शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

सातारा जिल्ह्यात दोन ‘केबल स्टे ब्रिज’ उभारण्यात येणार, पर्यटन वाढीस चालना मिळणार

By सचिन काकडे | Updated: August 10, 2023 18:10 IST

२५ किलोमीटर अंतराचा प्रवासही वाचणार

सातारा : बामणोली, तापोळा भागात पर्यटन वाढीसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या बामणोली-दरे आणि आपटी-तापोळादरम्यान सी लिंक पद्धतीचे दोन ‘केबल स्टे ब्रिज’ उभारण्यात येत आहेत. या पुलामुळे आपटी, वाकी, तेटली, बामणोली आदी गावांना फायदा होणार असून, २५ किलोमीटर अंतराचा प्रवासही वाचणार आहे, अशी माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.सातारा येथे गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जावळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. एस. पवार, शाखा अभियंता नीलेश कोहाळे, महेश कुन्हाळीकर, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्यासह बामणोली भागातील ग्रामस्थ उपस्थित होते.शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘बामणोली ते दरे असा ७२० मीटरचा ‘केबल स्टे ब्रिज’ होणार असून बामणोली बाजूला १५० मीटर तर दरे बाजूला ४५० मीटर पोहोच मार्ग होणार आहेत. याचा लाभ आसपासच्या सर्वच गावांना होणार आहे. तर १५० कोटी निधीतून आपटी ते तापोळा असा ५६० मीटरचा केबल स्टे ब्रिज उभा राहणार आहे. आपटी बाजूस २०० मीटर तर तापोळा बाजूस ३०० मीटर पोहोच रस्ते प्रस्तावित आहेत. हा पूल झाल्यानंतर आपटी, वाकी, तेटली, बामणोली आदी गावांना फायदा होणार असून, २५ किलोमीटर अंतराचा प्रवास वाचणार आहे. या दोन्ही पुलांच्या उभारणीमुळे या भागातील पर्यटन वाढीस चालना मिळेल, या भागातील रोजगार आणि व्यापार वृद्धी होईल. पर्यटकांनाही बामणोलीतून थेट कोकणात उतरता येणार आहे. महाबळेश्वर ते बामणोली असाही प्रवास कमी वेळेत करता येणार असल्याने या दोन्ही पुलांचा फायदा स्थानिकांसह पर्यटकांना होईल, असा विश्वास आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtourismपर्यटनShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले