शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

उदयनराजेंनी जनतेची जाहीर माफी मागावी: शिवेंद्रसिंहराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:41 IST

सातारा : ‘खासदार उदयनराजे भोसले व कल्पनाराजे भोसले यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या पत्रामुळेच शहरातील पारंपरिक तळ्यातील विसर्जनावर बंदी आली. एकीकडे सांगायचं तळं आमच्या मालकीचं अन् दुसरीकडं तळ्यांवर बंदी आणायची, ही दुटप्पी भूमिका त्यांनी बदलायला हवी. जनतेच्या भावनांशी खेळून गैरसमज निर्माण करणाऱ्या खासदारांनी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडून जाहीर माफी मागावी,’ अशी ...

सातारा : ‘खासदार उदयनराजे भोसले व कल्पनाराजे भोसले यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या पत्रामुळेच शहरातील पारंपरिक तळ्यातील विसर्जनावर बंदी आली. एकीकडे सांगायचं तळं आमच्या मालकीचं अन् दुसरीकडं तळ्यांवर बंदी आणायची, ही दुटप्पी भूमिका त्यांनी बदलायला हवी. जनतेच्या भावनांशी खेळून गैरसमज निर्माण करणाऱ्या खासदारांनी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडून जाहीर माफी मागावी,’ अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले, ‘गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील मंगळवार व मोती तळ्यात गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात होते. याला पोलिसांची अन् प्रशासनाची कोणतीच हरकत नव्हती. मात्र, खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवार तळ्यातील पाणी दूषित होत असल्याचं कारण पुढं करीत न्यायालयाशी पत्रव्यवहार करून विसर्जनाला बंदी आणली. भोसले व कल्पनाराजे यांनीही याबाबत जिल्हाधिकाºयांशी पत्रव्यहार केला होता, असा आरोप त्यांनी केला.’मंगळवार असो की मोती कोणत्याही तळ्याचं पाणी प्यायला वापरलं जात नव्हतं. तरीही पाणी दूषित होत असल्याचे कारण पुढे करण्यात आले. बाहेरच्या लोकांनी जर हे पत्र वाचलं तर त्यांना असं वाटलं की सातारकर याच तळ्यातील पाण्यावर जगतायत की काय? विसर्जन तळ्याच्या मुद्द्यावरून जनतेच्या भावनांशी सुरू केलेला खेळ त्यांनी आता बंद करावा. न्यायालयात दाखल केलेल्या दोन्ही पत्रांचा उदयनराजेंनी खुलासा करावा. वस्तुस्थिती काय आहे, हे स्पष्ट करून त्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी. शहरात कायमस्वरूपी विसर्जन तळ्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली.मुख्याधिकाºयांवर यांचाच दबाव..खासदार उदयनराजे भोसले व कल्पनाराजे भोसले यांनी सांगितल्यानेच तत्कालीन मुख्याधिकाºयांनी न्यायालयात तळ्यांबाबत पत्रव्यवहार केला. मुख्याधिकाºयांवर यांचाच दबाव होता, हे आता स्पष्ट झालं आहे. सातारा विकास आघाडी विसर्जनाबाबत नियोजन करायला कमी पडली आहे, हे त्यांनी मान्य करावे,’ असेही शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले.विसर्जनाचा मुद्दा बिकट झाला असताना नरड्याला आल्यावर तळ्याचं काम कराचयं हे चुकीचं आहे.मंगळवार तळे स्वच्छतेसाठी आम्ही प्रयत्न केले तेव्हा, आम्हाला मनोमिलन असूनही विरोध करण्यात आला.नरेंद्र दाभोलकरांच्या नावाने दिल्या जाणाºया पुरस्काराबाबत आता नगराध्यक्षांनाच विचारायला हवं.विकासकामांना महत्त्व देण्याऐवजी पालिकेत केवळ टोकाचं राजकारण सुरू आहे.सभेपूर्वी जे विषय अजेंड्यावर घेतले जातात ते विषय पुन्हा बदलले जातात. केवळ बहुमताच्या जोरावर विषय मंजूर केले जातात.