शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

दोन मिनिटांचे अंतर.. २५ किलोमीटरचा प्रवास

By admin | Updated: September 26, 2016 00:08 IST

वडूथ-आरळे पूल : ग्रामस्थांना करावी लागते पायपीट; वेळेसह आर्थिक नुकसान; वाहनधारकांना प्रतीक्षा काम पूर्ण होण्याची

शिवथर : वडूथ-आरळे येथील कृष्णा नदीवरील पुलाला भगदाड पडल्याने वडूथ गावाचा आरळे गावाबरोबर संपर्क तुटला आहे. गाव दिसतंय; पण चारचाकी घेऊन जाता येईना. अगदी आरळे आणि वडूथ गावाच्या मध्यातून कृष्णानदी वाहत आहे. चारचाकी घेऊन जायचं म्हटलं तर अवघ्या दोनच मिनिटांमध्ये जाता येत होतं; परंतु कृष्णा नदीवरील पुलाला भगदाड पडल्याने दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या गावात अत्यावश्यक असेल तर कमीत कमी पंचवीस किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय. यामुळे वाहनचालक आणि ग्रामस्थ पुलाकडे टक लावून बसले आहेत. पुलाचे काम चालू कधी होणार आणि संपणार कधी, असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. वडूथ- आरळे येथील कृष्णा नदीवरील पुलावरून शाळेसाठी मुलं बसाप्पाचीवाडी, पाटखळ माथा, वाढे येथून येत असतात; परंतु या मुलांना वडूथच्या अलीकडे एक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. या पुलावरून वाहन जात नसल्याने मोठी चालण्याची कसरत करावी लागत आहे. गाव दिसतंय; पण चारचाकी घेऊन जाता येईना. नदीच्या अलीकडून पलीकडे फक्त बघायची भूमिका चारचाकी वाहनचालक करत आहेत. जायचं म्हटलं तर पंचवीस किलोमीटरचे अंतर म्हणजे सातारापर्यंत येथून माहुली, सोनगाव, बोखरळ, वडूथ असा प्रवास चारचाकी वाहनाकरिता करावा लागत आहे. साताऱ्याकडे जाण्यासाठी फलटणवरून येणाऱ्या वाहनांची फसगत होत आहे. वडूथ येथे गाडी आल्यावर वाहनचालकांना अवघा वडूथपासून सातारा आठ किलोमीटर आहे. परंतु त्यासाठी देखील पंचवीस किलोमीटरचे अंतर तोडावे लागत आहे. आठ दिवसांमध्येच वाहनचालक व ग्रामस्थ या पडलेल्या पुलाला वैतागले आहेत. कृष्णानदीवर पडलेल्या भगदाडामुळे वाहनचालक व ग्रामस्थांमधून बोललं जातंय की, आम्ही काही दिवस त्रास सहन करू; परंतु कामच चालू नाही तर संपणार कधी, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर) काम चांगल्या प्रकारे व्हावे पुलाला भगदाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पुलाचे काम सुरू आहे. आमचा जीव आम्हाला प्यारा आहे. पुलाचं काम चांगल्या स्वरुपाचं व्हावं आता आम्ही त्रास सहन करत आहे. परंतु या पुलाचं काम त्वरित मार्गी लागावं, अशी आमची भूमिका आहे. - राहुल कदम, वडाप व्यावसायिक, आरळे