शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
5
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
7
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
8
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
9
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
10
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
11
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
12
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
13
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
14
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
15
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
16
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
17
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

उदयनराजेंनी जनतेची जाहीर माफी मागावी: शिवेंद्रसिंहराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:41 IST

सातारा : ‘खासदार उदयनराजे भोसले व कल्पनाराजे भोसले यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या पत्रामुळेच शहरातील पारंपरिक तळ्यातील विसर्जनावर बंदी आली. एकीकडे सांगायचं तळं आमच्या मालकीचं अन् दुसरीकडं तळ्यांवर बंदी आणायची, ही दुटप्पी भूमिका त्यांनी बदलायला हवी. जनतेच्या भावनांशी खेळून गैरसमज निर्माण करणाऱ्या खासदारांनी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडून जाहीर माफी मागावी,’ अशी ...

सातारा : ‘खासदार उदयनराजे भोसले व कल्पनाराजे भोसले यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या पत्रामुळेच शहरातील पारंपरिक तळ्यातील विसर्जनावर बंदी आली. एकीकडे सांगायचं तळं आमच्या मालकीचं अन् दुसरीकडं तळ्यांवर बंदी आणायची, ही दुटप्पी भूमिका त्यांनी बदलायला हवी. जनतेच्या भावनांशी खेळून गैरसमज निर्माण करणाऱ्या खासदारांनी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडून जाहीर माफी मागावी,’ अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले, ‘गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील मंगळवार व मोती तळ्यात गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात होते. याला पोलिसांची अन् प्रशासनाची कोणतीच हरकत नव्हती. मात्र, खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवार तळ्यातील पाणी दूषित होत असल्याचं कारण पुढं करीत न्यायालयाशी पत्रव्यवहार करून विसर्जनाला बंदी आणली. भोसले व कल्पनाराजे यांनीही याबाबत जिल्हाधिकाºयांशी पत्रव्यहार केला होता, असा आरोप त्यांनी केला.’मंगळवार असो की मोती कोणत्याही तळ्याचं पाणी प्यायला वापरलं जात नव्हतं. तरीही पाणी दूषित होत असल्याचे कारण पुढे करण्यात आले. बाहेरच्या लोकांनी जर हे पत्र वाचलं तर त्यांना असं वाटलं की सातारकर याच तळ्यातील पाण्यावर जगतायत की काय? विसर्जन तळ्याच्या मुद्द्यावरून जनतेच्या भावनांशी सुरू केलेला खेळ त्यांनी आता बंद करावा. न्यायालयात दाखल केलेल्या दोन्ही पत्रांचा उदयनराजेंनी खुलासा करावा. वस्तुस्थिती काय आहे, हे स्पष्ट करून त्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी. शहरात कायमस्वरूपी विसर्जन तळ्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली.मुख्याधिकाºयांवर यांचाच दबाव..खासदार उदयनराजे भोसले व कल्पनाराजे भोसले यांनी सांगितल्यानेच तत्कालीन मुख्याधिकाºयांनी न्यायालयात तळ्यांबाबत पत्रव्यवहार केला. मुख्याधिकाºयांवर यांचाच दबाव होता, हे आता स्पष्ट झालं आहे. सातारा विकास आघाडी विसर्जनाबाबत नियोजन करायला कमी पडली आहे, हे त्यांनी मान्य करावे,’ असेही शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले.विसर्जनाचा मुद्दा बिकट झाला असताना नरड्याला आल्यावर तळ्याचं काम कराचयं हे चुकीचं आहे.मंगळवार तळे स्वच्छतेसाठी आम्ही प्रयत्न केले तेव्हा, आम्हाला मनोमिलन असूनही विरोध करण्यात आला.नरेंद्र दाभोलकरांच्या नावाने दिल्या जाणाºया पुरस्काराबाबत आता नगराध्यक्षांनाच विचारायला हवं.विकासकामांना महत्त्व देण्याऐवजी पालिकेत केवळ टोकाचं राजकारण सुरू आहे.सभेपूर्वी जे विषय अजेंड्यावर घेतले जातात ते विषय पुन्हा बदलले जातात. केवळ बहुमताच्या जोरावर विषय मंजूर केले जातात.