शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

पाथरपुंजसह अन्य दोन गावं लवकरच सांगली जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:19 IST

सातारा : देशात सर्वाधिक पावसाची नोंद झालेले सातारा जिल्ह्यातील पाथरपुंजसह मळे आणि कोळणे ही गावं लवकरच सांगली जिल्ह्यात पुनर्वसित ...

सातारा : देशात सर्वाधिक पावसाची नोंद झालेले सातारा जिल्ह्यातील पाथरपुंजसह मळे आणि कोळणे ही गावं लवकरच सांगली जिल्ह्यात पुनर्वसित होणार असल्याची माहिती आहे. सातारा जिल्ह्यात गावठाण जागा उपलब्ध होत नसल्याने सांगली जिल्ह्यातील जागेची पाहणी केल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली आहे.याबाबत माहिती अशी, कोयनानगरच्या नैऋत्येला असलेले पाथरपुंज हे गाव सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमारेषेवर आहे. पाथरपुंजसह मळे आणि कोळणे या तिन्ही गावांमध्ये मिळून ३५० कुटुंबांचे वास्तव्य आहे. यंदा जून ते आॅगस्टदरम्यान ७ हजार ३५९ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे येथील बहुतांश घरं कोसळली तर काही घरं पडण्याच्या स्थितीत अद्यापही तग धरून आहेत. महापुराचा आढावा घेण्यासाठी मुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीणसिंह परदेशी यांची सांगली-कोल्हापूर पूरपुनर्वसन विशेष समिती समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पाथरपुंज, मळे आणि कोळणे ही तिन्ही गावं चांदोलीच्या गाभा क्षेत्रात वसलेली आहेत. पूरपरिस्थिीतीत या गावांना भेटी दिल्यानंतर परदेशी यांनी या गावांचे पुनर्वसन होण्यासाठी तातडीने हालचाली करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सातारा, सांगली आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जागेचा शोध सुरू झाला. सातारा आणि रत्नागिरीमध्ये वनक्षेत्र असल्याने तेथे या गावांचे पुनर्वसन होणे तांत्रिकदृष्ट्या वेळ खाणारे ठरू शकते.सांगली जिल्ह्यातील चांदोली अभयारण्यातील गाभा क्षेत्रात पाथरपुंज, मळे आणि कोळणे ही तीन गावं आहेत. येथील स्थानिकांच्या मागणीनुसार त्यांचे पुनर्वसन व्हावे, अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार पाथरपुंजसाठी सांगली जिल्ह्यातील काही गावांची पाहणीही झाली आहे. पुढच्या वर्षी ही गावं गाभा क्षेत्रातून पुनर्वसित गावात वसवली जातील, असे निर्धारित केले आहे.- डॉ. प्रवीणसिंह परदेशी,समन्यवयक, सांगली-कोल्हापूर पूरपुनर्वसन विशेष समिती