शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

उदयनराजेंचे वागणं जुनंच.. गरज सरो अन् वैद्य मरो : शिवेंद्रसिंहराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 16:12 IST

रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील वादाशी माझा दूरवर कसलाही संबंध नाही. त्यामुळे माझे आणि रामराजेंचे सेटिंग, संगनमत आहे, हे खासदारांचे विधान हास्यास्पद आहे. माझे सेटिंग फक्त सातारा आणि जावळीतील जनतेशी आहे आणि तेही आपुलकी, प्रेम आणि विकासकामांपुरते आहे. गरज सरो अन् वैद्य मरो, ही खासदारांची जुनी सवय असून, त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा सातारकरांना येत आहे, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देउदयनराजेंचे वागणं जुनंच.. गरज सरो अन् वैद्य मरो : शिवेंद्रसिंहराजे सातारा-जावळीतील जनतेशी आपुलकीचं सेटिंग

सातारा : रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील वादाशी माझा दूरवर कसलाही संबंध नाही. त्यामुळे माझे आणि रामराजेंचे सेटिंग, संगनमत आहे, हे खासदारांचे विधान हास्यास्पद आहे. माझे सेटिंग फक्त सातारा आणि जावळीतील जनतेशी आहे आणि तेही आपुलकी, प्रेम आणि विकासकामांपुरते आहे. गरज सरो अन् वैद्य मरो, ही खासदारांची जुनी सवय असून, त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा सातारकरांना येत आहे, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.खा. उदयनराजे भोसले यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे आणि रामराजे यांच्यात संगनमत असल्याचे वक्तव्य केले होते. यासंदर्भात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले. लोकसभा निवडणुकीत मी पक्षाशी प्रामाणिक राहून उदयनराजेंचे काम केले. माझ्या मतदारसंघातून मिळालेल्या मताधिक्यावरून ते सिद्ध होत असून, सातारकर जनतेनेही हे पाहिले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी अगदी नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी खा. उदयनराजेंची भाषा आणि वागणे कसे होते, हे जनतेला चांगलेच माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्यात कसा आणि किती फरक पडला, हेही जनतेने जवळून पाहिले आहे आणि लोकसभेच्या निकालानंतर त्यांच्या वागण्यात, बोलण्यात काय बदल झाला आहे, हे सगळ्यांनाच दिसत आहे.

नीरा-देवघरच्या पाण्याशी माझा आणि माझ्या मतदार संघाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे उदयनराजे आणि रामराजे यांच्यात सुरू असलेले भांडण कशासाठी आहे, हे मला माहिती नाही आणि माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही.लोकसभा निवडणुकीनंतर माझ्या मतदारसंघात ज्या काही गोष्टी मला जाणवल्या, त्या मी पक्षश्रेष्ठी शरद पवार यांच्या कानावर घातल्या. मी काम केलं का नाही, हे जनतेने पाहिले आहे आणि मताधिक्यावरूनही स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत उदयनराजे जे बोलत होते, त्याप्रमाणे त्यांनी वागणे अपेक्षित आहे.माझा काय संंबंध...?कोण कसं वागतंय, हे सातारकरांनी व सातारा-जावळीतील जनतेनं बघावं. कोणं कसं बदललंय, हेही पाहावं. मी सातारा- जावळीतील जनतेशी नेहमीच बांधील राहिलो आहे आणि यापुढेही कायम बांधील राहणार आहे. सातारकर आणि माझ्या मतदार संघातील जनतेमुळेच मी आहे. हे मी कदापि विसरत नाही आणि त्यामुळेच माझ्या वागण्यात आणि बोलण्यात कधीही बदल दिसणार नाही. त्यामुळे खासदारांनी संबंध नसलेल्या गोष्टींशी माझा संबंध लावू नये आणि उगाच दिशाभूल करू नये, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Shivendrasinghraja Bhosaleशिवेंंद्रसिंहराजे भोसलेUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसर