शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

चोवीस तासांत दहा हजार कापडी पिशव्या मागणी वाढली : बचत गटांना मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:52 IST

राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातल्यापासून बचत गटांच्या महिलांसह लहान-मोठ्या व्यावसायिकांनी कागदी व कापडी पिशव्या तयार करण्याचे उद्योग वेगाने सुरूकेले आहेत.

ठळक मुद्देसांगली, कोल्हापूर अन् कोकणातही निर्यात

प्रशांत कोळी ।सातारा : राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातल्यापासून बचत गटांच्या महिलांसह लहान-मोठ्या व्यावसायिकांनी कागदी व कापडी पिशव्या तयार करण्याचे उद्योग वेगाने सुरूकेले आहेत. दिवसाला तब्बल दहा हजार कापडी पिशव्यांची निर्मिती होत आहे. सातारा जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर अन् कोकणातूनही या पिशव्यांना मागणी वाढली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे व जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आरएसईटी प्रशिक्षण केंद्र आणि आयडीबीआयतर्फे कागदी व कापडी पिशव्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. आता नव्या विचारांनी आणि नव्या पद्धतीने स्वत:चे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी या महिला कापडी पिशव्यांचे विक्रमी उत्पादन करत आहेत. सध्या जिल्ह्यात बचतगटांच्या माध्यमातून तयार होणाऱ्या पिशव्यांच्या किमती आठ रुपयांपासून ते ११० रुपयांपर्यंत आहेत. सातारा शहरासह इतर शहरांमध्येही या पिशव्यांना मागणी वाढली आहे. मागणीनुसार वेगवेगळ्या आकाराच्या आणि नक्षीकाम केलेल्या पिशव्या बचत गट तयार करून देत आहेत.

जिल्ह्यातील सैदापूर, साप, क्षेत्र माहुली, सोनगाव, खेड, लोणंद, म्हसवड, जकातवाडी, करंडी, वडूज, पुसेगाव, खटाव, कातरखटाव, क्षेत्र महाबळेश्वर, मारुल हवेली, पाटण, लिंब गोवे आदी ठिकाणी कागदी व कापडी पिशव्यांची निर्मिती केली जात आहे. एका ठिकाणांहून दररोज पाचशे ते हजार पिशव्या तयार केल्या जात आहे. सांगलीसह मिरज, कोल्हापूर, चिपळूण, इचलकरंजी आदी ठिकाणांहून या पिशव्यांना मोठी मागणी आहे. प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर बचत गटांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.महाबळेश्वरला दिवसाला दोन हजार मागणीमहाराष्ट्राचे नंदनवन म्हणून समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची संंख्या वाढत आहे. दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी भेटी देत असतात. या ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणल्यापासून महाबळेश्वरमध्ये दररोज दोन हजार कागदी व कापडी पिशव्यांची मागणी होत आहे. यापुढेही संख्याही वाढण्याची शक्यता आहे.गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही कापडी व कागदी पिशव्या बनविण्याचे काम करीत आहोत. प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर या उद्योगाला खºया अर्थाने गती मिळाली आहे. सध्या या पिशव्यांना प्रचंड मागणी असून, महिलांसाठी हा रोजगार उत्तम पर्याय ठरणार आहे.    - विद्या भोसले, सातारामहिलांनी पातळ साड्या, कॅनव्हॉस आणि मांजरपाट आदी कपड्यापासून पिशव्या तयार करण्यावर भर दिला आहे.या कापडी पिशव्यातही वेगळेपण जपणाºया खादी पिशव्याही या बचत गटाच्या महिला तयार करत आहेत.पांढºया शुभ्र खादीच्या पिशव्याही तयार केल्या जात आहेत. सर्वसामान्य पिशव्यांपेक्षा थोडीसी महाग असणारी ही पिशवी पाहताक्षणी पसंत पडते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbusinessव्यवसाय