शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

उदयनराजेंचे वागणं जुनंच.. गरज सरो अन् वैद्य मरो : शिवेंद्रसिंहराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 16:12 IST

रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील वादाशी माझा दूरवर कसलाही संबंध नाही. त्यामुळे माझे आणि रामराजेंचे सेटिंग, संगनमत आहे, हे खासदारांचे विधान हास्यास्पद आहे. माझे सेटिंग फक्त सातारा आणि जावळीतील जनतेशी आहे आणि तेही आपुलकी, प्रेम आणि विकासकामांपुरते आहे. गरज सरो अन् वैद्य मरो, ही खासदारांची जुनी सवय असून, त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा सातारकरांना येत आहे, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देउदयनराजेंचे वागणं जुनंच.. गरज सरो अन् वैद्य मरो : शिवेंद्रसिंहराजे सातारा-जावळीतील जनतेशी आपुलकीचं सेटिंग

सातारा : रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील वादाशी माझा दूरवर कसलाही संबंध नाही. त्यामुळे माझे आणि रामराजेंचे सेटिंग, संगनमत आहे, हे खासदारांचे विधान हास्यास्पद आहे. माझे सेटिंग फक्त सातारा आणि जावळीतील जनतेशी आहे आणि तेही आपुलकी, प्रेम आणि विकासकामांपुरते आहे. गरज सरो अन् वैद्य मरो, ही खासदारांची जुनी सवय असून, त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा सातारकरांना येत आहे, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.खा. उदयनराजे भोसले यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे आणि रामराजे यांच्यात संगनमत असल्याचे वक्तव्य केले होते. यासंदर्भात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले. लोकसभा निवडणुकीत मी पक्षाशी प्रामाणिक राहून उदयनराजेंचे काम केले. माझ्या मतदारसंघातून मिळालेल्या मताधिक्यावरून ते सिद्ध होत असून, सातारकर जनतेनेही हे पाहिले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी अगदी नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी खा. उदयनराजेंची भाषा आणि वागणे कसे होते, हे जनतेला चांगलेच माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्यात कसा आणि किती फरक पडला, हेही जनतेने जवळून पाहिले आहे आणि लोकसभेच्या निकालानंतर त्यांच्या वागण्यात, बोलण्यात काय बदल झाला आहे, हे सगळ्यांनाच दिसत आहे.

नीरा-देवघरच्या पाण्याशी माझा आणि माझ्या मतदार संघाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे उदयनराजे आणि रामराजे यांच्यात सुरू असलेले भांडण कशासाठी आहे, हे मला माहिती नाही आणि माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही.लोकसभा निवडणुकीनंतर माझ्या मतदारसंघात ज्या काही गोष्टी मला जाणवल्या, त्या मी पक्षश्रेष्ठी शरद पवार यांच्या कानावर घातल्या. मी काम केलं का नाही, हे जनतेने पाहिले आहे आणि मताधिक्यावरूनही स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत उदयनराजे जे बोलत होते, त्याप्रमाणे त्यांनी वागणे अपेक्षित आहे.माझा काय संंबंध...?कोण कसं वागतंय, हे सातारकरांनी व सातारा-जावळीतील जनतेनं बघावं. कोणं कसं बदललंय, हेही पाहावं. मी सातारा- जावळीतील जनतेशी नेहमीच बांधील राहिलो आहे आणि यापुढेही कायम बांधील राहणार आहे. सातारकर आणि माझ्या मतदार संघातील जनतेमुळेच मी आहे. हे मी कदापि विसरत नाही आणि त्यामुळेच माझ्या वागण्यात आणि बोलण्यात कधीही बदल दिसणार नाही. त्यामुळे खासदारांनी संबंध नसलेल्या गोष्टींशी माझा संबंध लावू नये आणि उगाच दिशाभूल करू नये, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Shivendrasinghraja Bhosaleशिवेंंद्रसिंहराजे भोसलेUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसर