शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

‘राम-लक्ष्मणा’च्या जोडीवर उदयनराजेंनी डागली पुन्हा तोफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2015 00:04 IST

वाई-खंडाळा बैठक : भ्रष्टाचारामुळे राष्ट्रवादीची राज्यात वाताहात

वाई : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी इच्छुकांची मनधरणी करण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांची दमछाक होत असतानाच राष्ट्रावादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बँकेची सत्ता गाजवणाऱ्या राम-लक्ष्मण जोडीलाच लक्ष केल्याने राष्ट्रवादी पुढे आणखी पेच वाढला आहे़ उदयनराजे यांनी खंडाळ्यातील बैठक आटोपून वाई येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हा बँकेच्या निवडणूक संदर्भात पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षावर आरोप-प्रत्यारोप करीत पक्षाला घरचा आहेर दिला आहे़उदयनराजे म्हणाले की, ‘जिल्हा बँकेच्या कारभाराविषयी मी पोट तिडकीने आवाज करीत वेळोवेळी सामान्यांच्या हितासाठी बँकेतील राजकारण व घडामोडी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. प्रस्थापितांना खड्यासारखे बाजूला ठेवून नवीन चेहऱ्यांना संधी मिळणे आवश्यक आहे़ सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही सातारा जिल्ह्यात असून, तिची सूत्रे बारामतीतून हालविली जातात, ती काय पुणे जिल्ह्याची बँक नव्हे़ बँकेतील राजकारण सत्ताधाऱ्यांनी कोणालाही कळून दिले नाही़ बारामतीकरांना खूश करण्यासाठी या राम-लक्ष्मण जोडीने जिल्ह्याचा स्वाभिमान गहाण टाकला आहे़ जिल्ह्यातील आठ आमदार व एक खासदार जिल्ह्याचे मालक नसून जिल्ह्यातील वीस लाख जनता हीच खरी मालक आहे़ सत्तेच्या विकेंद्रीकरणाऐवजी हे लोक सत्तेचे केंद्रीकरण करतात. जिल्हा बँक, साखर कारखाने, पंचायत समिती, आमदारकी, खासदारकी हे सर्व याच लोकांना पाहिजे़ हे लोक कुटुंब केंद्रित राजकारण करतात, असे राज्यात कुटुंब केंद्रित राजकारण करणाऱ्या कुटुंबांना जनतेने धडा शिकविला आहे़ तुमच्यात हिंमत असेल तर मी गांधी मैदानावर खुल्या चर्चेस तयार असून, एकदाच आपला सोक्षमोक्ष होऊन जाऊ द्या, असे खुले आव्हानही त्यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी) किसन वीर कारखान्यावर पाचशे कोटींच्या कर्जाचा बहाणा करून राष्ट्रावादीने या निवडणुकीतून माघार घेतली आहे़; पंरतु त्यांनी या रकमेतून कारखान्यावर डोंगरावएवढे विविध प्रकल्प उभारले यातून ते कर्ज फेडण्यासाठी सक्षम आहेत़ इतरांसारखे सहकार मोडून कारखान्याचे खासगी करून घशात घातले नाही. जरंडेश्वरचा गुरू कोण आहे, हे मी शोधून काढणार आहे. बँकेची निवडणूक झाल्यानतंर त्याच्या घशातून कारखाना काढून जनतेच्या स्वाधीन करणार आहे़ खर्डेकर, पोळ, वाठारकरांना आपल्यामुळेच संधी मी आग्रहाची भूमिका घेतल्यानेच दादाराजे खर्डेकर, सदाशिव पोळ व विलासबापू वाठारकर यांना बँकेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली, असा दावाही उदयनराजेंनी यावेळी केला.