शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
7
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
10
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
11
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
12
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
14
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
15
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
16
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
17
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
18
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
19
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
20
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?

पाथरपुंजसह अन्य दोन गावं लवकरच सांगली जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:19 IST

सातारा : देशात सर्वाधिक पावसाची नोंद झालेले सातारा जिल्ह्यातील पाथरपुंजसह मळे आणि कोळणे ही गावं लवकरच सांगली जिल्ह्यात पुनर्वसित ...

सातारा : देशात सर्वाधिक पावसाची नोंद झालेले सातारा जिल्ह्यातील पाथरपुंजसह मळे आणि कोळणे ही गावं लवकरच सांगली जिल्ह्यात पुनर्वसित होणार असल्याची माहिती आहे. सातारा जिल्ह्यात गावठाण जागा उपलब्ध होत नसल्याने सांगली जिल्ह्यातील जागेची पाहणी केल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली आहे.याबाबत माहिती अशी, कोयनानगरच्या नैऋत्येला असलेले पाथरपुंज हे गाव सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमारेषेवर आहे. पाथरपुंजसह मळे आणि कोळणे या तिन्ही गावांमध्ये मिळून ३५० कुटुंबांचे वास्तव्य आहे. यंदा जून ते आॅगस्टदरम्यान ७ हजार ३५९ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे येथील बहुतांश घरं कोसळली तर काही घरं पडण्याच्या स्थितीत अद्यापही तग धरून आहेत. महापुराचा आढावा घेण्यासाठी मुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीणसिंह परदेशी यांची सांगली-कोल्हापूर पूरपुनर्वसन विशेष समिती समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पाथरपुंज, मळे आणि कोळणे ही तिन्ही गावं चांदोलीच्या गाभा क्षेत्रात वसलेली आहेत. पूरपरिस्थिीतीत या गावांना भेटी दिल्यानंतर परदेशी यांनी या गावांचे पुनर्वसन होण्यासाठी तातडीने हालचाली करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सातारा, सांगली आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जागेचा शोध सुरू झाला. सातारा आणि रत्नागिरीमध्ये वनक्षेत्र असल्याने तेथे या गावांचे पुनर्वसन होणे तांत्रिकदृष्ट्या वेळ खाणारे ठरू शकते.सांगली जिल्ह्यातील चांदोली अभयारण्यातील गाभा क्षेत्रात पाथरपुंज, मळे आणि कोळणे ही तीन गावं आहेत. येथील स्थानिकांच्या मागणीनुसार त्यांचे पुनर्वसन व्हावे, अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार पाथरपुंजसाठी सांगली जिल्ह्यातील काही गावांची पाहणीही झाली आहे. पुढच्या वर्षी ही गावं गाभा क्षेत्रातून पुनर्वसित गावात वसवली जातील, असे निर्धारित केले आहे.- डॉ. प्रवीणसिंह परदेशी,समन्यवयक, सांगली-कोल्हापूर पूरपुनर्वसन विशेष समिती