शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वीस वर्षांचा वनवास दहा दिवसांत संपला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:26 IST

मायणी : मिरज-भिगवण केंद्रीय मार्गातील खटाव-माण तालुक्यांना जोडणाऱ्या मायणी-दहिवडी या सुमारे खटाव तालुक्यातील २५ किलोमीटरचा मार्ग अतिशय खराब झाला ...

मायणी : मिरज-भिगवण केंद्रीय मार्गातील खटाव-माण तालुक्यांना जोडणाऱ्या मायणी-दहिवडी या सुमारे खटाव तालुक्यातील २५ किलोमीटरचा मार्ग अतिशय खराब झाला होता. या मार्गातील १३ किलोमीटर अंतराची दुरुस्ती अवघ्या दहा दिवसांत पूर्ण झाल्याने वीस वर्षांचा वनवास दहा दिवसांत संपला असून, उर्वरित बारा किलोमीटरचा मार्ग लवकर पूर्ण करावा, अशी मागणी वाहनचालक व स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.

सातारा, सांगली, पुणे व अहमदनगर जिल्ह्यांतून उत्तर व दक्षिण भारतात जाणारा प्रमुख मार्ग म्हणून केंद्राने गेल्या तीन वर्षांपूर्वी स्वतःकडे हा मार्ग वर्ग करून घेतला. तत्पूर्वी मिरज-भिगवण हा मार्ग राज्यमार्ग क्रमांक दहा असा होत. या राज्यमार्गावर सांगली जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक वर्षी दुरुस्तीसाठी मोठा निधी उपलब्ध होत होता. त्यामुळे या भागामध्ये या रस्त्याचा दर्जा अतिशय चांगला होता.

मात्र सातारा जिल्ह्यातील खटाव, माण व फलटण तालुक्यांना जोडणाऱ्या या मार्गावर वीस वर्षांपासून फक्त खाद्य भरण्याचे काम केले जात होते. खड्डे भरण्यासाठी प्रत्येक वर्षी लाखो रुपये खर्च करून रस्ता दुरुस्त केला, असा कांगावा संबंधित विभाग करत होते. मात्र खड्डे भरल्यानंतर पुन्हा दहा ते पंधरा दिवसांत हे खड्डे स्वतःचे अस्तित्व दाखवण्यास सुरुवात करत होते.

गत तीन वर्षांपासून जिल्ह्यातील संबंधित विभाग हा मार्ग केंद्राकडे वर्ग केला आहे. त्यामुळे आम्हाला निधी टाका येत नाही, असे सांगून हात वर करत होते. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांना मोठी कसरत करावी लागत होती. रस्त्यावर एक फुटापेक्षा अधिक खोलीचे खड्डे पडल्याने आर्थिक व शारीरिक नुकसान होते.

गत महिन्यात २२ जूनपासून खटाव तालुक्यातील सुमारे २५ किलोमीटर अंतराचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या २५ किलोमीटरमधील खटाव तालुक्याची हद्द ते तडवळे, बोंबाळे, कातरखटाव, बनपुरीपर्यंतचा सुमारे १३ किलोमीटरचा मार्ग संबंधित विभागाने अवघ्या दहा दिवसांत पूर्ण केला. त्यामुळे या मार्गाचा वीस वर्षांचा वनवास अवघ्या दहा दिवसांत संपला.

(चौकट)

मायणी ते सांगली जिल्हा हद्दीपर्यंत रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत..

याच मार्गावरील सूर्याचीवाडी, धोंडेवाडी, मायणी ते सांगली जिल्हा हद्दीपर्यंत म्हणजे उर्वरित सुमारे १२ किलोमीटरच्या मार्ग आजही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे असल्याने या अंतरामध्ये सतत लहान-मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे हा मार्ग लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी वाहनचालक व स्थानिक ग्रामस्थ करत आहे.

०७मायणी

मिरज-भिगवण मार्गावरील सातारा-सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सतत अपघात होत आहेत. (छाया : संदीप कुंभार)