शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

दोन मिनिटांचे अंतर.. २५ किलोमीटरचा प्रवास

By admin | Updated: September 26, 2016 00:08 IST

वडूथ-आरळे पूल : ग्रामस्थांना करावी लागते पायपीट; वेळेसह आर्थिक नुकसान; वाहनधारकांना प्रतीक्षा काम पूर्ण होण्याची

शिवथर : वडूथ-आरळे येथील कृष्णा नदीवरील पुलाला भगदाड पडल्याने वडूथ गावाचा आरळे गावाबरोबर संपर्क तुटला आहे. गाव दिसतंय; पण चारचाकी घेऊन जाता येईना. अगदी आरळे आणि वडूथ गावाच्या मध्यातून कृष्णानदी वाहत आहे. चारचाकी घेऊन जायचं म्हटलं तर अवघ्या दोनच मिनिटांमध्ये जाता येत होतं; परंतु कृष्णा नदीवरील पुलाला भगदाड पडल्याने दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या गावात अत्यावश्यक असेल तर कमीत कमी पंचवीस किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय. यामुळे वाहनचालक आणि ग्रामस्थ पुलाकडे टक लावून बसले आहेत. पुलाचे काम चालू कधी होणार आणि संपणार कधी, असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. वडूथ- आरळे येथील कृष्णा नदीवरील पुलावरून शाळेसाठी मुलं बसाप्पाचीवाडी, पाटखळ माथा, वाढे येथून येत असतात; परंतु या मुलांना वडूथच्या अलीकडे एक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. या पुलावरून वाहन जात नसल्याने मोठी चालण्याची कसरत करावी लागत आहे. गाव दिसतंय; पण चारचाकी घेऊन जाता येईना. नदीच्या अलीकडून पलीकडे फक्त बघायची भूमिका चारचाकी वाहनचालक करत आहेत. जायचं म्हटलं तर पंचवीस किलोमीटरचे अंतर म्हणजे सातारापर्यंत येथून माहुली, सोनगाव, बोखरळ, वडूथ असा प्रवास चारचाकी वाहनाकरिता करावा लागत आहे. साताऱ्याकडे जाण्यासाठी फलटणवरून येणाऱ्या वाहनांची फसगत होत आहे. वडूथ येथे गाडी आल्यावर वाहनचालकांना अवघा वडूथपासून सातारा आठ किलोमीटर आहे. परंतु त्यासाठी देखील पंचवीस किलोमीटरचे अंतर तोडावे लागत आहे. आठ दिवसांमध्येच वाहनचालक व ग्रामस्थ या पडलेल्या पुलाला वैतागले आहेत. कृष्णानदीवर पडलेल्या भगदाडामुळे वाहनचालक व ग्रामस्थांमधून बोललं जातंय की, आम्ही काही दिवस त्रास सहन करू; परंतु कामच चालू नाही तर संपणार कधी, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर) काम चांगल्या प्रकारे व्हावे पुलाला भगदाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पुलाचे काम सुरू आहे. आमचा जीव आम्हाला प्यारा आहे. पुलाचं काम चांगल्या स्वरुपाचं व्हावं आता आम्ही त्रास सहन करत आहे. परंतु या पुलाचं काम त्वरित मार्गी लागावं, अशी आमची भूमिका आहे. - राहुल कदम, वडाप व्यावसायिक, आरळे