेतून घरावर काम करणाऱ्या लोकांसाठी १८ हजार आणि स्वच्छ भारत मिशनमधून १२ असे १ लाख ५० हजार अनुदान मिळत आहे. 

आधी पैसे.. नंतर घरपूर्वी घर बांधताना लाभार्थ्याला स्वत: च्या खिशातील पैसे खर्च करून घराचे बांधकाम सुरू करावे लागत होते. परिणामी अनेकांकडे पैसे नसल्यामुळे घर मंजूर होऊनही नाईलाज होत होता. त्यामुळे मंजूर झालेले घर मुदतीअभावी परत जात होते. त्यामुळे प्रशासनाने गोरगरिबांचा विचार करून घराचे काम सुरू करण्यासाठीच पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे साहजिकच आता मंजूर झालेली घरे वेळेत पूर्ण होत आहेत.सातारा जिल्ह्याने घरकूल बांधणीमध्ये उद्दिष्ट्य पूर्ण केले असून, राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. अद्याप अनेक ठिकाणी घरांची कामे सुरू असून, लवकरच सातारा जिल्ह्याचा राज्यात पहिला येण्याचा मानस आहे.-नितीन थाडे, प्रकल्प संचालक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgovernment schemeसरकारी योजना