शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

दोन वर्षांतच शाहूपुरीत सौरदिव्यांचा ‘उजेड’

By admin | Updated: August 26, 2015 21:27 IST

पथदिवे खांबासहित चोरीस : ग्रामपंचायत हतबल ; बॅटऱ्यांसह सुट्या भागांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने रस्ते अंधारलेले

संतोष कणसे - शाहूपुरी --येथील ग्रामपंचायतीमार्फत बसविण्यात आलेले सर्व सौरदिवे बंद स्थितीत आहेत. सौरदिव्यांचा मोठा फटका ग्रामपंचायतीला बसत असून, अनेक सौरदिव्यांच्या साहित्यासह बॅटऱ्या चोरीस गेल्याने शाहूपुरी ग्रामपंचायत अक्षरश: हतबल झाली आहे. ग्रामपंचायत फंड व कृषी खात्याकडून अनुदान या योजनेअंतर्गत शाहूपुरी ग्रामपंचायतमार्फत २००६ मध्ये १६१ सौरदिवे बसविण्यात आले होते. या परिसरातील सार्वजनिक ठिकाणी सौरदिवे बसविण्याची योजना अत्यंत उपयोगाची होती. येथे गरजेनुसार सौरदिवे देण्यात आले होते. हे दिवे बसविण्याचे काम फत्ते झाले असले तरी काही दिवसांतच या दिव्यांच्या बॅटऱ्या व बल्ब चोरून नेणारी टोळी कार्यरत झाली. बघता-बघता अनेक दिव्यांचे साहित्य चोरीस गेले.ग्रामपंचायतीच्या हद्दीत बसविण्यात आलेले दिवे बंद आहेत, हे प्रकार दिसायला किरकोळ दिसत असले तरी यामध्ये लाखोंचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. एका संचासाठी साधारण २७,५०० इतका खर्च येतो. एकूण अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस लाख खर्च झाला असल्याचे समजते. हा सर्व तोटा ग्रामपंचायतीला सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत स्थापनेनंतर सन २००६ साली सौर पथ दिवे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुशंगाने २००८ पर्यंत तीन टप्प्यात े ५८ लाख खर्चून १६१ सौरपथदिवे खरेदी करुन शाहूपुरीच्या विविध भागात बसविण्यात आले. या उपक्रमाआंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून ग्रामपंचायतीला ५ लाख ५० हजार एवढी एबसिडी देण्यात आली होती.खरेदी करतेवेळी संबंधीत कंपनीने गॅरंन्टीच्या कालावधीत विक्री पश्चात देखभाल दुरूस्ती केली. परंतु त्या दरम्यान सौर दिव्याच्या बॅटऱ्या व पॅनल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले. तसेच वेळच्या वेळी देखभाल दुरूस्तीसाठी सेवा उपलब्ध होवू शकली नाही. शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत सातत्याने वाढणाऱ्या नागरीकरणामुळे सार्वजनिक दिवाबत्तीचा प्रश्न प्रकर्षाने समोर येत होता. २००९ ला ग्रामपंचायतीने पाहणी केली असता सुमारे १५०० पथदिव्यांची आवश्यकता दिसून आली. म्हणून सर्व प्रथम ग्रामपंचायत हद्दीमधील सहकारी गृहनिर्माण संस्थाचे पथदिवे ग्रामपंचायतीकडे वर्ग करुन घेतले व जिल्हा परिषद सातारा यांच्या परवानगीने वाढीव पथ दिव्यांचा प्रस्ताव मंजूर करुन घेतला. २०१२ ला ग्रामपंचायतीने शासनाकडे पाठपुरावा करुन वीजबिल शासनामार्फत भरण्याच्या योजनेत शाहूपुरी ग्रामपंचायतीचा समावेश करून घेतला व २०१२ पर्यंत भरलेल्या वीज बीलांची रक्कम परत मिळावी यासाठी संबंधत कार्यालयाकडे मागणी करण्यात आली आहे. सौरदिवे खांब चोरीस जाऊ नयेत म्हणून लवकरच पंचायत समिती बीडीओ यांच्याबरोबर चर्चा करून पथदिवे खांब हटविण्याचे काम सुरू करण्यात येईल. तसेच खांबाचा लिलाव करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, असे ग्रामविकास अधिकारी एम. व्ही. कोळी यांनी सांगितले.-संतोष कणसेदिव्यांचे झाले काय ?शाहूपुरी परिसरामध्ये सौर पथदिवे बसविण्यात आले होते; मात्र सध्या अनेक सौरदिवे बंद आहेत. काही पथदिवे खांबासहित चोरीस गेलेले आहेत. याठिकाणी सौरदिवे उपयोगी ठरत होते. त्यामुळे या सौरदिव्यांचा फायदा खूप महत्त्वाचा होता. मात्र, देखभाल नसल्यामुळे जवळपास सर्वच पथदिवे बंद आहेत. नवीन बॅटरी टाकायची झाली तरी तीन ते चार हजार रुपये इतका खर्च येतो. याठिकाणी सौरदिव्यांची काय परिस्थिती आहे. याची चौकशी संबंधिताकडून झाली पाहिजे. अशी मागणी नगारिकांमधून होत आहे.