शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

झाडं तर लावली.. आता जाळीनं वाचवू या !

By admin | Updated: July 23, 2016 23:51 IST

गोलबाग मित्रमंडळ : काड्यांपासून बनविल्या संरक्षक जाळ्या

सातारा : जिल्ह्यातील दुष्काळ हद्दपार करण्याची भीष्मप्रतिज्ञा घेतलेल्या सातारकरांनी गेल्या उन्हाळ्यात भरभरून झाडे लावली. गावोगावच्या डोंगरावर बिया टोकल्या तर काहींनी रोपांची लागवड केली; पण उगवलेले झाडांचे संवर्धन करण्याचा निश्चय येथील गोलबाग मित्रमंडळाने केला आहे. त्यासाठी त्यांनी जाळ्याही तयार केल्या आहेत.येथील गोलबाग मित्रमंडळाच्या वतीने बोगदा ते कुरणेश्वर परिसरात अजित भिलारे, रमेश मालुसरे व बाळासाहेब शिंदे यांच्या प्रयत्नातून जवळपास २०० वृक्षांची लागवड, करून त्यांच्या संवर्धनासाठी ‘ट्री गार्ड’ बसविण्यात आले आहेत.अजित भिलारे म्हणाले, ‘भविष्याचा वेध घेता वृक्षारोपण करणे व ते जोपासने हे प्रत्येकाने जबाबदारी ओळखून काम करण्याची गरज आहे. तसेच लावलेल्या वृक्षांची योग्य काळजी घेऊन त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.’याप्रसंगी वड, पिंपळ, सप्तपर्णी, रामफळ, चिकू, पेरू, फणस अशा विविध रोपांची व बियांची लागण करण्यात आली. याप्रसंगी गोलबाग मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक शिंदे, बिल्डर्स असोसिएशनचे नंदकुमार फडके, प्रशांत थोरात, दिनेश पवार, सुरेश बादापुरे, बाळासाहेब शिंदे, अनिल भोसले, प्रशांत थोरात, विनोद निकम, डॉ. भोसले, विजय जाधव, भाऊ माळी, अरविंद भिलारे, भास्कर पवार, आबा बेडेकर, संदीप थोरात, गणेश बागडे, रवींद्र भिलारे, सतीश ननवरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी) अनोखी शक्कल...उगवलेली रोपे जनावरे खाऊन टाकतात. त्यामुळे सत्तर टक्के झाडे उगवतच नाही. यासाठी तारेपासून जाळी बसविली जाते. मात्र, या जाळ्या चोरीला जाण्याचे प्रमाण जास्त आहे. यावर मार्ग काढण्यासाठी गोलबाग मित्रमंडळाने काड्यांपासून जाळी तयार केली आहे. ही जाळी खड्ड्यांभोवती लावली आहे.