शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

जिल्ह्यात दोन हजार उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Updated: October 30, 2016 00:33 IST

शेवटच्या दिवशी झुंबड : नगरपालिकांसाठी १२६०, तर नगरपंचायतींसाठी ७४६ अर्ज

सातारा : जिल्ह्यातील आठ नगरपालिकांमध्ये एकूण १८२ जागांसाठी १२६०, तर सहा नगरपंचायतींच्या १०२ जागांसाठी ७४६ एवढे अर्ज शेवटच्या दिवसांपर्यंत दाखल झाले आहेत. सातारा पालिकेसाठी २५३ अर्ज दाखल झाले असून, याठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. कऱ्हाड पालिकेसाठी २४१ अर्ज दाखल झाले आहेत, तर फलटण पालिकेतही तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. जिल्ह्यातील आठ नगरपालिका आणि सहा नगरपंचायतींची निवडणूक सुरू आहे. शनिवार हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. म्हसवड पालिका निवडणुकीत रंगत येणार असून, नगरसेवकांच्या १७ जागांसाठी १११, तर नगराध्यक्षपदासाठी विक्रमी असे २४ अर्ज दाखल झाले आहेत. रहिमतपूरला १७ जागांसाठी ५९ अर्ज दाखल झाले आहेत. महाबळेश्वरात १७ जागांसाठी ९२ उमेदवारांचे १२० अर्ज दाखल झाले आहेत. वाईमध्ये २० जागांसाठी १२४ अर्ज दाखल आहेत. जिल्ह्यात कोरेगाव, खंडाळा, वडूज, दहिवडी, पाटण आणि मेढा नगरपंचायतींसाठी पहिल्यांदाच मतदान होत आहे. या निवडणुकीत मोठी चुरस असल्याचे दिसत आहे. कोरेगावमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसेही रिंगणात उतरली आहे. दहिवडीत काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना-भाजप निवडणूक लढवित आहेत. दहिवडीत १७ जागांसाठी ११५ अर्ज दाखल झाले आहेत. वडूजला १७ जागांसाठी तब्बल २०८ अर्ज दाखल आहेत. पाटणला १७ जागांसाठी १४९ अर्ज तर मेढ्यात १७ जागांसाठी ६८ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी) दाखल झालेलेउमेदवारी अर्ज असेपालिका जागाअर्जसातारा ४०२५३कऱ्हाड २९२४१फलटण२५२०१वाई२०१२४रहिमतपूर१७५९महाबळेश्वर१७१२०पाचगणी १७१५१म्हसवड १७१११नगराध्यक्षपदासाठी १०३ अर्जथेट नगराध्यक्ष निवडणूक होत असल्याने नगराध्यक्षपदासाठीही जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसाठी १०३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे, ते असे...नगर पंचायतजागाअर्जकोरेगाव१७१०२खंडाळा१७१०४वडूज१७२०८दहिवडी१७११५मेढा१७६८पाटण१७१४९उदयनराजे उवाच पालिकेत ४०-० केलं नाही तर खासदारकीचा राजीनामा देईन. मी आडमुठेपणा केला असता तर मी २२ महिने जेलमध्ये नसतो. मला त्यावेळी कोणी जेलमध्ये घातलं, हे सगळ्यांना माहीत आहे.त्यांच्या सगळ्या मतांची बेरीज पण माझ्याएवढी होणार नाही. माझे काका शिवाजीराजे त्यांच्यासोबत आहेत. त्यांना डावलून मी फॉर्म भरायला आलो नसतो; पण तत्त्वं महत्त्वाची. शिवेंद्रसिंहराजे उवाच जिल्हा बँक निवडणूक झाली तेव्हापासूनच उदयनराजेंच्या डोक्यात मनोमिलन तोडायचं होतं.मराठ्यांचे हे मूळ घर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने दुभंगलंय, याची खंत माझ्या मनामध्ये कायम राहील.आमदार म्हणून तुम्ही काय केलं, असं त्यांनी विचारणं चुकीचं आहे, असं मला वाटतं.आम्ही खासदारकीला प्रचार केलेला चालतो. जिल्हा बँकेला आम्ही तुम्हाला मदत केलेली चालते. बाकी मात्र तुम्हाला आमचं काहीच चालत नाही, याला काय अर्थ ?