शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

धार्मिक संस्थानांकडून जिल्ह्याला दोन कोटी!

By admin | Updated: April 15, 2015 00:19 IST

विजय शिवतारे : जलयुक्त अभियानासाठी ‘कार्पोरेट’ सहभाग घेणार

सातारा : ‘जलयुक्त शिवार अभियानासाठी कार्पोरेट कंपन्यांचा सहभाग घेतला जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण, खंडाळा याठिकाणी मोठे उद्योग उभारले गेले आहेत. एका चांगल्या कामासाठी उद्योगांची सामाजिक जबाबदारी या हेतूने कंपन्यांकडून निधी उभा केला जाईल,’ अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. तसेच ‘जलयुक्त शिवार’ च्या कामासाठी सिध्दीविनायक ट्रस्ट व साई संस्थानने एकूण प्रत्येकी एक कोटी रुपये सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला दिले आहे,’ असेही त्यांनी सांगितले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयो व जलयुक्त शिवार अभियानाची जनजागृती करण्यासाठी जलदिंडी या फिरत्या वाहनांचा प्रारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी झाला. त्यावेळी नियोजन भवनात घेतलेल्या बैठकीत पालकमंत्री बोलत होते. आमदार शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी पराग सोमण, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, अधीक्षक अभियंता विजय घोगरे, प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने आदी उपस्थित होते. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पालकमंत्री शिवतारे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. पालकमंत्री पुढे म्हणाले, ‘राज्यातील दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. सातारा जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमधून ३७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये नवीन बंधारे बांधण्यासाठी २१ कोटींची तर उर्वरित तरतूद दुरुस्तीसाठी करण्यात आली आहे. या अभियानाला नरेगाची सांगड घालावी. हे अभियान शासकीय कार्यक्रम न राहता चळवळ म्हणून उभी राहावी. या चळवळीतूनच टँकरमुक्त महाराष्ट्र हे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यासाठी संवेदनशील पध्दतीने काम करावे. शासकीय अधिकारी ‘चार्ज’ झाले आहेत. आता नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. पराग सोमन यांनी सुरुवातीला सर्वांचे स्वागत करुन नरेगाबाबत सादरीकरण केले. याप्रसंगी पाटण प्रांताधिकारी संजीव जाधव, कऱ्हाड प्रांताधिकारी किशोर पवार, वाई प्रांताधिकारी जगदीश खेबुडकर, वाई गटविकास अधिकारी दीपा बापट, तहसीलदार राजेश चव्हाण, वाई तहसीलदार सदाशिव पडदुणे, खंडाळा गटविकास अधिकारी विलास साबळे आदींसह विविध विभागातील कार्यकर्ते कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)