शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

वीस वर्षांचा वनवास दहा दिवसांत संपला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:26 IST

मायणी : मिरज-भिगवण केंद्रीय मार्गातील खटाव-माण तालुक्यांना जोडणाऱ्या मायणी-दहिवडी या सुमारे खटाव तालुक्यातील २५ किलोमीटरचा मार्ग अतिशय खराब झाला ...

मायणी : मिरज-भिगवण केंद्रीय मार्गातील खटाव-माण तालुक्यांना जोडणाऱ्या मायणी-दहिवडी या सुमारे खटाव तालुक्यातील २५ किलोमीटरचा मार्ग अतिशय खराब झाला होता. या मार्गातील १३ किलोमीटर अंतराची दुरुस्ती अवघ्या दहा दिवसांत पूर्ण झाल्याने वीस वर्षांचा वनवास दहा दिवसांत संपला असून, उर्वरित बारा किलोमीटरचा मार्ग लवकर पूर्ण करावा, अशी मागणी वाहनचालक व स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.

सातारा, सांगली, पुणे व अहमदनगर जिल्ह्यांतून उत्तर व दक्षिण भारतात जाणारा प्रमुख मार्ग म्हणून केंद्राने गेल्या तीन वर्षांपूर्वी स्वतःकडे हा मार्ग वर्ग करून घेतला. तत्पूर्वी मिरज-भिगवण हा मार्ग राज्यमार्ग क्रमांक दहा असा होत. या राज्यमार्गावर सांगली जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक वर्षी दुरुस्तीसाठी मोठा निधी उपलब्ध होत होता. त्यामुळे या भागामध्ये या रस्त्याचा दर्जा अतिशय चांगला होता.

मात्र सातारा जिल्ह्यातील खटाव, माण व फलटण तालुक्यांना जोडणाऱ्या या मार्गावर वीस वर्षांपासून फक्त खाद्य भरण्याचे काम केले जात होते. खड्डे भरण्यासाठी प्रत्येक वर्षी लाखो रुपये खर्च करून रस्ता दुरुस्त केला, असा कांगावा संबंधित विभाग करत होते. मात्र खड्डे भरल्यानंतर पुन्हा दहा ते पंधरा दिवसांत हे खड्डे स्वतःचे अस्तित्व दाखवण्यास सुरुवात करत होते.

गत तीन वर्षांपासून जिल्ह्यातील संबंधित विभाग हा मार्ग केंद्राकडे वर्ग केला आहे. त्यामुळे आम्हाला निधी टाका येत नाही, असे सांगून हात वर करत होते. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांना मोठी कसरत करावी लागत होती. रस्त्यावर एक फुटापेक्षा अधिक खोलीचे खड्डे पडल्याने आर्थिक व शारीरिक नुकसान होते.

गत महिन्यात २२ जूनपासून खटाव तालुक्यातील सुमारे २५ किलोमीटर अंतराचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या २५ किलोमीटरमधील खटाव तालुक्याची हद्द ते तडवळे, बोंबाळे, कातरखटाव, बनपुरीपर्यंतचा सुमारे १३ किलोमीटरचा मार्ग संबंधित विभागाने अवघ्या दहा दिवसांत पूर्ण केला. त्यामुळे या मार्गाचा वीस वर्षांचा वनवास अवघ्या दहा दिवसांत संपला.

(चौकट)

मायणी ते सांगली जिल्हा हद्दीपर्यंत रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत..

याच मार्गावरील सूर्याचीवाडी, धोंडेवाडी, मायणी ते सांगली जिल्हा हद्दीपर्यंत म्हणजे उर्वरित सुमारे १२ किलोमीटरच्या मार्ग आजही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे असल्याने या अंतरामध्ये सतत लहान-मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे हा मार्ग लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी वाहनचालक व स्थानिक ग्रामस्थ करत आहे.

०७मायणी

मिरज-भिगवण मार्गावरील सातारा-सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सतत अपघात होत आहेत. (छाया : संदीप कुंभार)