शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

उंब्रज की पाल... काकांची नवी चाल!

By admin | Updated: December 28, 2015 00:38 IST

कऱ्हाड उत्तरेत उंडाळकरांचा ‘बॉम्ब’ : काका म्हणे.. उत्तरेत कऱ्हाड तालुक्यातून नव्या नेतृत्वाची गरज; कहीं पे निगाहे कहीं पे निशाना

प्रमोद सुकरे -- कऱ्हाड -‘मी राजकारणात कधीही कऱ्हाड दक्षिण-उत्तर असा भेदभाव केलेला नाही. उत्तरेत संघर्षातून नेतृत्व पुढे आले तर आमदार होऊ शकते. उंब्रज, मसूर, चरेगाव, पाल येथून नवे नेतृत्व उदयास येण्याची गरज आहे. त्यांच्या पाठीशी मी ठाम उभा राहीन,’ असा राजकीय बॉम्ब ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकरांनी नुकताच उंब्रज येथे टाकला. ‘कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना’ साधणाऱ्या उंडाळकरांच्या बोलण्यामागचं खरं ‘उत्तर’ कोणालाच सापडेनासं झालंय. परिणामी, राजकीय वर्तुळात त्यांच्या बोलण्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. कऱ्हाड तालुक्याच्या राजकारणात विलासराव पाटील- उंडाळकर अन् दिवंगत पी. डी. पाटील यांच्या गटाचे सख्ख्य अनेक वर्षे जनतेने पाहिले आहे. लोकसंख्येने मोठ्या असणाऱ्या या तालुक्यात दक्षिण व उत्तर असे दोन विधानसभा मतदारसंघ सुरुवातीपासून आहेत. त्यात दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मदतीचा हात द्यायचा, हा अलिखित करार अनेक वर्षे दोन्ही गटांनी सांभाळला होता. त्यामुळे तालुक्यातील विविध संस्थांमध्ये या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळत गेली. परिणामी विरोधकांची डाळ इथे शिजतच नव्हती. यात दक्षिणच्या नेतृत्वाची पकडच अधिक भक्कम होती, हे मात्र नक्की !सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी अजित पवारांच्या रेट्यामुळे उंडाळकरांची जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सत्ता गेली. त्यानंतर तालुक्याच्या राजकारणातही आमदार बाळासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली एक महाआघाडी आकाराला आली अन् बाजार समितीत ऐतिहासिक सत्तांतर झाले. यावेळी खऱ्या अर्थाने दक्षिण अन् उत्तरेतील या दोन आमदारांच्यात अंतर पडल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या अगोदरही घडलेल्या अनेक गोष्टी त्याला कारणीभूत आहेतच बरं..!उत्तरेतील नव्या नेतृत्वाबद्दल उंडाळकरांनी केलेल्या भाष्यामुळे त्यांनाही उत्तरमध्ये कऱ्हाड तालुक्यातीलच आमदार हवा आहे, असे वाटते. पण त्यांना उंब्रज, पाल, चरेगाव, कोपर्डेचे नाव घेऊन दुसऱ्याच कोणा नेतृत्वाचा ‘उदय’तर करायचा नाही ना? अशीही चर्चा सुरू झालीय.काकांनी नव्या नेतृत्वाच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची ग्वाही तर दिलीय; पण पालीचा ‘देव’ त्यांना पावणार का? उंडाळकरांच्या महत्त्वकांक्षेचा ‘पतंग’ चरेगावातून उडणार का?, मसूरमध्ये कोणी उंडाळकरांना ‘माण’ देत बंडखोरीचं रण‘सिंग’ फुंकणार का? हे पाहावे लागेल. सध्या तरी काका उंब्रजच्या सभेत नेमकं ‘काय’ बोलले अन् असंच ‘का’ बोलले याचा जनतेत खल सुरू आहे. काकांची ‘गुगली’ नेमकी कोणाची ‘विकेट’ घेणार, हा सुद्धा प्रश्न आहे. खरंतर काकांच्या मनाचा थांगपत्ता आत्तापर्यंत कोणालाच लागलेला नाही. अनेकदा त्यांची दाखवायची दिशा एक असते, तर जाण्याचा मार्ग दुसराच असतो. त्यामुळे त्यांच्या या बोलण्याचा अर्थ नेमका काय अन् कसा घ्यायचा, हे लोकांना समजेनासे झालेय....सन २००४ मध्ये कऱ्हाड शहर उत्तर मतदारसंघात असताना आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात तत्कालीन नगरसेवक अरुण जाधव यांनी बंडखोरी केली होती. त्यावेळी जाधवांनी पाटलांना मेटाकुटीला आणले होते. त्यावेळीही जाधवांच्या उमेदवारीला उंडाळकरांचा छुपा पाठिंबा मानला जात होता.सन २००९ मध्ये डॉ. अतुल भोसलेंनी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवित उत्तरेवर स्वारी केली. बाळासाहेबांनी बंडखोरी करीत बाजी मारली खरी; पण भोसलेंना उत्तरेत पाठवून उंडाळकरांनी आपला दक्षिणेतील मार्ग सुकर केल्याचेही म्हटले जाते.कऱ्हाड उत्तरमध्ये पुनर्रचनेनुसार कऱ्हाड, खटाव, कोरेगाव अन् सातारा या ४ तालुक्यांतील मतदारांचा समावेश आहे. यातील अंदाजे ४५ टक्के मतदार कऱ्हाड तालुक्यातील तर उर्वरित ५५ टक्के मतदार खटाव, कोरेगाव अन् सातारा तालुक्यांतील आहेत. त्यामुळे येथे विजयाचा ‘चौकार’ ठोकण्यासाठी चारही तालुक्यांत संपर्क महत्त्वाचा आहे. ‘मनोधैर्य’ थांबणार नाहीगत विधानसभा निवडणुकीत मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांना राष्ट्रवादीच्या विरोधात मिळालेली मते विचार करायला लावणारी आहेत. त्यामुळे या दोघांचेही ‘मनोधैर्य’ निश्चितच वाढले आहे. परिणामी हे दोन्ही उमेदवार २०१९ मध्ये उत्तरच्या फडात निश्चित मानले जातात. काकांनी नव्या नेतृत्वाचा ‘उदय’ केल्यास उत्तरेत चौरंगी लढतही पाहायला मिळू शकते.