शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५२ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

माणमधील तब्बल सत्तावीस गावे प्रतिबंधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:40 IST

दहिवडी : माण तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. यासोबतच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे प्रशासनाने दहिवडी, म्हसवड, ...

दहिवडी : माण तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. यासोबतच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे प्रशासनाने दहिवडी, म्हसवड, बिदाल, मार्डी, मलवडी, कुकुडवाड, गोंदवले बुद्रुक, शिंगणापूरसह तब्बल सत्तावीस गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. कोरोनाबाधितांच्या विस्फोटामुळे प्रशासन सतर्क झाले असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना राबविणार असल्याचे निर्देश प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत काहीसा सुरक्षित राहिलेला माण तालुका कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वाढत्या प्रादुर्भावाने हादरला आहे. अनेक गावे कोरोनाचा हॉट स्पॉट बनली आहेत. दहिवडी, म्हसवड या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. बाधितांच्या संख्येसोबतच मृतांची संख्याही वाढू लागली आहे. या परिस्थितीमुळे प्रशासनावर कमालीचा ताण आला असून, सर्वांनाच चिंतेने ग्रासले आहे.

त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी माणचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी तालुक्यातील दहिवडी, म्हसवड, बिदाल, शिंगणापूर, मार्डी, मलवडी, कुकुडवाड, गोंदवले बुद्रुक, आंधळी, शिरवली, पांगरी, भालवडी, राणंद, वावरहिरे, सोकासन, मोही, खुटबाव, दिवड, वरकुटे म्हसवड, हिंगणी, लोधवडे, गोंदवले खुर्द, नरवणे, पळशी, वरकुटे मलवडी, बनगरवाडी व वळई ही सत्तावीस गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. याबाबतचे आदेश संबंधित कोरोना नियंत्रण समितीला देण्यात आले आहेत.

प्रतिबंधित क्षेत्रातील गावांमध्ये दवाखाने व मेडिकल दुकाने वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित गावातील सर्व बँका तसेच पतसंस्थेचे आर्थिक व्यवहारही बंद ठेवण्यात आले असून, तहसीलदार व पोलीस प्रशासनाची परवानगी घेऊन नागरिकांना किराणा साहित्य, भाजीपाला, दूध यासारख्या जीवनावश्यक सुविधा घरपोच देण्याची कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना कोरोना समितीला देण्यात आल्या आहेत.

चौकट...

नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे...

प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर जाण्यास व गावात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून, आवश्यक ठिकाणी तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक कोरोना समितीने कडक उपाययोजना राबविण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.