शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

भाषा-संस्कृती जपण्याचे प्रयत्न व्हावेत

By admin | Updated: October 12, 2015 00:36 IST

एल. हनुमंतप्पा : जत येथे कन्नड-मराठी भावैक्य संमेलनास प्रतिसाद

जत : मुंबईप्रमाणे देशातील इतर मोठ्या महानगरांत देशाच्या विविध भागातून व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्ताने अनेक लोक येऊन वास्तव्य करीत आहेत. त्यांची भाषा व संस्कृती वेगळी आहे. ती जपण्यासाठी तेथील शासनाने पुढाकार घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असे मत कर्नाटक राज्याचे कन्नड अभिवृद्धी प्राधिकार समितीचे अध्यक्ष डॉ. एल. हनुमंतप्पा यांनी व्यक्त केले. या समितीच्यावतीने जत येथे कन्नड-मराठी भाषा भावैक्य संमेलन आयोजित केले होते. त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषेवर आधारित प्रांतरचना झाली असली तरी, सध्या एकाच राज्यात चार-पाच भाषा बोलणारे व संस्कृती जपणारे लोक राहत आहेत. कोणती भाषा बोलावी, हे ज्यांनी त्यांनी ठरविणे आवश्यक आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, गडीनाडू भागातील कन्नड व मराठी बांधवांनी एकत्र सेतूप्रमाणे काम करावे व आपापली भाषा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. भाषा हे संवादाचे सर्वात उत्तम साधन आहे. धर्मावर प्रेम करण्यापेक्षा माणसावर प्रेम करा, त्यामुळे आपापसात दरी निर्माण होणार नाही. परस्परांमध्ये स्नेहाचे वातावरण निर्माण होण्यासाठी यापुढील काळात असेच एकत्रित कार्यक्रम आयोजित करून कन्नड व मराठी बांधवांत बंधुभाव निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.सीमाप्रश्नाचे कोणतेही पडसाद आजपर्यंत जत शहरात उमटलेले नाहीत. कन्नड व मराठी भाषिक लोक आम्ही येथे आनंदाने राहत असल्याची भावना आ. विलासराव जगताप यांनी व्यक्त केली.कार्यक्रमासाठी माजी आमदार उमाजी सनमडीकर, जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक विक्रम सावंत, अ‍ॅड. प्रभाकर जाधव, डॉ. रवींद्र आरळी, सी. आर. गोब्बी, सुरेश शिंदे, जतचे नगराध्यक्ष इकबाल गवंडी, ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशी, मकरंद देशपांडे, विष्णू नाईक, वैजनाथ महाजन, चंद्रशेखर ताळ्या, शरद जाधव यांच्यासह मान्यवर, साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रा. राजेंद्र माने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)अभिमान बाळगा : पण संघर्ष नकोप्रत्येकाला स्वत:च्या भाषेचा अभिमान असावा, परंतु दुसऱ्याच्या भाषेचा दुजाभाव करू नये. सीमाभागातील जनता आजवर गुण्यागोविंदाने राहत आली आहे. भाषा ही संवादाचे उत्तम माध्यम आहे. प्रत्येकाने आपल्या भाषेची अभिवृद्धी करण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येकाने सर्वच भाषांचा समन्वय साधून स्वत:चा शैक्षणिक विकास करून घ्यावा. कारण नसताना संघर्ष करू नये, अशी भावना यावेळी उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमस्थळी मराठी फलक नसल्याने नाराजी महाराष्ट्रात राहून कन्नड माध्यमातून शिक्षण घेऊन त्यामध्ये विशेष यश संपादन केलेल्या ३२५ विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भाव\ैक्य संमेलन म्हणून मराठी व कन्नड भाषिक साहित्यामध्ये संवादाचा सेतू समजल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली असली तरी, येथे एकही फलक मराठीत नव्हता. त्यामुळे उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.