शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

सातारा जिल्ह्यातील अडीच हजार कृषी दुकाने बंद; ७० कोटींची खरेदी-विक्री थांबली

By नितीन काळेल | Updated: November 4, 2023 19:11 IST

पेरणीतच शेतकऱ्यांना त्रास 

सातारा : खते, बियाणे आणि कीटकनाशके विक्रेत्यांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी शासनाकडून नवीन कायदे आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कायद्यातील तरतुदीविरोधात तसेच फेरविचार करण्यासाठी राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी तीन दिवसांचा बंद केला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील अडीच हजार दुकाने बंद असल्याने पेरणीतच शेतकऱ्यांना त्रास झाला. तर ७० ते ८० कोटींची खरेदी-विक्रीही थांबली.जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामाची पेरणी सुरू झाली आहे. जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवर क्षेत्र असून शेतकरी खते आणि बियाणे खरेदी करु लागले आहेत. यामध्येच कृषी निविष्ठा दुकानदारांनी तीन दिवसांचा बंद केला. शनिवारी याला तीन दिवस झाले. तर कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी राज्य शासनाने नवीन काही कायदे प्रस्तावित केले आहेत. हे कायदे जाचक असल्याचे सांगून त्याला विरोध केलेला आहे. यामध्ये कृषी दुकानदार हे निविष्ठांचे उत्पादन करत नाहीत. कृषी विभागाच्या मान्यतेनेच सीलबंद निविष्ठा खरेदी करुन ती शेतकऱ्यांनी विकली जाते.त्यामुळे पॅकिंगमधील निविष्ठांच्या दर्जाबाबत कृषी विक्रेत्यांना दोषी समजण्यात येऊ नये असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर नवीन जाचक कायदे हे विक्रेत्यांवर लादू नयेत, प्रस्तावित कायद्याचा फेरविचारही करावा, अशी मागणीही या विक्रेत्यांची आहे. यासाठी राज्य संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांकडे कायदे रद्द करण्याची मागणीही केली आहे. यासाठी राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी तीन दिवसांचा बंद केला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील विक्रेते सहभागी झाले आहेत.

जिल्ह्यात आज सुमारे अडीच हजार कृषी निविष्ठा विक्रीधारक आहेत. गुरुवारपासून त्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. यामुळे याचा शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. कारण, सध्या रब्बी हंगामाची पेरणी सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांना खते आणि बियाणे लागत आहेत. एेन पेरणी हंगामाच्या सुरुवातीलच कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी दुकाने बंद केल्याने शेतकऱ्यांना खरेदीच करता येत नाही. यामुळे पेरणीवर परिणाम झालेला आहे. तसेच फळबागांवर फवारणीसाठीही रासायनिक आैषधे मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची तडफड वाढली आहे. त्यातच तीन दिवसांच्या बंदनंतर रविवारपासून दुकाने सुरू होण्याचे संकेत आहे. याबाबत शनिवारी रात्री उशिरा राज्य संघटनेची बैठक होणार आहे. त्यामध्ये दुकाने उघडायची की नाही हे ठरणार आहे.जिल्ह्यातील कृषी निविष्ठा दुकाने तीन दिवस बंद असल्याने जवळपास ७० ते ८० कोटी रुपयांची खते, आैषधे आणि बियाणे खरेदी-विक्री थांबल्याचे सांगण्यात येत आहे. यातून शासनाला जाणारा जीएसटीही थांबला आहे. तर हा बंद वाढला तर शेतकऱ्यांना फटका अधिक बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAgriculture Sectorशेती क्षेत्र