शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

उंब्रज की पाल... काकांची नवी चाल!

By admin | Updated: December 28, 2015 00:38 IST

कऱ्हाड उत्तरेत उंडाळकरांचा ‘बॉम्ब’ : काका म्हणे.. उत्तरेत कऱ्हाड तालुक्यातून नव्या नेतृत्वाची गरज; कहीं पे निगाहे कहीं पे निशाना

प्रमोद सुकरे -- कऱ्हाड -‘मी राजकारणात कधीही कऱ्हाड दक्षिण-उत्तर असा भेदभाव केलेला नाही. उत्तरेत संघर्षातून नेतृत्व पुढे आले तर आमदार होऊ शकते. उंब्रज, मसूर, चरेगाव, पाल येथून नवे नेतृत्व उदयास येण्याची गरज आहे. त्यांच्या पाठीशी मी ठाम उभा राहीन,’ असा राजकीय बॉम्ब ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकरांनी नुकताच उंब्रज येथे टाकला. ‘कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना’ साधणाऱ्या उंडाळकरांच्या बोलण्यामागचं खरं ‘उत्तर’ कोणालाच सापडेनासं झालंय. परिणामी, राजकीय वर्तुळात त्यांच्या बोलण्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. कऱ्हाड तालुक्याच्या राजकारणात विलासराव पाटील- उंडाळकर अन् दिवंगत पी. डी. पाटील यांच्या गटाचे सख्ख्य अनेक वर्षे जनतेने पाहिले आहे. लोकसंख्येने मोठ्या असणाऱ्या या तालुक्यात दक्षिण व उत्तर असे दोन विधानसभा मतदारसंघ सुरुवातीपासून आहेत. त्यात दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मदतीचा हात द्यायचा, हा अलिखित करार अनेक वर्षे दोन्ही गटांनी सांभाळला होता. त्यामुळे तालुक्यातील विविध संस्थांमध्ये या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळत गेली. परिणामी विरोधकांची डाळ इथे शिजतच नव्हती. यात दक्षिणच्या नेतृत्वाची पकडच अधिक भक्कम होती, हे मात्र नक्की !सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी अजित पवारांच्या रेट्यामुळे उंडाळकरांची जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सत्ता गेली. त्यानंतर तालुक्याच्या राजकारणातही आमदार बाळासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली एक महाआघाडी आकाराला आली अन् बाजार समितीत ऐतिहासिक सत्तांतर झाले. यावेळी खऱ्या अर्थाने दक्षिण अन् उत्तरेतील या दोन आमदारांच्यात अंतर पडल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या अगोदरही घडलेल्या अनेक गोष्टी त्याला कारणीभूत आहेतच बरं..!उत्तरेतील नव्या नेतृत्वाबद्दल उंडाळकरांनी केलेल्या भाष्यामुळे त्यांनाही उत्तरमध्ये कऱ्हाड तालुक्यातीलच आमदार हवा आहे, असे वाटते. पण त्यांना उंब्रज, पाल, चरेगाव, कोपर्डेचे नाव घेऊन दुसऱ्याच कोणा नेतृत्वाचा ‘उदय’तर करायचा नाही ना? अशीही चर्चा सुरू झालीय.काकांनी नव्या नेतृत्वाच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची ग्वाही तर दिलीय; पण पालीचा ‘देव’ त्यांना पावणार का? उंडाळकरांच्या महत्त्वकांक्षेचा ‘पतंग’ चरेगावातून उडणार का?, मसूरमध्ये कोणी उंडाळकरांना ‘माण’ देत बंडखोरीचं रण‘सिंग’ फुंकणार का? हे पाहावे लागेल. सध्या तरी काका उंब्रजच्या सभेत नेमकं ‘काय’ बोलले अन् असंच ‘का’ बोलले याचा जनतेत खल सुरू आहे. काकांची ‘गुगली’ नेमकी कोणाची ‘विकेट’ घेणार, हा सुद्धा प्रश्न आहे. खरंतर काकांच्या मनाचा थांगपत्ता आत्तापर्यंत कोणालाच लागलेला नाही. अनेकदा त्यांची दाखवायची दिशा एक असते, तर जाण्याचा मार्ग दुसराच असतो. त्यामुळे त्यांच्या या बोलण्याचा अर्थ नेमका काय अन् कसा घ्यायचा, हे लोकांना समजेनासे झालेय....सन २००४ मध्ये कऱ्हाड शहर उत्तर मतदारसंघात असताना आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात तत्कालीन नगरसेवक अरुण जाधव यांनी बंडखोरी केली होती. त्यावेळी जाधवांनी पाटलांना मेटाकुटीला आणले होते. त्यावेळीही जाधवांच्या उमेदवारीला उंडाळकरांचा छुपा पाठिंबा मानला जात होता.सन २००९ मध्ये डॉ. अतुल भोसलेंनी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवित उत्तरेवर स्वारी केली. बाळासाहेबांनी बंडखोरी करीत बाजी मारली खरी; पण भोसलेंना उत्तरेत पाठवून उंडाळकरांनी आपला दक्षिणेतील मार्ग सुकर केल्याचेही म्हटले जाते.कऱ्हाड उत्तरमध्ये पुनर्रचनेनुसार कऱ्हाड, खटाव, कोरेगाव अन् सातारा या ४ तालुक्यांतील मतदारांचा समावेश आहे. यातील अंदाजे ४५ टक्के मतदार कऱ्हाड तालुक्यातील तर उर्वरित ५५ टक्के मतदार खटाव, कोरेगाव अन् सातारा तालुक्यांतील आहेत. त्यामुळे येथे विजयाचा ‘चौकार’ ठोकण्यासाठी चारही तालुक्यांत संपर्क महत्त्वाचा आहे. ‘मनोधैर्य’ थांबणार नाहीगत विधानसभा निवडणुकीत मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांना राष्ट्रवादीच्या विरोधात मिळालेली मते विचार करायला लावणारी आहेत. त्यामुळे या दोघांचेही ‘मनोधैर्य’ निश्चितच वाढले आहे. परिणामी हे दोन्ही उमेदवार २०१९ मध्ये उत्तरच्या फडात निश्चित मानले जातात. काकांनी नव्या नेतृत्वाचा ‘उदय’ केल्यास उत्तरेत चौरंगी लढतही पाहायला मिळू शकते.