शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उदयनराजेंच्या चुकीला पाठबळ नाही

By admin | Updated: July 4, 2017 22:30 IST

उदयनराजेंच्या चुकीला पाठबळ नाही

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘खासदार उदयनराजे राष्ट्रवादीत आहेत की नाहीत, हा प्रश्न त्यांनाच तुम्ही विचारा, पक्ष मेळाव्याच्या बॅनरवर त्यांचे छायाचित्र का नाही? हे माझ्यापेक्षा अधिक जिल्ह्यातील नेतेच सांगतील. तसेच उदयनराजेंच्या चुकीला राष्ट्रवादी पक्ष पाठबळ देणार नाही. मात्र, त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल झाला आहे, हे आम्हाला माहीत नाही,’ असा शब्दछल्ल करीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खासदार उदयनराजेंबाबतची संदिग्ध भूमिका जाहीर केली. सातारा येथे राष्ट्रवादी पक्ष मेळाव्यानंतर माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुनील तटकरे बोलत होते. बहुतांश प्रश्नांना अजित पवार यांनीच उत्तरे दिली. मात्र, उदयनराजेंचा विषय निघताच अजित पवार तत्काळ तटस्थ झाले अन् लगत बसलेल्या सुनील तटकरे यांनी उदयनराजेंबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘सातत्याने नवीन अध्यादेश काढून अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. नगरपालिकेचे नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याच्या निर्णयानंतर ग्रामपंचायतींचे सरपंचही थेट जनतेतून निवडण्याचा डाव खेळणाऱ्या भाजपची वाटचाल अध्यक्षीय राजवटीकडे सुरू आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘नगरपालिका व ग्रामपंचायतींमध्ये भाजपला बहुमत मिळत नाही, म्हणून अध्यक्ष व सरपंच निवडी थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिगटाने घेतलेल्या या निर्णयामुळे गावागावात वादाची ठिणगी पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुमत एका बाजूला, तर नगराध्यक्ष अथवा सरपंच एका बाजूला, अशी स्थिती निर्माण होईल. सरपंचाने एखादा ठराव मांडला तर त्याला बहुमतातील विरोधकांकडून निश्चितपणे विरोध होईल. साहजिकच राजकीय वादावादीमुळे गावांचा विकास खुंटण्याची शक्यता आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात याबाबत सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत.’कर्जमाफीच्या निर्णयाबाबत सरकारच्या दुटप्पी भूमिकेबाबतही पवार यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘३० जून २०१७ पर्यंत शेतकऱ्यांची सर्व कर्जे माफ करण्यात यावीत, अशी आम्ही भूमिका घेतली. मात्र सरकारने ३० जून २०१६ पर्यंत असणारी कर्जेच माफ करण्याची घोषणा केली आहे. २४ जुलै रोजी सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार आहोत.’दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, याबाबत आपल्या पक्षाने आंदोलनदेखील केले नाही, या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, ‘शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची पदे मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त आहेत. ही पदे सरकारने तत्काळ भरली पाहिजेत, अशी मागणी आम्ही वारंवार सरकारकडे केली आहे. एमबीबीएस दर्जाचे डॉक्टर शासकीय नोकरी करण्यासाठी अर्ज करत नसल्याचे सरकारचे म्हणणे होते, त्यावर बीएचएम, बीएएमएस अशा दर्जाचे डॉक्टर भरुन शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची हेळसांड थांबवावी, अशी मागणी आमच्या पक्षाने सरकारला केली आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात या प्रश्नावर सरकारला कोंडीत पकडू,’ असेही यावेळी त्यांनी सांगितले.‘जीएसटी’मुळे धोतर-लुगडीही महागमोदी सरकारने तीन वर्षांत केवळ घोषणा केल्या. लोकांना भुरळ पाडली. परदेशातील काळा पैसा आणणार, १५ लाख रुपये लोकांच्या खात्यात जमा करणार, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी, शेती उत्पादनाला आधारभूत किंमत, नोकऱ्या उपलब्ध करणार, उद्योगक्षेत्र वाढविणार, अशा घोषणा मोदींनी निवडणुकीपूर्वी केल्या होत्या. मात्र, एकही घोषणा सत्यात उतरलेली नाही. उलट जीएसटी लागू करून सर्वसामान्यांचे धोतर-लुगडीही सरकारने महाग केली, अशी टीका पवार यांनी केली.