शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

उदयनराजेंना नसते सल्ले देणाºयांनी आधी खरं बोलावं विजय बडेकर : जाती-जातींमधील सलोखा अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:49 IST

सातारा : ‘खासदार उदयनराजे भोसले यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणात व्यक्त केलेली प्रतिक्रिया ही समाजाबद्दलच्या तळमळीतून व्यक्त केली आहे.

सातारा : ‘खासदार उदयनराजे भोसले यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणात व्यक्त केलेली प्रतिक्रिया ही समाजाबद्दलच्या तळमळीतून व्यक्त केली आहे. आत्तापर्यंत त्यांनी जात-पात मानली नाही, हे उदयनराजेंना सल्ले देणाºयांनी लक्षात घ्यावं आणि त्यांच्यासारखंच खरं बोलण्याचं धाडस दाखवावं,’ असे मत माजी नगराध्यक्ष विजय बडेकर यांनी व्यक्त केले.त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरेगाव-भीमा प्रकरणात खासदार उदयनराजे भोसले यांनी जे मत व्यक्त केले, त्याला माणुसकीची झालर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मागासवर्गीयांबरोबरच शहराचे नगराध्यक्ष करत असताना उदयनराजे किती निस्वार्थी आणि सरळ मनाचे आहेत, याचा प्रत्त्यय वेळोवेळी आला आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेचा कोणी कसाही अर्थ लावून त्यांना अगांतूक सल्ले देत आहेत.

लोकशाहीत बोलण्याच अधिकार प्रत्येकाला आहे. खासदार उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवरायांचे थेट वंशज असल्याने त्यांच्या प्रतिक्रियेची गरज प्रसारमाध्यमांना वाटते. याच मुलाखतीत खासदार उदयनराजेंनी ‘एखाद्या व्यक्तीला रक्त लागले तर आपण जात पाहून रक्त घेतो का? मग जाती-पातीवर अशा दंगली का होतात?,’ असा मार्मिक सवाल मुलाखतकारास उदयनराजेंनीच विचारला होता. उदयनराजेंनी दिलेल्या मुलाखतीचे विश्लेषण करताना काहीजण शब्दछल करत आहेत. प्रत्येक शब्दाचे वेगळे अर्थ काढून त्यांनी संसदेत बोलायला पाहिजे होते, त्यांनी अभ्यास करून बोलावे, आदी प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्यावर पूर्वग्रहदूषित वृत्तीतून न पाहता सरळ आणि माणुसकीच्या भावनेतून पाहिल्यास उदयनराजे बरं बोलण्यापेक्षा खरं बोलले आहेत, हे सर्वांनाच जाणवेल. म्हणूनच उदयनराजेंना सल्ले देण्यापेक्षा समाजबांधवांनी त्यांचा दृष्टिकोन स्वच्छ ठेवावा, अशी अपेक्षाही बडेकर यांनी व्यक्त केली आहे.उदयनराजेंची जाहीर माफी मागावी..निखील वागळे यांनी उदयनराजे भोसले यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदनात असे म्हटले की, वागळे यांनी मुलाखतीमध्ये ‘त्यांना किंमत द्यायची गरज नाही. ते जातीयवादी राजकारण करतात,’ असे अपमानजनक वक्तव्य केले आहे. या घटनेबाबत त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकावर सोहेल आतार, वसीम मोमीन यांनी सह्या केल्या आहेत.