शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

चोवीस तासांत दहा हजार कापडी पिशव्या मागणी वाढली : बचत गटांना मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:52 IST

राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातल्यापासून बचत गटांच्या महिलांसह लहान-मोठ्या व्यावसायिकांनी कागदी व कापडी पिशव्या तयार करण्याचे उद्योग वेगाने सुरूकेले आहेत.

ठळक मुद्देसांगली, कोल्हापूर अन् कोकणातही निर्यात

प्रशांत कोळी ।सातारा : राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातल्यापासून बचत गटांच्या महिलांसह लहान-मोठ्या व्यावसायिकांनी कागदी व कापडी पिशव्या तयार करण्याचे उद्योग वेगाने सुरूकेले आहेत. दिवसाला तब्बल दहा हजार कापडी पिशव्यांची निर्मिती होत आहे. सातारा जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर अन् कोकणातूनही या पिशव्यांना मागणी वाढली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे व जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आरएसईटी प्रशिक्षण केंद्र आणि आयडीबीआयतर्फे कागदी व कापडी पिशव्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. आता नव्या विचारांनी आणि नव्या पद्धतीने स्वत:चे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी या महिला कापडी पिशव्यांचे विक्रमी उत्पादन करत आहेत. सध्या जिल्ह्यात बचतगटांच्या माध्यमातून तयार होणाऱ्या पिशव्यांच्या किमती आठ रुपयांपासून ते ११० रुपयांपर्यंत आहेत. सातारा शहरासह इतर शहरांमध्येही या पिशव्यांना मागणी वाढली आहे. मागणीनुसार वेगवेगळ्या आकाराच्या आणि नक्षीकाम केलेल्या पिशव्या बचत गट तयार करून देत आहेत.

जिल्ह्यातील सैदापूर, साप, क्षेत्र माहुली, सोनगाव, खेड, लोणंद, म्हसवड, जकातवाडी, करंडी, वडूज, पुसेगाव, खटाव, कातरखटाव, क्षेत्र महाबळेश्वर, मारुल हवेली, पाटण, लिंब गोवे आदी ठिकाणी कागदी व कापडी पिशव्यांची निर्मिती केली जात आहे. एका ठिकाणांहून दररोज पाचशे ते हजार पिशव्या तयार केल्या जात आहे. सांगलीसह मिरज, कोल्हापूर, चिपळूण, इचलकरंजी आदी ठिकाणांहून या पिशव्यांना मोठी मागणी आहे. प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर बचत गटांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.महाबळेश्वरला दिवसाला दोन हजार मागणीमहाराष्ट्राचे नंदनवन म्हणून समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची संंख्या वाढत आहे. दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी भेटी देत असतात. या ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणल्यापासून महाबळेश्वरमध्ये दररोज दोन हजार कागदी व कापडी पिशव्यांची मागणी होत आहे. यापुढेही संख्याही वाढण्याची शक्यता आहे.गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही कापडी व कागदी पिशव्या बनविण्याचे काम करीत आहोत. प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर या उद्योगाला खºया अर्थाने गती मिळाली आहे. सध्या या पिशव्यांना प्रचंड मागणी असून, महिलांसाठी हा रोजगार उत्तम पर्याय ठरणार आहे.    - विद्या भोसले, सातारामहिलांनी पातळ साड्या, कॅनव्हॉस आणि मांजरपाट आदी कपड्यापासून पिशव्या तयार करण्यावर भर दिला आहे.या कापडी पिशव्यातही वेगळेपण जपणाºया खादी पिशव्याही या बचत गटाच्या महिला तयार करत आहेत.पांढºया शुभ्र खादीच्या पिशव्याही तयार केल्या जात आहेत. सर्वसामान्य पिशव्यांपेक्षा थोडीसी महाग असणारी ही पिशवी पाहताक्षणी पसंत पडते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbusinessव्यवसाय