शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

टेंभु योजनेच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे सोमवारी एल्गार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 18:49 IST

कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या माण व खटाव तालुक्यातील काही गावे कोणत्याही पाणी योजनेत समाविष्ट झाली नाहीत. शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकणाºया गावांनी सोमवारी दि. १० रोजी खटाव तालुक्यातील

ठळक मुद्देविखळे येथे एल्गार परिषदेचे आयोजन

म्हसवड : कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या माण व खटाव तालुक्यातील काही गावे कोणत्याही पाणी योजनेत समाविष्ट झाली नाहीत. शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकणाºया गावांनी सोमवारी दि. १० रोजी खटाव तालुक्यातील विखळे येथे एल्गार परिषदेचे आयोजन केल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की कायमस्वरूपी दुष्काळी असणाºया माण व खटाव तालुक्यासाठी १९९५ साली राज्यातील युतीच्या शासनाने कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना के ले. त्यामध्ये उरमोडी, जिहे कटापूर व तर टेंभू उपसा जलसिंचन योजनेचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये उरमोडी योजनेतून माण तालुक्यातील कुकुडवाड व खटाव तालुक्यातील पूर्वेकडे असणारी विखळे, कलेढोण, कणकत्रे, ढोकळवाडी, हिवरवाडी, तरसवाडी, औतरवाडी व माण तालुक्यातील कुकुडवाड, पुकलेवाडी, मानेवाडी, मस्करवाडी, आगासवादी, धनवडेवाडी, भाकरेवाडी, व विरळी परिसराचा समावेश नाही. या गावांना टेंभू योजनेतून पाणी मिळणे शक्य आहे. इतर कोणत्याही योजनेतून या गावांना पाणी मिळणार नाही अशी परिस्थिती सद्या आहे. माण व खटाव तालुक्यातील वंचित गावांना टेंभू योजनेतून पाणी मिळाले नाही. त्यामुळे या गावातील नागरिक धास्तावले आहेत.गावांना पाणी द्यात्यामुळे या वंचित गावांना टेंभू योजनेतून पाणी मिळाले पाहिजे अशी मागणी या सर्व गावातील नागरिकांनी केली आहे. त्यामुळे तेथील लोकांचा शेती व पिण्याच्या प्रश्न मिटणार असे चित्र दिसत आहे.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTembhu Projectटेंभू धरण