शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आणखी दोन लाल दिवे ! राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली

By नितीन काळेल | Updated: June 18, 2024 21:23 IST

राष्ट्रवादीतून मकरंद पाटील, भाजपमधून शिवेंद्रसिंहराजेचे नाव चर्चेत

नितीन काळेल, सातारा : राज्यमंत्रीमंडळ विस्ताराबाबत हालचाली सुरू असून, पाठीमागे स्वत:हून दूर राहिलेल्या आमदार मकरंद पाटील यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते, तर भाजपमधूनही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. सध्या जिल्ह्यात एक मंत्रिपद असले, तरी आणखी दोन मंत्र्यांची भर पडू शकते, असे सध्याचे तरी चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यातच ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांची नाराजी दूर करणे आणि महायुतीची ताकद वाढविण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच पुढील आठवड्यात राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वीच मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकतो. यासाठी महायुतीतील तिन्ही वरिष्ठ नेत्यांत याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात विस्तार होऊ शकतो. भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही अनेकजण इच्छुक आहेत. अनेकांनी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे.

सातारा जिल्ह्यालाही या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळू शकते. राष्ट्रवादीकडून वाईचे आमदार मकरंद पाटील हे दावेदार आहेत. एक वर्षापूर्वी अजित पवार महायुतीबरोबर गेल्यावर ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदासाठीचे १० वे नाव हे मकरंद पाटील यांचे होते. पण, त्यावेळी ते स्वत:हून बाजूला राहिले. या विस्तारातही ते दावेदार आहेत. अजित पवार कोणाला ताकद देणार हे लवकरच स्पष्ट होईल, तर भाजपमधून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे दावेदार आहेत. आमदार गोरे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. भाजपमधून दोघांची नावे आघाडीवर असली, तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाला झुकते माप देणार याकडे लक्ष असणार आहे. त्यातच जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी साताऱ्याला आणखी एक मंत्रिपद देऊन पक्षाची ताकद आणखी वाढविण्याचा भाजपचा विचार असणार आहे, तर शिंदेसेनेकडून शंभूराज देसाई मंत्री आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून कोणाला मंत्रिपद मिळणार नाही हे स्पष्ट आहे.

नवीन मंत्र्यांना तीन महिने मिळणार...

राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाला, तर तो अधिवेशनापूर्वीच होऊ शकतो. तसे झाले, तर नवीन मंत्र्यांना फक्त तीन महिनेच कालावधी मिळू शकतो. कारण, ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही निवडणूक आचारसंहिता लागू शकते, तर अधिवेशनानंतर मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता धूसर आहे.

खासदारकी की मंत्रिपद...लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाई येथे सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी आमदार मकरंद पाटील यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी कसे विनवले होते हे स्पष्ट केलेले, तसेच अजितदादांनी त्यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना राज्यसभेवर खासदार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे मकरंद पाटील यांना मंत्रिपद दिले, तर नितीन पाटील यांना सध्यातरी खासदारकीपासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :satara-pcसातारा