शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
4
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
5
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
6
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
7
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
8
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
9
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
10
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
11
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
12
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
13
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
14
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
15
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
16
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
17
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
18
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
19
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
20
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

झाडं तर लावली.. आता जाळीनं वाचवू या !

By admin | Updated: July 23, 2016 23:51 IST

गोलबाग मित्रमंडळ : काड्यांपासून बनविल्या संरक्षक जाळ्या

सातारा : जिल्ह्यातील दुष्काळ हद्दपार करण्याची भीष्मप्रतिज्ञा घेतलेल्या सातारकरांनी गेल्या उन्हाळ्यात भरभरून झाडे लावली. गावोगावच्या डोंगरावर बिया टोकल्या तर काहींनी रोपांची लागवड केली; पण उगवलेले झाडांचे संवर्धन करण्याचा निश्चय येथील गोलबाग मित्रमंडळाने केला आहे. त्यासाठी त्यांनी जाळ्याही तयार केल्या आहेत.येथील गोलबाग मित्रमंडळाच्या वतीने बोगदा ते कुरणेश्वर परिसरात अजित भिलारे, रमेश मालुसरे व बाळासाहेब शिंदे यांच्या प्रयत्नातून जवळपास २०० वृक्षांची लागवड, करून त्यांच्या संवर्धनासाठी ‘ट्री गार्ड’ बसविण्यात आले आहेत.अजित भिलारे म्हणाले, ‘भविष्याचा वेध घेता वृक्षारोपण करणे व ते जोपासने हे प्रत्येकाने जबाबदारी ओळखून काम करण्याची गरज आहे. तसेच लावलेल्या वृक्षांची योग्य काळजी घेऊन त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.’याप्रसंगी वड, पिंपळ, सप्तपर्णी, रामफळ, चिकू, पेरू, फणस अशा विविध रोपांची व बियांची लागण करण्यात आली. याप्रसंगी गोलबाग मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक शिंदे, बिल्डर्स असोसिएशनचे नंदकुमार फडके, प्रशांत थोरात, दिनेश पवार, सुरेश बादापुरे, बाळासाहेब शिंदे, अनिल भोसले, प्रशांत थोरात, विनोद निकम, डॉ. भोसले, विजय जाधव, भाऊ माळी, अरविंद भिलारे, भास्कर पवार, आबा बेडेकर, संदीप थोरात, गणेश बागडे, रवींद्र भिलारे, सतीश ननवरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी) अनोखी शक्कल...उगवलेली रोपे जनावरे खाऊन टाकतात. त्यामुळे सत्तर टक्के झाडे उगवतच नाही. यासाठी तारेपासून जाळी बसविली जाते. मात्र, या जाळ्या चोरीला जाण्याचे प्रमाण जास्त आहे. यावर मार्ग काढण्यासाठी गोलबाग मित्रमंडळाने काड्यांपासून जाळी तयार केली आहे. ही जाळी खड्ड्यांभोवती लावली आहे.